शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

आधी कामे पूर्ण करा; मगच टोल सुरू करा

By admin | Updated: February 14, 2017 01:49 IST

चाळकवाडी येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असल्याने सर्व समस्या

पिंपळवंडी : चाळकवाडी येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या टोलनाक्यावर टोल सुरू करण्यास बाधित शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असल्याने सर्व समस्या सोडवा आणि मगच टोल सुरु करा, अशी ठोस भूमिका घेतल्याने व सर्वच राजकीय पक्षांनी या प्रश्नामध्ये उडी घेतल्यामुळे येथील टोलनाका केव्हा सुरु होणार याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या बाबत ग्रामस्थांनी आळेफाटा येथील सावतामाळी मंदिरात बैठक घेतली. पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या एकूण १३८ किलोमीटरपैकी १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामास भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा आणि जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी येथील टोलनाका शनिवार (दि.११) पासून सुरु करण्यात येणार होता. परंतु येथील बाधित शेतकऱ्यांनी आणि आळे येथील ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे उपविभागीय अधिकारी व आयएलएफएसचे अधिकारी यांनी रघुनाथ लेंडे, संतोष घोटणे, प्रदीप चाळक, बाजीराव लाड, प्रसन्ना डोके आणि बाधित शेतकरी व आळे ग्रामस्थांबरोबर आळेफाटा येथील सावतामाळी मंदिरात बैठक घेतली. या बैठकीत बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, आळे येथील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात यावे, पिंपळवंडी येथील स्मशानभूमीचे काम करा आणि मगच टोल आकारणी करण्यास सुरुवात करा अशी ठोस आणि आक्रमक भूमिका घेतली. या विषयात राजकीय पक्षांनी उडी घेतली असल्यामुळे या विषयाला राजकीय वळण लागले असल्यामुळे हा टोलनाका केव्हा सुरु होणार याबाबत शंका निर्माण झाली आहे.