शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

कोरोनामुक्त झालेल्यांनी लस घ्यावीच, संभ्रम नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

अहवालातील सूचना अयोग्य : लस न घेतल्यास पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता पुणे : कोरोनामुक्त झालेल्यांना लस देण्याची गरज नसल्याचे ...

अहवालातील सूचना अयोग्य : लस न घेतल्यास पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता

पुणे : कोरोनामुक्त झालेल्यांना लस देण्याची गरज नसल्याचे सांगणारा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञ आणि देशभरातील काही डॉक्टर संघटनांनी पंतप्रधानांना सादर केला आहे. मात्र, नवीन कोविड-१९ या विषाणूचा नवा ‘व्हेरियंट’ धोकादायक असल्याने लसीकरण अपरिहार्य असल्याचे विषाणूजन्य आजारांच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि लसीकरणाबाबत दररोज नवे नियम, नवी धोरणे समोर येत आहेत. त्यातच कोरोनाची बाधा झालेल्या व त्यातून बरे झालेल्यांना लसीची आवश्यकता नसल्याचा अहवाल आला आहे. लसींचा तुटवडा पाहता वयोवृद्ध, स्थूल वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोना संसर्गानंतरच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुणांना लस देणे किंमतीच्या दृष्टीने परवडणारे नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मात्र या दोन्ही कल्पना वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. विषाणूजन्य आजारांवरील तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, “दुसऱ्या लाटेत अतिदक्षता विभागात दाखल करावे लागलेल्या एकूण रुग्णांपैकी ३२ टक्के रुग्ण १८-४४ या वयोगटातील होते. याच वयोगटातील ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या वयोगटाच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या उलट, युरोप आणि अमेरिकेप्रमाणे भारतातही १२ ते १८ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करायला हवे.”

चौकट

अहवालाला किती महत्त्व देणार?

“कोरोनामुक्त रुग्णांना लसीकरण न करणे ही कल्पना अयोग्य आहे. अनेकांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे १८ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे. लसींची उपलब्धता हा तांत्रिक मुद्दा आहे. ज्या तज्ज्ञांनी अहवाल तयार केला, त्यांनी कोणत्या पद्धतीने सर्वेक्षण केले, सॅम्पल साईज काय होती, कोणत्या शहरातील व्यक्तींचा अभ्यास झाला, त्यांचा अभ्यास कुठे प्रकाशित झाला आणि प्रकाशित झाला नसल्यास त्याला किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे.”

- डॉ. सुभाष साळुंखे, कोरोना टास्क फोर्स

चौकट

पुन्हा संसर्गाची शक्यता

“कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या वृद्ध व्यक्ती किंवा सहव्याधी असलेले रुग्ण यांच्यात प्रतिपिंडे (अँटीबॉडी) विकसित झाली नसल्याचे काही उदाहरणांमध्ये दिसले. काही रुग्णांमध्ये अँटिबॉडी अजिबात विकसित होत नाहीत, तर काही रुग्णांमध्ये त्या जास्तीत जास्त वर्षभर टिकतात. संसर्गाच्या तीव्रतेवर अँटिबॉडी विकसित होण्याचे प्रमाण अवलंबून असते. आपल्याकडे ८०-८५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाचा कोरोना होऊन गेला. त्यामुळे तिसऱ्या लाटेत पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन ‘डेल्टा व्हेरियंट’मुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो, हेही स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींना एक डोस द्यावा की दोन याबाबत दुमत असू शकते. मात्र लस देऊ नये, ही सूचना योग्य नाही. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी डेल्टा विषाणूविरोधात संरक्षण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.”

- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ