शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

म्हाळगी यांच्या व्यक्तिमत्त्वात सैद्धांतिक आणि व्यावहारिक मूल्यांचा संगम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “रामभाऊ म्हाळगी यांच्या व्यक्तिमत्त्वात सैद्धांतिक आणि व्यावहारिक मूल्यांचा संगम होता. त्यांनी आपल्या जीवनात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “रामभाऊ म्हाळगी यांच्या व्यक्तिमत्त्वात सैद्धांतिक आणि व्यावहारिक मूल्यांचा संगम होता. त्यांनी आपल्या जीवनात आदर्शत्वाची उपासना आणि उत्तमतेचा ध्यास घेत कार्यसिद्धधी केली,” असे प्रतिपादन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष व खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी शुक्रवारी (दि. ९) केले.

रामभाऊ म्हाळगी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहात रामभाऊ म्हाळगी यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. महापौर मुरलीधर मोहोळ, प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष आणि प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे आदी या वेळी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही कायदा करणाऱ्या संस्था आहेत. लोकांनी त्यांना वेळ नाही, म्हणून एक करार करून आमदार-खासदारांना सभागृहांमध्ये पाठवलेले आहे. त्याला जर न्याय देणार नसाल तर मग उपयोग काय? आमदार आणि खासदार यांना प्रशिक्षणाची गरज असल्याच्या जाणिवेतून रामभाऊ म्हाळगी संस्थेत ग्रामपंचायतीपासून केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जाते, हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली आहे.”

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, “अपमानाच्या गोळ्या गिळायच्या असतात. त्या चघळायच्या नसतात. राजकारणात निष्ठेने पाय पक्के रुजवायचे असतात, असा सल्ला म्हाळगी कार्यकर्त्यांना देत असत. त्यांच्या आदर्शाची पुनरावृत्ती व्हायला हवी. समाजापर्यंत त्यांचे विचार पोहोचायला हवेत. म्हाळगी यांचे भिन्न विचारांच्या मंडळींशीदेखील सौहार्दपूर्ण संबंध होते. सर्वांबद्दल आदराची भावना होती. मात्र, सध्याच्या काळात समाजात वैचारिक अस्पृश्यता पाहायला मिळते. या वैचारिक अस्पृश्यतेने समाजकारण आणि राजकारणाचा पोत बिघडवला आहे.”

रामभाऊ म्हाळगी यांच्यासोबत पुणे आणि मावळमध्ये काम केलेले जुने कार्यकर्ते या वेळी आवर्जून उपस्थित होते. त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे सूत्रसंचालन केले. योगेश गोगावले यांनी आभार मानले.