शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
15
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
16
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
17
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
18
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
19
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
20
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली

प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सीओईपीचा पुढाकार

By admin | Updated: July 27, 2015 04:02 IST

‘‘भूस्खलन हे प्रामुख्याने पाणी आणि माती यांच्यामुळे होते. पाण्याचा योग्य निचारा झाल्यास भूस्खलन टाळता येऊ शकते. त्यामुळे राज्यातील धोकादायक गावांचे

निनाद देशमुख ,पुणे‘‘भूस्खलन हे प्रामुख्याने पाणी आणि माती यांच्यामुळे होते. पाण्याचा योग्य निचारा झाल्यास भूस्खलन टाळता येऊ शकते. त्यामुळे राज्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. शासकीय यंत्रणांनी याचा अभ्यास करून धोक्याची पातळी निश्चित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास भविष्यात माळीण दुर्घटनेसारख्या घटना टाळता येतील़ अशा धोकादायक गावांचा अहवाल दिल्यास तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सीओईपीकडून पुढाकार घेतला जाईल़,’’ असा विश्वास माळीण पुनर्वसनाचे ‘टाऊन प्लॅनिंग’ करणारे सीईओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे प्रा. भालचंद्र बिरासदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.माळीण दुर्घटनेला ३१ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या गावाच्या पुनर्वसनासाठी आमडे गाव निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी पुण्यातील सीईओईपी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातर्फे गावाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या घटनेनंतर महसूल विभाग आणि सर्वे आॅफ इंडियातर्फे या परिसरातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार या गावाची धोक्याची पातळी निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती बिरासदार यांनी दिली. धोकादायक गावांचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, अशा गावांचे मॅपिंग करून धोक्याची पातळी निश्चित करता येऊ शकते. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य आहे. शासनाने अशी पाहणी करून धोकादायक गावांचा अहवाल दिल्यास तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ‘सीओईपी’तर्फे पुढाकार घेतला जाईल, असे ते म्हणाले. सर्व शासकीय नियम तपासून आमडे येथील पुनर्वसन करण्यात येत आहे. या गावाच्या विकास आराखड्यात कोणतीच तडजोड करण्यात आलेली नाही. एका आदर्श गावाच्या सर्व बाबी या आराखड्यात समाविष्ट आहेत.भविष्यात या ठिकाणी भूस्खलन होऊ नये, यासाठी या डोंगरांवर पाण्याचा निचरा करण्यासाठी पाट बांधण्यात येणार आहेत. ज्यामुळे डोंगरात पाणी मुरणार नाही. या बरोबरच जमिनीची धूप थांबवण्यासाठी या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे, त्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता कमी होईल, यात शासनाचा पुढाकार महत्त्वाचा आहे, आम्ही आमच्या पातळीवर मदत करण्यास तयार आहोत, असे बिरासदार यांनी सांगितले.