शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांच्या उद्दिष्टाला सहकार खाते फासणार हरताळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:16 IST

सुकृत करंदीकर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तळेगाव (ता. वडगाव मावळ) येथील जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य कृषी पणन ...

सुकृत करंदीकर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तळेगाव (ता. वडगाव मावळ) येथील जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे असणाऱ्या १४० एकर जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी सहकार खाते दावणीला जुंपण्याचा प्रयत्न काही राजकारणी, धनदांडगे आणि बड्या बिल्डरांनी चालवला आहे. तसे झाल्यास तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ज्या उद्दिष्टासाठी पणन मंडळाला जमीन देऊ केली होती त्यालाच धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

अशोक सहकारी सामुदायिक शेतकी संघ मर्यादित या अस्तित्त्वात नसलेल्या संस्थेच्या आडून सोन्याची किंमत असणारी १४० एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न चालू आहे. या संस्थेचा एकही मूळ सभासद हयात नाही. शिवाय ही संस्थाच तब्बल २२ वर्षांपूर्वी सहकार खात्याने रद्द केली. तरी देखील ही संस्था पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न काही राजकारणी, धनदांडगे आणि बड्या बिल्डरांनी चालवला आहे. त्यामागे या जमिनीवरील हजार कोटी रुपयांच्या व्यावसायिक प्रकल्पाचे मोठे अर्थकारण असल्याचे सांगितले जाते.

राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर एप्रिल २०२१ मध्ये या १४० एकर जमिनीसंदर्भातली सुनावणी झाली. यावेळी अशोक सहकारी सामुदायिक शेतकी संघ मर्यादित या नोंदणीच रद्द झालेल्या संस्थेच्यावतीने संस्थेच्या हयात नसलेल्या सभासदांच्या वारसदारांनी ही संस्था पुनरुज्जीवित करण्याची मागणी केली. याच प्रकरणी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यात जिल्हा न्यायालयाने पणन मंडळाच्या बाजूने निकाल दिला. त्यावर संस्था पुनरुज्जीवित करू पाहणाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. तेथेही न्यायालयाने तडजोड हुकूमनामा केला. त्यानंतर अशोक संस्थेच्या वतीने संबंधितांनी सर्वोच्च न्यायालय गाठले. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगतिले. ही याचिका अजून सुनावणीस आलेली नाही. तत्पूर्वीच शासनाच्या ताब्यातील १४० एकरांवर पाणी सोडण्याची घाई सहकार खात्याकडूनच होत असल्याचे दिसत आहे.

चौकट

सहकार खाते कोणाच्या दावणीला?

तळेगावातील शासकीय जमीन लाटण्यासाठी सुरू असलेल्या अजब प्रकरणाची पोलखोल ‘लोकमत’ने शुक्रवारच्या (दि.२०) अंकात प्रसिद्ध केली. त्यानंतर सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणामागचा ‘राजकीय नेता’ कोण याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. गंभीर बाब म्हणजे सहकार कायदे धाब्यावर बसवून शासनाच्याच पणन मंडळाच्या विरोधात जाणारा निर्णय सहकार खात्यानेच कसा घेतला याबद्दलही सूरस कथा ऐकवल्या जात आहेत. आजोबा-पणजोबांचे दाखले देत येणाऱ्या अनेक वारसदारांसाठी रद्द झालेल्या हजारो सहकारी संस्था शासन याच प्रकारे पुन्हा जिवंत करणार का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.