शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

कोरोनामुळे नव्या रिक्षांच्या संख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रसाद कानडे पुणे : कोरोनाकाळात पुण्यात नवीन रिक्षा घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रसाद कानडे

पुणे : कोरोनाकाळात पुण्यात नवीन रिक्षा घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. मागील दोन वर्षांची आकडेवारी लक्षात घेता जवळपास ७६ टक्क्यांची घट झाली आहे. पूर्वी उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून रिक्षा व्यवसायाकडे पाहिले जात होते. आता मात्र रिक्षाचा व्यवसाय शेवटच्या घटका मोजतेय की काय? असे चित्र निर्माण झाले आहे.

पुणे शहरात जवळपास ७२ हजार रिक्षा आहेत. काही वर्षांपूर्वी परिवहन विभागाने मागेल त्याला परमीट या धर्तीवर रिक्षाचे परमीट मोठ्या प्रमाणात वितरित केले. तेव्हापासून रिक्षाचे मीटर डाऊन झाले. २०१९ - २० या वर्षात पुण्यात ११,७६५ नव्या रिक्षाची आरटीओकडे नोंद झाली. तर २०२० - २१ या वर्षांत केवळ २८३२ इतकी नोंद झाली आहे. म्हणजेच रिक्षा घेण्याचे प्रमाण तब्बल ७६ टक्क्यांनी घटले आहे.

-----------------

काय आहेत कारणे :

1.परमीट संदर्भातला खुले धोरण. या काळात अनेकांनी परमीट घेऊन रिक्षांची संख्या वाढवली. याचा विपरीत परिणाम थेट व्यवसायवर झाला.

2. पहिल्या लॉकडाऊनचा फार मोठा फटका बसला. बँकांचे व फायनान्स कंपन्यांचे हप्ते भरणे मुश्कील झाले. यात व्यवसाय बुडाला. लोकांनी रिक्षा व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय निवडला.

3.पूर्वी एका रिक्षाचालकाला दिवसांत किमान चारशे ते पाचशे रुपये मिळत. आता कसेबसे शंभर ते दीडशे मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी रिक्षा व्यवसायला रामराम केला.

--------------------

रिक्षाचा व्यवसाय आता पूर्वीसारखा राहिला नाही. रिक्षाचालकापेक्षा जास्त उत्पन्न मजूर वर्गाला मिळते आहे. कोरोनाच्या काळात रिक्षा व्यवसाय खूप अडचणीत आला. त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

- डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, बघतोय रिक्षावाला संघटना, पुणे.

------------------

परमीट खुले केल्याने अनेकांनी दुसरा व्यवसाय म्हणून अनेकांनी रिक्षाचे परमीट घेतले. त्यावेळी सर्व्हे करणे गरजेचे होते. तसेच लॉकडाऊनच्या काळात प्रवासी कमी, रिक्षा जास्त ही परिस्थिती निर्माण झाली. उत्पन्न नाही. नव्या रिक्षावर १८ टक्के जीएसटी, तसेच परमीटसाठी ११ हजार द्यावे लागतात. एवढं खर्च करूनदेखील उत्पन्न नाही. त्यामुळे रिक्षा व्यवसायाची भीती वाटत आहे. त्यामुळे अनेकांनी आता रिक्षा व्यवसायाकडे पाठ केली आहे.

- आनंद अंकुश, सचिव, आम आदमी रिक्षा संघटना, पुणे