शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळे मूलभूत हक्क मिळाले : नीलम गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST

संविधान प्रस्तावना भेट देण्याचा डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचा उपक्रम खोडद : ‘संविधानाचे वाचन आपण न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ...

संविधान प्रस्तावना भेट देण्याचा डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचा उपक्रम

खोडद : ‘संविधानाचे वाचन आपण न केल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आहे, केवळ एवढीच आपल्याला माहिती आहे. डॉ. आंबेडकरांनी संविधानात नेमकं काय लिहिलंय हे प्रत्येक नागरिकाने समजून घेतलं पाहिजे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क मिळाले आहेत. आपल्या देशाचे संविधान सर्वांना माहिती असायला हवे, यासाठी संविधान एकदा तरी वाचायला हवे,’ असे आवाहन नीलम गायकवाड यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने खोडद ग्रामपंचायतीला भारतीय संविधान प्रस्तावना भेट देण्यात आली. या वेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष दिनेश वाव्हळ, उपसरपंच सविता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नीलम गायकवाड, कल्पना डोके,योगेश शिंदे,नवनाथ पोखरकर, संदीप घायतडके,विजय सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळा वाव्हळ, अमर सोनवणे,श्रीकांत सोनवणे, उमेश वाघंबरे, विक्रम वाव्हळ,गोपी खंडे, संतोष डोळस, अॅड.मिथिलेश शिंदे,संग्राम सोनवणे,दावीत इंगळे,संदीप उबाळे,अक्षय वाव्हळ,ऋषिकेश वाव्हळ,गणेश सोनवणे,माजी सरपंच विजय गायकवाड,संतोष काळे,विशाल पानमंद, प्रदीप बेल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश वाव्हळ बोलताना म्हणाले की , "संविधान वाचन केल्यास आपल्या अधिकारांची आपल्याला जाणीव निर्माण होते. अनेक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये संविधान प्रस्तावना नाहीये. भारतीय नागरिक म्हणून संविधानाबाबत माहिती असणे आवश्यक आहे.भारताच्या संविधान प्रस्तावनेला डॉ.आंबेडकरांनी एक महत्त्वपूर्ण मूर्त स्वरूप दिले आहे. संविधान प्रस्तावनेच्या माध्यमातून संविधानाविषयी अधिक जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संविधान प्रस्तावना भेट देणार आहोत."

प्रास्ताविक संदीप घायतडके यांनी केले.सूत्रसंचालन रमेश साबळे यांनी केले तर आभार योगेश शिंदे यांनी मानले.

"संविधान हे राष्ट्र चालविण्यासाठी आखून दिलेल्या मूळ आदर्श नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्रीय अस्तित्व ठरवितात. भारताचे संविधान हे एक सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वांत मोठे संविधान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तीन तत्वांचा आपल्या देशाला आदर्श घालून दिला आहे.

-.नीलम गायकवाड

ग्रामपंचायत सदस्या, खोडद,

"आपल्या देशाचा कारभार संविधानाच्या आधारावर चालतो. ग्रामपंचायत म्हणजे संसदेचा पहिला पाया आहे. जुन्नर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये संविधानाची प्रस्तावना नाहीये ही बाब लक्षात आल्यानंतर ज्या ग्रामपंचायतीमध्ये संविधान प्रस्तावना नाहीये अशा ग्रामपंचायतींना संविधान प्रस्तावना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

- दिनेश वाव्हळ, अध्यक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, जुन्नर तालुका

================================

130921\20210912_201014.jpg

कॅप्शन - जुन्नर तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने खोडद ग्रामपंचायतला संविधानाची प्रस्तावना भेट देण्यात आली.