शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचनमध्ये कोरोना लसीकरणाचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST

सरपंच संतोष कांचन (पप्पू) यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सहकार्य करीत असते; पण नियोजनशून्य कामामुळे तेथे ...

सरपंच संतोष कांचन (पप्पू) यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सहकार्य करीत असते; पण नियोजनशून्य कामामुळे तेथे गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त वाटते. गावचे लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी सरपंचाची आहे, पण आरोग्य विभागाचे सहकार्य मिळाले नाही तर ते अशक्य आहे. मग तो दोष सरपंचाचा नाही.

उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहाटे चारपासूनच नागरिकांच्या रांगा लागतात, मात्र आरोग्य खात्याचे कर्मचारी उशिरा येऊन नियोजन करत बसतात. नागरिक उपाशी पोटी लसीकरण केंद्रावर ताटकळत बसतात व शेवटी नऊ वाजता त्यांना कळते की फक्त शंभर लोकांनाच लस टोचली जाणार आहे. यामुळे तीनशे-साडेतीनशे लोक लाईनमध्ये उभे असतानाही फक्त शंभर लोकांना लसीकरण होण्याने अडीचशे ते तीनशे लोकांची गैरसोय होत आहे. नियोजन नसल्याने ही मंडळी अडचणीत येऊन व हेलपाट्यांच्या चक्रात सकाळी चार ते दहा वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात अडकून पडतात. यातून वयस्कर मंडळीदेखील सुटत नाहीत तर विशेष म्हणजे लाईनमधील गर्दीमुळे मूळ कोरोना प्रादुर्भाव नसतानाही कोरोना प्रादुर्भाव घरी घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर येते की काय, अशी शंका येत आहे. कारण लसीकरणाच्या लाईनमध्ये उभे राहिलेले लोकांकडून कोणताही नियम पाळला जात नाही किंवा तो पाळावा म्हणून प्रशासन लक्ष देताना दिसत नाही.

याच्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून लोकसंख्येवर आधारित लसीकरण करण्यासाठी लसीचा पुरवठा होणे गरजेचे असताना अधिकारीवर्ग उरुळी कांचनसारख्या ७० हजारांच्या पुढे लोकसंख्या गेलेल्या गावाला केवळ शंभर ते दीडशे जणांना पुरेल एवढी लस देतात व नागरिकांची चेष्टा करतात, ही बाब जिल्हा प्रशासनाने ध्यानात घेऊन गोरगरीब जनतेची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबवण्याची मागणी उरुळी कांचन परिसरातील नागरिक करीत आहेत.

उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी सांगितले की, आमच्याकडे होणारा लसीचा पुरवठा आठवड्यातून तीन ते चार दिवस होत नाही आणि झाला तर फार थोड्या प्रमाणात होतो. त्यामुळे नियोजन करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. तरी वरिष्ठ कार्यालयाने या गोष्टीची योग्य ती दखल घेऊन ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना त्यांच्या मागणीप्रमाणे व लोकसंख्येवर आधारित लसीचा पुरवठा करावा म्हणजे गावपातळीवरील लसीकरण प्रामुख्याने पूर्ण करून पुढील संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.