शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

उरुळी कांचनमध्ये कोरोना लसीकरणाचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST

सरपंच संतोष कांचन (पप्पू) यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सहकार्य करीत असते; पण नियोजनशून्य कामामुळे तेथे ...

सरपंच संतोष कांचन (पप्पू) यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सहकार्य करीत असते; पण नियोजनशून्य कामामुळे तेथे गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त वाटते. गावचे लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी सरपंचाची आहे, पण आरोग्य विभागाचे सहकार्य मिळाले नाही तर ते अशक्य आहे. मग तो दोष सरपंचाचा नाही.

उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहाटे चारपासूनच नागरिकांच्या रांगा लागतात, मात्र आरोग्य खात्याचे कर्मचारी उशिरा येऊन नियोजन करत बसतात. नागरिक उपाशी पोटी लसीकरण केंद्रावर ताटकळत बसतात व शेवटी नऊ वाजता त्यांना कळते की फक्त शंभर लोकांनाच लस टोचली जाणार आहे. यामुळे तीनशे-साडेतीनशे लोक लाईनमध्ये उभे असतानाही फक्त शंभर लोकांना लसीकरण होण्याने अडीचशे ते तीनशे लोकांची गैरसोय होत आहे. नियोजन नसल्याने ही मंडळी अडचणीत येऊन व हेलपाट्यांच्या चक्रात सकाळी चार ते दहा वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात अडकून पडतात. यातून वयस्कर मंडळीदेखील सुटत नाहीत तर विशेष म्हणजे लाईनमधील गर्दीमुळे मूळ कोरोना प्रादुर्भाव नसतानाही कोरोना प्रादुर्भाव घरी घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर येते की काय, अशी शंका येत आहे. कारण लसीकरणाच्या लाईनमध्ये उभे राहिलेले लोकांकडून कोणताही नियम पाळला जात नाही किंवा तो पाळावा म्हणून प्रशासन लक्ष देताना दिसत नाही.

याच्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून लोकसंख्येवर आधारित लसीकरण करण्यासाठी लसीचा पुरवठा होणे गरजेचे असताना अधिकारीवर्ग उरुळी कांचनसारख्या ७० हजारांच्या पुढे लोकसंख्या गेलेल्या गावाला केवळ शंभर ते दीडशे जणांना पुरेल एवढी लस देतात व नागरिकांची चेष्टा करतात, ही बाब जिल्हा प्रशासनाने ध्यानात घेऊन गोरगरीब जनतेची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबवण्याची मागणी उरुळी कांचन परिसरातील नागरिक करीत आहेत.

उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी सांगितले की, आमच्याकडे होणारा लसीचा पुरवठा आठवड्यातून तीन ते चार दिवस होत नाही आणि झाला तर फार थोड्या प्रमाणात होतो. त्यामुळे नियोजन करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. तरी वरिष्ठ कार्यालयाने या गोष्टीची योग्य ती दखल घेऊन ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना त्यांच्या मागणीप्रमाणे व लोकसंख्येवर आधारित लसीचा पुरवठा करावा म्हणजे गावपातळीवरील लसीकरण प्रामुख्याने पूर्ण करून पुढील संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.