शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जिरायती भागातील शेतकऱ्यांनी केली कंपनीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

(रविकिरण सासवडे) बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे ...

(रविकिरण सासवडे)

बारामती : गुणवत्तापूर्ण शेतमाल पिकवण्याचे कसब आपल्या शेतकऱ्यांकडे आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून चांगल्या दराने विक्री करण्याचे कौशल्य आपण शिकले पाहिजे. याच जाणिवेतून बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील १७० शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी कंपनीची स्थापना केली आहे. या माध्यमातून गळीत धान्याच्या उत्पादनातून खाद्यतेल प्रक्रिया उद्योग उभारला जाणार आहे. तर, पुढील काळात या कंपनीच्या माध्यमातून ५०पेक्षा जास्त घरगुती तेलघाणे उभारून सर्वसामान्य शेतकऱ्याला उद्योजक बनवण्यासाठी कृषी विभागाने विडा उचलला आहे.

पाण्याच्या दुर्भिक्षामुळे जिरायती भागातील शेतीउत्पादन कायम अडचणीत येत असते. येथील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामध्ये कृषी विभागाची महत्त्वाची भूमिका आहे. शेतकरी उद्योजक होण्यापूर्वी कच्च्या मालाबाबत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. जिरायती भागातील शेतकरी ज्वारी, बाजरी, चारा पिकांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतात. यामध्ये आंतरपीक म्हणून करडई, भुईमूग, आदी पिकांचा अंतर्भाव केला जात असे. कृषी विभागाने मागील दोन हंगाम तेल बियांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे दिले होते. केवळ तीन ते चार महिन्यांत शेतकरी उत्पादन घेऊन सक्षम होऊ लागला होता. कंपनीने सध्या दोन तेल घाणे राजकोट येथून खरेदी केले आहेत. शेतकरी गटांना सामावून घेत, परिसरात तेल बियांचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

सध्या आमच्या शेतकरी कंपनीशी १७० शेतकरी जोडले गेले आहेत. यंदा आम्ही १०० एकर उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली होती. सध्या भुईमूग काढणीचे काम सुरू आहे. तर खरिपात ५० एकर करडई, १०० एकर सूर्यफुलाची पेरणी करण्यात येणार आहे. आपल्याकडे मिळणाऱ्या भूईमुगापासून कमी प्रमाणात तेलाची रिकव्हरी मिळत होती. त्यामुळे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने हैदराबाद कृषी विद्यापीठामार्फत आम्हाला यंदा आयसीजीबी ३०४३ या वाणाचे भूईमुगाचे बियाणे मिळाले आहे. शेतकरी स्वत:च्या शेतातील तेलबियांचे तेल काढून विकत असल्याने आमच्याकडे मागणी देखील मोठ्याप्रमाणावर आहे.

- सुनील जगताप

संचालक

ॲग्रो स्टार फार्मर प्रोड्युसर कंपनी, बारामती

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगात यशस्विपणे उतरणे गरजेचे आहे. जिरायती भागात तेल बियांचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रक्रिया उद्योग उभारल्याने इतरांसाठी ते प्रेरणादायी आहेत.

दत्तात्रय पडवळ

तालुका कृषी अधिकारी, बारामती

बारामती तालुक्यातील तेल बिया

उत्पादनाची आकडेवारी( हेक्टरमध्ये )

तेलबिया २०१९-२० २०२०-२१

सोयाबिन ३१८.६० १५४२.९०

सूर्यफूल ३२.४० ८२.८०

भुईमूग ४३.१० ७१५.६०

करडई १५ ३६.६०

बारामती येथील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनी अंतर्गत सध्या तेल गाळपासाठी उन्हाळी भुईमुगाची काढणी सुरू आहे.

३००६२०२१-बारामती-१४