शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

जिरायती भागातील शेतकऱ्यांनी केली कंपनीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

(रविकिरण सासवडे) बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे ...

(रविकिरण सासवडे)

बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे कौशल्य आपण शिकले पाहिजे. याच जाणिवेतून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील १७० शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. या माध्यमातून गळीत धान्याच्या उत्पादनातून खाद्यतेल प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. तर, पुढील काळात या कंपनीच्या माध्यमातून ५०पेक्षा जास्त घरगुती तेलघाणे उभारून सर्वसामान्य शेतकऱ्याला उद्योजक बनवण्यासाठी कृषी विभागाने विडा उचलला आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जिरायती भागातील शेतीउत्पादन कायम अडचणीत येत असते. येथील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामध्ये कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकरी उद्योजक होण्यापूर्वी कच्च्या मालाबाबत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. जिरायती भागातील शेतकरी ज्वारी, बाजरी, चारा पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतात. यामध्ये आंतरपीक म्हणून करडई, भुईमूग, आदी पिकांचा अंतर्भाव केला जात असे. कृषी विभागाने मागील दोन हंगाम तेल बियांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे दिले होते. केवळ तीन ते चार महिन्यांत शेतकरी उत्पादन घेऊन सक्षम होऊ लागला होता. कंपनीने सध्या दोन तेल घाणे राजकोट येथून खरेदी केले आहेत. शेतकरी गटांना सामावून घेत, परिसरात तेल बियांचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

सध्या आमच्या शेतकरी कंपनीशी १७० शेतकरी जोडले गेले आहेत. यंदा आम्ही १०० एकर उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली होती. सध्या भुईमूग काढणीचे काम सुरू आहे. तर खरिपात ५० एकर करडई, १०० एकर सूर्यफुलाची पेरणी करण्यात येणार आहे. आपल्याकडे मिळणाऱ्या भूईमुगापासून कमी प्रमाणात तेलाची रिकव्हरी मिळत होती. त्यामुळे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हैदराबाद कृषी विद्यापीठामार्फत आम्हाला यंदा आयसीजीबी ३०४३ या वाणाचे भूईमुगाचे बियाणे मिळाले आहे. शेतकरी स्वत:च्या शेतातील तेलबियांचे तेल काढून विकत असल्याने आमच्याकडे मागणी देखील मोठ्याप्रमाणावर आहे.

- सुनील जगताप

संचालक

ॲग्रो स्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी, बारामती

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगात यशस्विपणे उतरणे गरजेचे आहे. जिरायती भागात तेल बियांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रक्रिया उद्योग उभारल्याने इतरांसाठी ते प्रेरणादायी आहेत.

दत्तात्रय पडवळ

तालुका कृषी अधिकारी, बारामती

बारामती तालुक्यातील तेल बिया

उत्पादनाची आकडेवारी( हेक्टरमध्ये )

तेलबिया २०१९-२० २०२०-२१

सोयाबिन ३१८.६० १५४२.९०

सूर्यफूल ३२.४० ८२.८०

भुईमूग ४३.१० ७१५.६०

करडई १५ ३६.६०

बारामती येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनी अंतर्गत सध्या तेल गाळपासाठी उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे.

३००६२०२१-बारामती-१४