शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

ठंडा ठंडा, कूल कूल स्वादाने आयुष्याला दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST

गिरीश खत्री हे या तरुणाचे नाव. १९८९ साली पुण्यातील कर्वेनगर परिसरात खत्री कुटुंब राहायला आले. त्यांनी नवीन घर बांधले. ...

गिरीश खत्री हे या तरुणाचे नाव. १९८९ साली पुण्यातील कर्वेनगर परिसरात खत्री कुटुंब राहायला आले. त्यांनी नवीन घर बांधले. घराचे कर्ज आणि मुलांचे शिक्षण यासाठी वडिलांना खूप कष्ट करावे लागत होते. त्यांना थोडीफार मदत व्हावी म्हणून गिरीश यांनी आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. गिरीश खत्री जुन्नर येथे मामांकडे गेले असताना जुन्या वस्तू वापरून आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. आईच्या मदतीने आठवीत असलेल्या गिरीश खत्री यांनी शिवरात्रीच्या मुहूर्तावर कर्वेनगर येथील विठ्ठल मंदिराशेजारी आइस्क्रिमचा व्यवसाय सुरू केला. पहिल्या दिवशी फक्त नऊ रुपये इतका गल्ला होता. शिवाय पहिल्या महिन्याभरात दोन अंकी गल्ला झालाच नसल्याचे खत्री बंधू सांगतात. सुरुवातीला कधी कमी तर कधी गोड आइस्क्रिम खाणारे लोक मिळत गेले. ग्राहकाला जे आवडते तसा स्वाद ते देत गेले. ते सांगतात की, आज पुण्यात इतक्या शाखा असतानादेखील आजही आम्ही ग्राहक सांगतात ते ऐकतो. ते नेहमीच ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य देत असतात. त्यांनी धाडसाने मस्तानी आइस्क्रिम सुरू केली. लोकांना ती आवडली. खत्री बंधूंचा आज जो आइस्क्रिमचा मोठा व्यवसाय आहे. सुरुवातीला खर्च जास्त आणि मिळकत कमी होती. मात्र, वडिलांनी व्यवसाय करत राहा असा सल्ला दिला. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे व्यवसाय वाढत गेला. खत्री बंधूंच्या आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात २९ शाखा कार्यरत आहेत. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, पुरंदर, बारामती या शहरांत एकूण २९ शाखा आहेत. सध्या कोरोनामुळे शाखा विस्तारण्याच्या कामात अडथळा आला असला तरी ५१ शाखा सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. त्यांच्याकडे अनेक जण शाखेची (फ्रॅँचायझी) मागणी देखील करत आहेत.

गिरीश खत्री यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाचा 'रायझिंग आयकॉन ऑफ पुणे', लोकमतचा 'बेस्ट आयकॉन ऑफ पुणे' यासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे.

खत्री बंधू सामाजिक कार्यातदेखील अग्रेसर असतात. कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांसाठी ऑनलाईन शिबिराचे आयोजन केले होते. गेल्याच महिन्यात त्यांनी दोन रक्तदान शिबिरांचेदेखील आयोजन केले होते. गरजू मुलांची शैक्षणिक फी ते भरतात. चिपळूण पूरग्रस्तांना मदत केली.