शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

ठंडा ठंडा, कूल कूल स्वादाने आयुष्याला दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST

गिरीश खत्री हे या तरुणाचे नाव. १९८९ साली पुण्यातील कर्वेनगर परिसरात खत्री कुटुंब राहायला आले. त्यांनी नवीन घर बांधले. ...

गिरीश खत्री हे या तरुणाचे नाव. १९८९ साली पुण्यातील कर्वेनगर परिसरात खत्री कुटुंब राहायला आले. त्यांनी नवीन घर बांधले. घराचे कर्ज आणि मुलांचे शिक्षण यासाठी वडिलांना खूप कष्ट करावे लागत होते. त्यांना थोडीफार मदत व्हावी म्हणून गिरीश यांनी आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. गिरीश खत्री जुन्नर येथे मामांकडे गेले असताना जुन्या वस्तू वापरून आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. आईच्या मदतीने आठवीत असलेल्या गिरीश खत्री यांनी शिवरात्रीच्या मुहूर्तावर कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिराशेजारी आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. पहिल्या दिवशी फक्त नऊ रुपये इतका गल्ला होता. शिवाय पहिल्या महिन्याभरात दोन अंकी गल्ला झालाच नसल्याचे खत्री बंधू सांगतात. सुरुवातीला कधी कमी तर कधी गोड आइस्क्रिम खाणारे लोक मिळत गेले. ग्राहकाला जे आवडते तसा स्वाद ते देत गेले. ते सांगतात की, आज पुण्यात इतक्या शाखा असतानादेखील आजही आम्ही ग्राहक सांगतात ते ऐकतो. ते नेहमीच ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य देत असतात. त्यांनी धाडसाने मस्तानी आइस्क्रिम सुरू केली. लोकांना ती आवडली. खत्री बंधूंचा आज जो आइस्क्रिमचा मोठा व्यवसाय आहे. सुरुवातीला खर्च जास्त आणि मिळकत कमी होती. मात्र, वडिलांनी व्यवसाय करत राहा असा सल्ला दिला. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे व्यवसाय वाढत गेला. खत्री बंधूंच्या आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात २९ शाखा कार्यरत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, पुरंदर, बारामती या शहरांत एकूण २९ शाखा आहेत. सध्या कोरोनामुळे शाखा विस्तारण्याच्या कामात अडथळा आला असला तरी ५१ शाखा सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्याकडे अनेक जण शाखेची (फ्रॅँचायझी) मागणी देखील करत आहेत.

गिरीश खत्री यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाचा 'रायझिंग आयकॉन ऑफ पुणे', लोकमतचा 'बेस्ट आयकॉन ऑफ पुणे' यासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे.

खत्री बंधू सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर असतात. कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी ऑनलाईन शिबिराचे आयोजन केले होते. गेल्याच महिन्यात त्यांनी दोन रक्तदान शिबिरांचेदेखील आयोजन केले होते. गरजू मुलांची शैक्षणिक फी ते भरतात. चिपळूण पूरग्रस्तांना मदत केली.