शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

कोरोना हे चीनचेच षडयंत्र, तिसरे महायुद्ध म्हणूनच लढावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर ...

पुणे : कोरोना विषाणूचा प्रसार हे चीनचेच षडयंत्र आहे. त्यामुळे भारताने हे तिसरे महायुद्ध म्हणूनच लढायला हवे. यासाठी देशभर मजबूत आरोग्य यंत्रणा उभी करतानाच संपूर्ण देशाचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केले आहे.

फिरोदिया म्हणाले की, कोणाला ही कॉन्स्पिरसी थेअरी वाटेल, परंतु कोविड-१९ विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेतच तयार झाला आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. वुहान येथील प्रयोगशाळेत चीनने हा विषाणू तयार केला आणि त्याबरोबरच त्याविरुध्दची लसही विकसित केली. जगातून यावर काय प्रतिक्रिया येते याचा अंदाज घेतला. परंतु, भारतासह जगातील इतर देशांनी चीनबरोबरचा व्यापार सुरूच ठेवला. चीनमधील गुंतवणूक येत राहिली. जगाचा हा कचखाऊ प्रतिसाद पाहून चीनचे धाडस वाढले. त्यामुळे त्यांनी विषाणूचा दुसरा व्हेरिएंट तयार केला. त्यालाच आता भारतीय व्हेरिएंट म्हटले जाऊ लागले आहे. हा विषाणू पहिल्यापेक्षा जास्त वेगाने पसरला. आता त्यांनी तिसरा व्हेरिएंट बनविला आहे. लहान मुलांसाठी तो घातक ठरणार आहे.

जगातील कोट्यवधी लोक या विषाणूने मृत्युमुखी पडत असतानाही कोणत्याही देशाचे धाडस नाही की चीनसोबतचा व्यापार बंद करावा किंवा कमी करावा. पाश्चिमात्य देश हे करणार नाहीत कारण ते आपल्या संपूर्ण लोकसंख्येचे वर्षानुवर्षे सातत्याने लसीकरण करू शकतील. पण भारतासारख्या देशाचे काय? असा सवाल करून फिरोदिया म्हणाले की, एकट्या महाराष्ट्राची लोकसंख्या ही ब्रिटन आणि फ्रान्सच्या एकत्रित लोकसंख्येइतकी आहे. त्यामुळेच आपण हा धोका ओळखला पाहिजे. जणू हे तिसरे महायुद्ध आहे त्याप्रमाणे लढा दिला पाहिजे. यासाठी सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम बंद करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यात लसींचे उत्पादन प्रकल्प उभे केले पाहिजे. त्याचबारोबर व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्सिंगवर संशोधन करायला हवे. त्यातून सर्व प्रकारच्या व्हेरिएंटवर लस विकसित करता येईल. त्याबरोबर आरोग्य व्यवस्था बळकट आणि सार्वत्रिक करायला हवी. सरकारी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचे वेतन वाढविले पाहिजे. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कोरानाविरुध्दच्या लढाईची यंत्रणा उभारली पाहिजे. विषाणू प्रादुर्भाव झाल्यावर त्याला त्याच ठिकाणी रोखण्याची यंत्रणा तयार करायला हवी.