शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या दिग्गजांत शीतयुद्ध

By admin | Updated: May 16, 2017 06:42 IST

दर पंचवार्षिकमध्ये महापालिकेत नगरसेवकांची संख्या कमी होत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी त्यातून काही शिकायला तयार नाहीत.

पुणे : दर पंचवार्षिकमध्ये महापालिकेत नगरसेवकांची संख्या कमी होत असूनही काँग्रेसचे पदाधिकारी त्यातून काही शिकायला तयार नाहीत. सध्या फक्त ९ नगरसेवक असूनही गटनेते अरविंद शिंदे व माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यातील वाद पेटतच चालला असल्याचे दिसत आहे. महापालिकेतील अनुपस्थितीबद्दल नोटीस देणारे शिंदे यांना उत्तर देताना बागुल यांनी त्यांच्या तक्रारींचा पाढा थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडेच पाठवला आहे.मागील पंचवार्षिकमध्ये काँग्रेस सत्तेत होती. त्यांच्या नगरसेवकांची संख्या २९ होती. ती निवडणुकीत फक्त ९ इतकी झाली. तरीही त्या पंचवार्षिकमध्येच गटनेते असलेले शिंदे यांच्याच गळ्यात पदाधिकाऱ्यांनी पुन्हा गटनेतेपदाची माळ घातली. बागुल या वेळी सहाव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळेच या वेळी त्यांना पद मिळणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे त्यांचा राग आहे. त्यातच शिंदे यांनी त्यांना डावलणे सुरू केले आहे.कौटुंबिक कारणांमुळे बागुल महापालिकेच्या काही सभांना अनुपस्थित होते. त्याबद्दल शिंदे यांनी बागुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. पक्षशिस्त भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर केला व खुलासा देण्यास सांगितले. ही नोटीस प्रत्यक्षात बागुल यांना मिळालीच नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नोटिशीच्या केवळ बातम्या प्रसिद्ध करून शिंदे यांनी आपली प्रतिमा भंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आता त्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनाच धाडले असून, त्यात शिंदे यांच्या अशा वागण्यामुळेच पक्षाचे अस्तित्व क्षीण झाल्याचे नमूद केले आहे.आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ बागुल यांनी काही उदारहणेही दिली आहेत. आपण म्हणजेच पक्ष अशी शिंदे यांची महापालिकेत वागणूक असते. मागील ५ वर्षांत त्यांनी कधीही नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही; उलट त्यांच्यात भांडणे लावली. त्यामुळेच नगरसेवकांची संख्या कमी झाली. आपल्याशिवाय अन्य कोणत्या नगरसेवकाला अस्तित्वच राहू नये, यासाठी महापालिकेतील पक्षात असलेली पदे त्यांनी आपल्या अधिकारात रद्द करून टाकली, असे बागुल यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या या दोन दिग्गज नगरसेवकांचे हे शीतयुद्ध फक्त काँग्रेसच्याच नाही, तर अन्य पक्षांतील नगरसेवकांच्याही चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली, तरच आता यात काही होऊ शकते, अशी स्थिती आहे.