शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

राजापुरातील ग्रामविकास अधिकाऱ्यांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजापूर ही अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत राजपूर, गाडेवाडी, उंडेवाडी, पालखेवाडी, न्हावेवाडी, ...

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजापूर ही अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत अंतर्गत राजपूर, गाडेवाडी, उंडेवाडी, पालखेवाडी, न्हावेवाडी, शिवाजीनगर वस्ती, शेंगाळवाडी, अशा वाड्या येत असल्यामुळे महसुलाच्या दृष्टीने ही ग्रामपंचायत महत्त्वाची समजली जाते. परंतु ग्रामविकास अधिकारी हा मनमानी कारभार करत असून ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणारी विकास कामे ग्रामस्थ व सदस्य सरपंच यांना विश्वासात न घेता आपल्या मर्जीचा ठेकेदार असणाऱ्या ठेकेदाराशी संगनमताने कामे करत असल्यामुळे ही कामे अत्यंत निकृष्ट पद्धतीची होत असल्याने ग्रामस्थांकडून नाराजीचा सूर निघत आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत राजपूर- गाडेवाडी येथील ग्रामसेवक यांनी कोविड -१९ च्या काळात लोकप्रतिनिधींना सहकार्य केले नाही. ते आठवड्यातील एक दिवस ग्रामपंचायत कार्यालयामध्ये हजर असतात. नागरिकांना त्यांची तासनतास वाट पाहत ताटकळत बसावे लागते. अपंग व्यक्तींचे मानधन, अनुदान जाणीवपूर्वक आजपर्यंत दिले नाही. विवाह नोंदणी करण्यासाठी शासना नियम व्यतिरिक्त जादा रक्कम आकारली जात आहे.

याबाबत काहींना पावती दिली जाते तर काहींना दिली जात नाही. परंतु ज्यांना पावती दिली जाते ती कोणत्या पुस्तकातून दिली आहे याची चौकशी व्हावी. तसेच स्थानिक ग्रामस्थ वारंवार जॉब कार्डची मागणी करून सुध्दा जॉब कार्ड देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गाडेवाडी व पालखेवाडी येथील अंगणवाडी दुरूस्तीची कामे अंदाजपत्रकानुसार झाली नाही. परंतु काम कमी प्रमाणात असताना बिल ज्यादा काढून संबंधित रक्कम देण्यात आली आहे. लोकांशी संपर्क नसल्यामुळे वैयक्तिक किंवा सार्वजनिक लाभाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत जात नाही, याबाबत संबंधित ग्रामसेवकाची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आदिवासी भागाच्या दौऱ्यावर असताना अनेक ग्रामस्थांनी ग्रामसेवक बाबत तक्रारी केल्या परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातले. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा पंचायत समिती कार्यालया समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंद्रकांत लोहकरे, सागर भोते, वामन लोहकरे, शंकर लोहकरे,श्रीकांत लोहकरे चंदर लोहकरे व राजापूर गाडेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.