शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

ईडब्ल्यूएस आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे एमपीएससीच्या विविध परीक्षांसाठी एसईबीसी अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातून अर्ज भरण्याची ...

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे एमपीएससीच्या विविध परीक्षांसाठी एसईबीसी अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गातून अर्ज भरण्याची परीस्थिती निर्माण झाली. मात्र, विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस अंतर्गत अर्ज करण्याची शासनाने संधी उपलब्ध करून दिली. परंतु, एसईबीसी आरक्षणासंदर्भात अंतिम निर्णय होण्यापूर्वी शासनाने ईडब्ल्यूएसचा पर्याय का दिला? असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

पूर्वी ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी पात्र असलेले विद्यार्थी उत्पन्नवाढीमुळे या वर्षी ईडब्ल्यूएससाठी पात्र नाहीत. तर काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जात बदल केल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आपला अर्ज रद्द होणार का? अशी शंका काही विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तसेच अर्ज खुल्या संवर्गातून भरावा, एसईबीसीतून भरावा की ईडब्ल्यूएसमधून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.

हनुमंत रणदिवे या विद्यार्थ्याने सांगितले, एसईबीसी आरक्षण अद्याप पूर्णपणे रद्द झालेले नाही. तरीही आयोगाने एसईबीसीएवजी ईडब्ल्यूएसचा पर्याय का दिला?, विद्यार्थ्यांनी आरक्षणसंदर्भातील माहिती प्रोफाईल व अर्जात या दोन्ही ठिकाणी? बदलायची आहे की एकाच ठिकाणी? ईडब्ल्यूएसचा पर्याय केवळ या वर्षाच्या परीक्षांसाठी असेल की यापुढील सर्व परीक्षांसाठी असेल? अशा शंका विद्यार्थ्यांच्या मनात असून याबाबत आयोगाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे.तसेच शासनाने मराठा आरक्षणाबाबत अंतिम निकाल लागत नाही; तोपर्यंत एसईबीसी निवडीचा पर्याय खुला ठेवावा.