शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

कोरोना हे चीनचेच षडयंत्र, तिसरे महायुद्ध म्हणूनच लढावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर ...

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर मजबूत आरोग्य यंत्रणा उभी करतानाच संपूर्ण देशाचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले आहे.

फिरोदिया म्हणाले की, कोणाला ही कॉन्स्पिरसी थेअरी वाटेल, परंतु कोविड-१९ विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेतच तयार झाला आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. वुहान येथील प्रयोगशाळेत चीनने हा विषाणू तयार केला आणि त्याबरोबरच त्याविरुध्दची लसही विकसित केली. जगातून यावर काय प्रतिक्रिया येते याचा अंदाज घेतला. परंतु, भारतासह जगातील इतर देशांनी चीनबरोबरचा व्यापार सुरूच ठेवला. चीनमधील गुंतवणूक येत राहिली. जगाचा हा कचखाऊ प्रतिसाद पाहून चीनचे धाडस वाढले. त्यामुळे त्यांनी विषाणूचा दुसरा व्हेरिएंट तयार केला. त्यालाच आता भारतीय व्हेरिएंट म्हटले जाऊ लागले आहे. हा विषाणू पहिल्यापेक्षा जास्त वेगाने पसरला. आता त्यांनी तिसरा व्हेरिएंट बनविला आहे. लहान मुलांसाठी तो घातक ठरणार आहे.

जगातील कोट्यवधी लोक या विषाणूने मृत्युमुखी पडत असतानाही कोणत्याही देशाचे धाडस नाही की चीनसोबतचा व्यापार बंद करावा किंवा कमी करावा. पाश्चिमात्य देश हे करणार नाहीत कारण ते आपल्या संपूर्ण लोकसंख्येचे वर्षानुवर्षे सातत्याने लसीकरण करू शकतील. पण भारतासारख्या देशाचे काय? असा सवाल करून फिरोदिया म्हणाले की, एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही ब्रिटन आणि फ्रान्सच्या एकत्रित लोकसंख्येइतकी आहे. त्यामुळेच आपण हा धोका ओळखला पाहिजे. जणू हे तिसरे महायुद्ध आहे त्याप्रमाणे लढा दिला पाहिजे. यासाठी सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम बंद करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात लसींचे उत्पादन प्रकल्प उभे केले पाहिजे. त्याचबारोबर व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर संशोधन करायला हवे. त्यातून सर्व प्रकारच्या व्हेरिएंटवर लस विकसित करता येईल. त्याबरोबर आरोग्य व्यवस्था बळकट आणि सार्वत्रिक करायला हवी. सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचे वेतन वाढविले पाहिजे. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कोरानाविरुध्दच्या लढाईची यंत्रणा उभारली पाहिजे. विषाणू प्रादुर्भाव झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी रोखण्याची यंत्रणा तयार करायला हवी.