शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त झालेल्यांनी लस घ्यावीच, संभ्रम नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST

अहवालातील सूचना अयोग्य : लस न घेतल्यास पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता पुणे : कोरोनामुक्त झालेल्यांना लस देण्याची गरज नसल्याचे ...

अहवालातील सूचना अयोग्य : लस न घेतल्यास पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता

पुणे : कोरोनामुक्त झालेल्यांना लस देण्याची गरज नसल्याचे सांगणारा अहवाल वैद्यकीय तज्ज्ञ आणि देशभरातील काही डॉक्टर संघटनांनी पंतप्रधानांना सादर केला आहे. मात्र, नवीन कोविड-१९ या विषाणूचा नवा ‘व्हेरियंट’ धोकादायक असल्याने लसीकरण अपरिहार्य असल्याचे विषाणूजन्य आजारांच्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा संसर्ग आणि लसीकरणाबाबत दररोज नवे नियम, नवी धोरणे समोर येत आहेत. त्यातच कोरोनाची बाधा झालेल्या व त्यातून बरे झालेल्यांना लसीची आवश्यकता नसल्याचा अहवाल आला आहे. लसींचा तुटवडा पाहता वयोवृद्ध, स्थूल वा एकाहून अधिक सहव्याधींनी ग्रस्त असलेल्यांमध्ये कोरोना संसर्गानंतरच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुणांना लस देणे किंमतीच्या दृष्टीने परवडणारे नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मात्र या दोन्ही कल्पना वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. विषाणूजन्य आजारांवरील तज्ज्ञ डॉ. अमित द्रविड म्हणाले, “दुसऱ्या लाटेत अतिदक्षता विभागात दाखल करावे लागलेल्या एकूण रुग्णांपैकी ३२ टक्के रुग्ण १८-४४ या वयोगटातील होते. याच वयोगटातील ४० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या वयोगटाच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या उलट, युरोप आणि अमेरिकेप्रमाणे भारतातही १२ ते १८ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करायला हवे.”

चौकट

अहवालाला किती महत्त्व देणार?

“कोरोनामुक्त रुग्णांना लसीकरण न करणे ही कल्पना अयोग्य आहे. अनेकांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे १८ वर्षे वयोगटावरील सर्व नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे. लसींची उपलब्धता हा तांत्रिक मुद्दा आहे. ज्या तज्ज्ञांनी अहवाल तयार केला, त्यांनी कोणत्या पद्धतीने सर्वेक्षण केले, सॅम्पल साईज काय होती, कोणत्या शहरातील व्यक्तींचा अभ्यास झाला, त्यांचा अभ्यास कुठे प्रकाशित झाला आणि प्रकाशित झाला नसल्यास त्याला किती महत्व द्यायचे हे आपण ठरवले पाहिजे.”

- डॉ. सुभाष साळुंखे, कोरोना टास्क फोर्स

चौकट

पुन्हा संसर्गाची शक्यता

“कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या वृद्ध व्यक्ती किंवा सहव्याधी असलेले रुग्ण यांच्यात प्रतिपिंडे (अँटीबॉडी) विकसित झाली नसल्याचे काही उदाहरणांमध्ये दिसले. काही रुग्णांमध्ये अँटिबॉडी अजिबात विकसित होत नाहीत, तर काही रुग्णांमध्ये त्या जास्तीत जास्त वर्षभर टिकतात. संसर्गाच्या तीव्रतेवर अँटिबॉडी विकसित होण्याचे प्रमाण अवलंबून असते. आपल्याकडे ८०-८५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाचा कोरोना होऊन गेला. त्यामुळे तिसऱ्या लाटेत पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन ‘डेल्टा व्हेरियंट’मुळे पुन्हा संसर्ग होऊ शकतो, हेही स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तींना एक डोस द्यावा की दोन याबाबत दुमत असू शकते. मात्र लस देऊ नये, ही सूचना योग्य नाही. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी डेल्टा विषाणूविरोधात संरक्षण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.”

- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ