शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

संविधानामुळे मूलभूत हक्क मिळाले : नीलम गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST

संविधान प्रस्तावना भेट देण्याचा डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचा उपक्रम खोडद : ‘संविधानाचे वाचन आपण न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ...

संविधान प्रस्तावना भेट देण्याचा डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचा उपक्रम

खोडद : ‘संविधानाचे वाचन आपण न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आहे, केवळ एवढीच आपल्याला माहिती आहे. डॉ. आंबेडकरांनी संविधानात नेमकं काय लिहिलंय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं पाहिजे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले आहेत. आपल्या देशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे, यासाठी संविधान एकदा तरी वाचायला हवे,’ असे आवाहन नीलम गायकवाड यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने खोडद ग्रामपंचायतीला भारतीय संविधान प्रस्तावना भेट देण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष दिनेश वाव्हळ, उपसरपंच सविता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नीलम गायकवाड, कल्पना डोके,योगेश शिंदे,नवनाथ पोखरकर, संदीप घायतडके,विजय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळा वाव्हळ, अमर सोनवणे,श्रीकांत सोनवणे, उमेश वाघंबरे, विक्रम वाव्हळ,गोपी खंडे, संतोष डोळस, अॅड.मिथिलेश शिंदे,संग्राम सोनवणे,दावीत इंगळे,संदीप उबाळे,अक्षय वाव्हळ,ऋषिकेश वाव्हळ,गणेश सोनवणे,माजी सरपंच विजय गायकवाड,संतोष काळे,विशाल पानमंद, प्रदीप बेल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश वाव्हळ बोलताना म्हणाले की , "संविधान वाचन केल्यास आपल्या अधिकारांची आपल्याला जाणीव निर्माण होते. अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये संविधान प्रस्तावना नाहीये. भारतीय नागरिक म्हणून संविधानाबाबत माहिती असणे आवश्यक आहे.भारताच्या संविधान प्रस्तावनेला डॉ.आंबेडकरांनी एक महत्त्वपूर्ण मूर्त स्वरूप दिले आहे. संविधान प्रस्तावनेच्या माध्यमातून संविधानाविषयी अधिक जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संविधान प्रस्तावना भेट देणार आहोत."

प्रास्ताविक संदीप घायतडके यांनी केले.सूत्रसंचालन रमेश साबळे यांनी केले तर आभार योगेश शिंदे यांनी मानले.

"संविधान हे राष्ट्र चालविण्यासाठी आखून दिलेल्या मूळ आदर्श नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्रीय अस्तित्व ठरवितात. भारताचे संविधान हे एक सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वांत मोठे संविधान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तीन तत्वांचा आपल्या देशाला आदर्श घालून दिला आहे.

-.नीलम गायकवाड

ग्रामपंचायत सदस्या, खोडद,

"आपल्या देशाचा कारभार संविधानाच्या आधारावर चालतो. ग्रामपंचायत म्हणजे संसदेचा पहिला पाया आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची प्रस्तावना नाहीये ही बाब लक्षात आल्यानंतर ज्या ग्रामपंचायतीमध्ये संविधान प्रस्तावना नाहीये अशा ग्रामपंचायतींना संविधान प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

- दिनेश वाव्हळ, अध्यक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, जुन्नर तालुका

================================

130921\20210912_201014.jpg

कॅप्शन - जुन्नर तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने खोडद ग्रामपंचायतला संविधानाची प्रस्तावना भेट देण्यात आली.