शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

उरुळी कांचनमध्ये कोरोना लसीकरणाचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST

सरपंच संतोष कांचन (पप्पू) यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सहकार्य करीत असते; पण नियोजनशून्य कामामुळे तेथे ...

सरपंच संतोष कांचन (पप्पू) यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सहकार्य करीत असते; पण नियोजनशून्य कामामुळे तेथे गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता जास्त वाटते. गावचे लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी सरपंचाची आहे, पण आरोग्य विभागाचे सहकार्य मिळाले नाही तर ते अशक्य आहे. मग तो दोष सरपंचाचा नाही.

उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पहाटे चारपासूनच नागरिकांच्या रांगा लागतात, मात्र आरोग्य खात्याचे कर्मचारी उशिरा येऊन नियोजन करत बसतात. नागरिक उपाशी पोटी लसीकरण केंद्रावर ताटकळत बसतात व शेवटी नऊ वाजता त्यांना कळते की फक्त शंभर लोकांनाच लस टोचली जाणार आहे. यामुळे तीनशे-साडेतीनशे लोक लाईनमध्ये उभे असतानाही फक्त शंभर लोकांना लसीकरण होण्याने अडीचशे ते तीनशे लोकांची गैरसोय होत आहे. नियोजन नसल्याने ही मंडळी अडचणीत येऊन व हेलपाट्यांच्या चक्रात सकाळी चार ते दहा वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात अडकून पडतात. यातून वयस्कर मंडळीदेखील सुटत नाहीत तर विशेष म्हणजे लाईनमधील गर्दीमुळे मूळ कोरोना प्रादुर्भाव नसतानाही कोरोना प्रादुर्भाव घरी घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर येते की काय, अशी शंका येत आहे. कारण लसीकरणाच्या लाईनमध्ये उभे राहिलेले लोकांकडून कोणताही नियम पाळला जात नाही किंवा तो पाळावा म्हणून प्रशासन लक्ष देताना दिसत नाही.

याच्यासाठी जिल्हा कार्यालयाकडून लोकसंख्येवर आधारित लसीकरण करण्यासाठी लसीचा पुरवठा होणे गरजेचे असताना अधिकारीवर्ग उरुळी कांचनसारख्या ७० हजारांच्या पुढे लोकसंख्या गेलेल्या गावाला केवळ शंभर ते दीडशे जणांना पुरेल एवढी लस देतात व नागरिकांची चेष्टा करतात, ही बाब जिल्हा प्रशासनाने ध्यानात घेऊन गोरगरीब जनतेची होणारी अडवणूक व पिळवणूक थांबवण्याची मागणी उरुळी कांचन परिसरातील नागरिक करीत आहेत.

उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी सांगितले की, आमच्याकडे होणारा लसीचा पुरवठा आठवड्यातून तीन ते चार दिवस होत नाही आणि झाला तर फार थोड्या प्रमाणात होतो. त्यामुळे नियोजन करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. तरी वरिष्ठ कार्यालयाने या गोष्टीची योग्य ती दखल घेऊन ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना त्यांच्या मागणीप्रमाणे व लोकसंख्येवर आधारित लसीचा पुरवठा करावा म्हणजे गावपातळीवरील लसीकरण प्रामुख्याने पूर्ण करून पुढील संभाव्य धोका टाळणे शक्य होईल.