शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सहकारी बँकांना लाभांश वाटप निर्बंध नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:11 IST

पिंपरी : चालू आर्थिक वर्षात लाभांश वाटपावर बंदी घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जाहीर केला आहे. मात्र, ...

पिंपरी : चालू आर्थिक वर्षात लाभांश वाटपावर बंदी घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जाहीर केला आहे. मात्र, सहकारी आणि खासगी बँकिंग वेगळी असल्याने सहकारी बँकांना लाभांश न वाटण्याचे निर्बंध घालणे योग्य नसल्याचे मत दि महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.

मार्च अखेरीस संपणाऱ्या आर्थिक वर्षातील नफ्यावर लाभांश वाटण्यास मनाई करणारा आदेश आरबीआयने काढला आहे. व्यापारी बँकामधील भांडवली गुंतवणूक केवळ नफा कमावण्यासाठी केली जाते. सहकारी बँकांमधील गुंतवणूक ही आरबीआयच्या नियमानुसार कर्जाच्या काही टक्के गुंतवणूक असते. ती सक्तीची असते. व्यापारी बँकांमधील भांडवलाची बाजारात खरेदी-विक्री होते. तशी सहकारी बँकांची होत नाही. बँकिंग कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी बँकांना आपल्या सभासदांना भाग भांडवल परत करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सहकारी बँकांचे सभासद हे मालक असतात. त्यांना संस्थेच्या नफ्यातील हिस्सा मिळणे कायदेशीर अधिकार आहे.

६३० कोटी कर्जाच्या उलाढालीमुळे अर्थव्यवस्थेला मिळेल गती?

देशात १५४१ नागरी सहकारी बँकांकडे तेरा हजार कोटींचे भागभांडवल आहे. त्यात अ आणि ब वर्गातील बँकांची रक्कम ९०० कोटी होते. या रकमेच्या ७० टक्के रकमेचे म्हणजेच ६३० कोटींचे कर्ज वाटप झाल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल म्हणणे हास्यास्पद असल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.