शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
3
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
5
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
6
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
7
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
9
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
10
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
11
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
12
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
13
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
14
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
15
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
16
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
17
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
18
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
19
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
20
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!

काँग्रेसच्या दिग्गजांत शीतयुद्ध

By admin | Updated: May 16, 2017 06:42 IST

दर पंचवार्षिकमध्ये महापालिकेत नगरसेवकांची संख्या कमी होत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी त्यातून काही शिकायला तयार नाहीत.

पुणे : दर पंचवार्षिकमध्ये महापालिकेत नगरसेवकांची संख्या कमी होत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी त्यातून काही शिकायला तयार नाहीत. सध्या फक्त ९ नगरसेवक असूनही गटनेते अरविंद शिंदे व माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यातील वाद पेटतच चालला असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील अनुपस्थितीबद्दल नोटीस देणारे शिंदे यांना उत्तर देताना बागुल यांनी त्यांच्या तक्रारींचा पाढा थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेच पाठवला आहे.मागील पंचवार्षिकमध्ये काँग्रेस सत्तेत होती. त्यांच्या नगरसेवकांची संख्या २९ होती. ती निवडणुकीत फक्त ९ इतकी झाली. तरीही त्या पंचवार्षिकमध्येच गटनेते असलेले शिंदे यांच्याच गळ्यात पदाधिकाऱ्यांनी पुन्हा गटनेतेपदाची माळ घातली. बागुल या वेळी सहाव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळेच या वेळी त्यांना पद मिळणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्यांचा राग आहे. त्यातच शिंदे यांनी त्यांना डावलणे सुरू केले आहे.कौटुंबिक कारणांमुळे बागुल महापालिकेच्या काही सभांना अनुपस्थित होते. त्याबद्दल शिंदे यांनी बागुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पक्षशिस्त भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर केला व खुलासा देण्यास सांगितले. ही नोटीस प्रत्यक्षात बागुल यांना मिळालीच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नोटिशीच्या केवळ बातम्या प्रसिद्ध करून शिंदे यांनी आपली प्रतिमा भंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आता त्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनाच धाडले असून, त्यात शिंदे यांच्या अशा वागण्यामुळेच पक्षाचे अस्तित्व क्षीण झाल्याचे नमूद केले आहे.आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ बागुल यांनी काही उदारहणेही दिली आहेत. आपण म्हणजेच पक्ष अशी शिंदे यांची महापालिकेत वागणूक असते. मागील ५ वर्षांत त्यांनी कधीही नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही; उलट त्यांच्यात भांडणे लावली. त्यामुळेच नगरसेवकांची संख्या कमी झाली. आपल्याशिवाय अन्य कोणत्या नगरसेवकाला अस्तित्वच राहू नये, यासाठी महापालिकेतील पक्षात असलेली पदे त्यांनी आपल्या अधिकारात रद्द करून टाकली, असे बागुल यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या या दोन दिग्गज नगरसेवकांचे हे शीतयुद्ध फक्त काँग्रेसच्याच नाही, तर अन्य पक्षांतील नगरसेवकांच्याही चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली, तरच आता यात काही होऊ शकते, अशी स्थिती आहे.