शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

कंपन्या ‌उदंड पण यशस्वी होणाऱ्या मोजक्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कंपन्यांची संख्या बरीच असली तरी त्यातील फार थोड्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कंपन्यांची संख्या बरीच असली तरी त्यातील फार थोड्या कंपन्या यशस्वी झालेल्या दिसतात. योग्य मार्गदर्शनाचा अभाव तसेच मालाचा उठाव व बाजारपेठेची अनिश्चितता ही कारणे त्यामागे असल्याचे सांगितले जाते. केंद्र व राज्य सरकारकडून या संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जातात. मात्र, त्यात एकसुत्रता नाही. त्यामुळे गोंधळाचेच वातावरण असल्याचे दिसते आहे.

शेतकºयांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्थांची राज्यातील संख्या ३ हजारपेक्षा जास्त आहे. मात्र, त्यांची एकत्रित अशी नोंदणीच नाही. कृषी विभाग, त्यांची जिल्हा कार्यालये, फलोत्पादन, नाबार्ड, आत्मा, स्मार्ट या सरकारी विभागात कंपन्यांच्या उद्देशानुसार वेगवेगळी नोंदणी केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात या संस्थांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा इथे काही शेतकºयांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन केली आहे, मात्र ती संख्या कमी आहे. कंपनी कायद्याखाली शेतकरी उत्पादन कंपन्यांनी नोंदणी केली जाते, मात्र ती वर्षनिहाय असून विखूरलेली आहे. सध्या कागदोपत्री ३ हजार अशी संख्या दिसत असली तरीही त्यातील अगदीच मोजक्या संस्था खºया अर्थाने कंपनी म्हणून कार्यरत आहेत असे दिसते.

शेतकºयांनी यापद्धतीने एकत्र येऊन कंपनी स्थापन करावी यासाठी राज्य सरकारने सन २०१३ मध्ये कायदा केला. त्यानंतर पहिल्या चार ते पाच वर्षात राज्यात फक्त ५०० कंपन्यांची स्थापना झाली. त्यानंतर सन २०१७ पासून मात्र अशी कंपनी स्थापन करून मालाला बाजारपेठ शोधून त्याची विक्री करण्याला वेग आला. केंद्र व राज्य सरकारनेही याला साह्य करण्यासाठी म्हणून वेगवेगळे विभाग सुरू केले. मात्र एकच असे धोरण नसल्यामुळे या सगळ्यात एकसुत्रीपणा आला नाही असा कंपनी स्थापन करणाऱ्या काहीजणांचा आक्षेप आहे. एकत्र आलेल्यांना उत्तेजन मिळेल अश अनेक गोष्टींचा अभाव होता.

सरकारकडून अशा शेतकरी उत्पादन कंपन्यांना योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा असल्याचे काही कंपन्यांच्या प्रवर्तकांनी सांगितले. कंपनी म्हणून तर मार्गदर्शन हवेच असते, पण शेतकरी म्हणूनही कृषी विभागाकडून अनेक प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा असते. तसे होत नाही. विविध योजना जाहीर केल्या जातात, त्याच्या कर्ज, अनुदानात शेतकऱ्यांना अडकवले जाते व त्यानंतर त्याच्या पिकलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळाली नाही की ही जबाबदारी तुमची असे म्हणून त्याला दूर केले जाते असा अनुभव काहीजणांनी व्यक्त केला.