शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना हे चीनचेच षडयंत्र, तिसरे महायुद्ध म्हणूनच लढावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर ...

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर मजबूत आरोग्य यंत्रणा उभी करतानाच संपूर्ण देशाचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले आहे.

फिरोदिया म्हणाले की, कोणाला ही कॉन्स्पिरसी थेअरी वाटेल, परंतु कोविड-१९ विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेतच तयार झाला आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. वुहान येथील प्रयोगशाळेत चीनने हा विषाणू तयार केला आणि त्याबरोबरच त्याविरुध्दची लसही विकसित केली. जगातून यावर काय प्रतिक्रिया येते याचा अंदाज घेतला. परंतु, भारतासह जगातील इतर देशांनी चीनबरोबरचा व्यापार सुरूच ठेवला. चीनमधील गुंतवणूक येत राहिली. जगाचा हा कचखाऊ प्रतिसाद पाहून चीनचे धाडस वाढले. त्यामुळे त्यांनी विषाणूचा दुसरा व्हेरिएंट तयार केला. त्यालाच आता भारतीय व्हेरिएंट म्हटले जाऊ लागले आहे. हा विषाणू पहिल्यापेक्षा जास्त वेगाने पसरला. आता त्यांनी तिसरा व्हेरिएंट बनविला आहे. लहान मुलांसाठी तो घातक ठरणार आहे.

जगातील कोट्यवधी लोक या विषाणूने मृत्युमुखी पडत असतानाही कोणत्याही देशाचे धाडस नाही की चीनसोबतचा व्यापार बंद करावा किंवा कमी करावा. पाश्चिमात्य देश हे करणार नाहीत कारण ते आपल्या संपूर्ण लोकसंख्येचे वर्षानुवर्षे सातत्याने लसीकरण करू शकतील. पण भारतासारख्या देशाचे काय? असा सवाल करून फिरोदिया म्हणाले की, एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही ब्रिटन आणि फ्रान्सच्या एकत्रित लोकसंख्येइतकी आहे. त्यामुळेच आपण हा धोका ओळखला पाहिजे. जणू हे तिसरे महायुद्ध आहे त्याप्रमाणे लढा दिला पाहिजे. यासाठी सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम बंद करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात लसींचे उत्पादन प्रकल्प उभे केले पाहिजे. त्याचबारोबर व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर संशोधन करायला हवे. त्यातून सर्व प्रकारच्या व्हेरिएंटवर लस विकसित करता येईल. त्याबरोबर आरोग्य व्यवस्था बळकट आणि सार्वत्रिक करायला हवी. सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचे वेतन वाढविले पाहिजे. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कोरानाविरुध्दच्या लढाईची यंत्रणा उभारली पाहिजे. विषाणू प्रादुर्भाव झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी रोखण्याची यंत्रणा तयार करायला हवी.