शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

संवाद साधा, मन मोकळे करून नकारात्मकता दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:13 IST

डमी ११३८ पुणे : कोरोनाकाळात आरोग्याबरोबरच सामाजिक, आर्थिक, भावनिक स्तरावर बरीच उलथापालथ झाली आहे. मानसिक ताणतणावातून कौटुंबिक, वैयक्तिक कलह ...

डमी ११३८

पुणे : कोरोनाकाळात आरोग्याबरोबरच सामाजिक, आर्थिक, भावनिक स्तरावर बरीच उलथापालथ झाली आहे. मानसिक ताणतणावातून कौटुंबिक, वैयक्तिक कलह वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नकारात्मकता दूर करण्यासाठी ‘संवाद साधा, मन मोकळे करा’, असाच सल्ला मानसोपचारतज्ज्ञांकडून दिला जात आहे. कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही. योग्य वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनातून नैराश्यावर नक्कीच मात करता येते, असेही त्यांनी सांगितले आहे. जवळच्या व्यक्तींशी बोलता येत नसल्यास अनेक स्वयंसेवी संस्थांनी हेल्पलाईनच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.

आयुष्यातील स्पर्धा जीवघेणी ठरते आहे. ताणतणाव वाढलेले असतानाच कोरोनाचे संकट आले आणि सर्वांच्याच आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. अनपेक्षित संकटाला तोंड देताना कोणाची नोकरी गेली, व्यवसाय बंद पडले, शिक्षण थांबले, तर कोणी अगदी जवळच्या व्यक्तींना गमावले. यातून अनेकांच्या जीवनात नैराश्याची दरी निर्माण झाली आहे. नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक उदाहरणेही आजूबाजूला पाहायला मिळत आहेत. मात्र, थोडा संवाद, थोडासा संयम, जवळच्या व्यक्तींची साथ आणि थोडे थांबण्याची तयारी यातून आत्महत्येसारख्या विचारावरही मात करता येऊ शकते, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.

आपले कुटुंब, मित्र-मैत्रिणी, प्रिय व्यक्ती हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. कोणत्याही कुटुंबात संवाद हा महत्त्वाचा दुवा असतो. संवादाची दरी निर्माण झाल्यास मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे एकमेकांची सुख-दु:खे समजून घ्या, वाईट परिस्थितीत एकमेकांचा भक्कम आधार व्हा, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पंकज साबणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

------------------

असे ओळखा नैराश्य :

* विनाकारण चिडचिड होणे

* एकलकोंडेपणा वाढणे

* वाईट विचार मनात येणे

* अतिझोप किंवा अजिबात झोप न येणे

* भूक न लागणे किंवा सारखी भूक लागणे

* सतत रडू येणे, नकारात्मकता वाढणे

-------------------------

काय आहेत उपाय?

* प्रत्येक प्रश्नाला, समस्येला उत्तर असतेच, यावर विश्वास ठेवा.

* जवळच्या व्यक्तींशी मनमोकळेपणाने बोला.

* योग्य वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनाचा मार्ग निवडा.

* आवडीच्या कामात, छंदात मन रमवा.

* सकारात्मक व्यक्तींशी गप्पा मारा, सकारात्मक विचार करा.