शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागातील शेतकऱ्यांनी केली कंपनीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

(रविकिरण सासवडे) बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे ...

(रविकिरण सासवडे)

बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे कौशल्य आपण शिकले पाहिजे. याच जाणिवेतून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील १७० शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. या माध्यमातून गळीत धान्याच्या उत्पादनातून खाद्यतेल प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. तर, पुढील काळात या कंपनीच्या माध्यमातून ५०पेक्षा जास्त घरगुती तेलघाणे उभारून सर्वसामान्य शेतकऱ्याला उद्योजक बनवण्यासाठी कृषी विभागाने विडा उचलला आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जिरायती भागातील शेतीउत्पादन कायम अडचणीत येत असते. येथील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामध्ये कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकरी उद्योजक होण्यापूर्वी कच्च्या मालाबाबत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. जिरायती भागातील शेतकरी ज्वारी, बाजरी, चारा पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतात. यामध्ये आंतरपीक म्हणून करडई, भुईमूग, आदी पिकांचा अंतर्भाव केला जात असे. कृषी विभागाने मागील दोन हंगाम तेल बियांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे दिले होते. केवळ तीन ते चार महिन्यांत शेतकरी उत्पादन घेऊन सक्षम होऊ लागला होता. कंपनीने सध्या दोन तेल घाणे राजकोट येथून खरेदी केले आहेत. शेतकरी गटांना सामावून घेत, परिसरात तेल बियांचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

सध्या आमच्या शेतकरी कंपनीशी १७० शेतकरी जोडले गेले आहेत. यंदा आम्ही १०० एकर उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली होती. सध्या भुईमूग काढणीचे काम सुरू आहे. तर खरिपात ५० एकर करडई, १०० एकर सूर्यफुलाची पेरणी करण्यात येणार आहे. आपल्याकडे मिळणाऱ्या भूईमुगापासून कमी प्रमाणात तेलाची रिकव्हरी मिळत होती. त्यामुळे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हैदराबाद कृषी विद्यापीठामार्फत आम्हाला यंदा आयसीजीबी ३०४३ या वाणाचे भूईमुगाचे बियाणे मिळाले आहे. शेतकरी स्वत:च्या शेतातील तेलबियांचे तेल काढून विकत असल्याने आमच्याकडे मागणी देखील मोठ्याप्रमाणावर आहे.

- सुनील जगताप

संचालक

ॲग्रो स्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी, बारामती

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगात यशस्विपणे उतरणे गरजेचे आहे. जिरायती भागात तेल बियांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रक्रिया उद्योग उभारल्याने इतरांसाठी ते प्रेरणादायी आहेत.

दत्तात्रय पडवळ

तालुका कृषी अधिकारी, बारामती

बारामती तालुक्यातील तेल बिया

उत्पादनाची आकडेवारी( हेक्टरमध्ये )

तेलबिया २०१९-२० २०२०-२१

सोयाबिन ३१८.६० १५४२.९०

सूर्यफूल ३२.४० ८२.८०

भुईमूग ४३.१० ७१५.६०

करडई १५ ३६.६०

बारामती येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनी अंतर्गत सध्या तेल गाळपासाठी उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे.

३००६२०२१-बारामती-१४