शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

पुण्यातील ‘ओशो आश्रम’ नष्ट करण्याचे कारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : येथील ओशो आश्रम भारतातून परदेशात हलविण्याचा घाट घातला जात आहे. ओशोंचा वारसा हा केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : येथील ओशो आश्रम भारतातून परदेशात हलविण्याचा घाट घातला जात आहे. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा नसून, संपूर्ण जगाचा वारसा आहे. मात्र, ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू असून, सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी ओशो संन्यासी स्वामी गोपाल भारती आणि स्वामी झोरबा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

त्यांनी सांगितले, की ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन आणि नवसंन्यास (रजनीश) फाउंडेशनचे ट्रस्टी आणि सध्याच्या व्यवस्थापन समितीद्वारे १८०० कोटींचा घोटाळा केलेला आहे. ओशो संन्याशांना समाधीपर्यंत जाण्यास बंदी करून धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे. ओशोंचा फोटो काढून, त्यांच्या वक्तव्याला काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे. ओशोंना एक रहस्यदर्शी सद्गुरू न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे.

येणाऱ्या पिढ्यांनी ओशोंना विसरून जावे यासाठी हे कारस्थान रचले जात आहे, असा आरोप करून स्वामी गोपाल भारती आणि स्वामी झोरबा म्हणाले, की ओशोंची जगभरातील ६० ते ७० विविध भाषांत अनुवादित ग्रंथसंपदेची ‘रॉयल्टी’ कुठे जात आहे, याची चौकशी व्हावयास हवी. आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विक्रीपासून वाचविण्याची नाही, तर या सर्व प्रकाराची सीबीआय व ईडीमार्फत सखोल चौकशी व्हावयास हवी. यासंदर्भात अनेक संन्याश्यांनी धर्मादाय आयुक्त आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ओशोंचा वारसा वाचविण्यासाठी संपूर्ण भारतभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.