शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

मुळा-मुठा काठ होणार स्वच्छ

By admin | Updated: June 12, 2016 06:05 IST

पुण्याचे वैभव असलेल्या मुळा-मुठेचा नदीकाठ आकर्षक करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पालिका हद्दीतील सुमारे ४१ किलोमीटर नदीकाठाचा विकास आराखडा तयार

पुणे: पुण्याचे वैभव असलेल्या मुळा-मुठेचा नदीकाठ आकर्षक करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पालिका हद्दीतील सुमारे ४१ किलोमीटर नदीकाठाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून, येत्या ५ महिन्यांत ते पूर्णत्वाला जाईल. त्यानंतर स्वयंसेवी संस्था, प्रत्यक्ष नदीकाठचे रहिवासी यांच्या सहमतीने व राज्य सरकारच्या मंजुरीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल.आयुक्त कुणाल कुमार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह शहरातील सर्व आमदार, पालिकेतील गटनेते यांना या कामाची सादरीकरणासह माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुणाल कुमार यांनी पुणे शहरासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगून पुढे काही अडचण येऊ नये, यासाठी आराखडा तयार करण्याच्या प्रक्रियेत स्वयंसेवी संस्था, सरकारी कार्यालये, लोकप्रतिनिधी यांच्याबरोबरच नदीकाठालगतच्या रहिवाशांनाही सामावून घेत असल्याची माहिती दिली.आराखडा तयार करण्यासाठी नदीकाठाचा सर्व टोपोग्राफिकल, जिओटेन्किकल, पर्यावरण, काठालगतच्या खासगी व सार्वजनिक जागा, अशा सर्व दृष्टीने अभ्यास करण्यात आला. नदीपात्र वगळून अन्य भागात उद्यान, मैदान, चौपाटी, चालणे, पळणे यासाठी स्वतंत्र जागा तयार करणे, पात्र विस्तारीकरणासाठी काही तांत्रिक उपाययोजना करणे, अशा विविध कामांचा यात समावेश असल्याचे आयुक्तांनी सांगितले. नदीत येणारे सांडपाणी बंद करण्यालाही यात प्राधान्य देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पाचे काम सुरू करण्याला खास मान्यता दिली आहे. त्यांच्या प्राधान्यक्रमात याचा समावेश आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सादरीकरण करण्यात आले. त्या वेळी त्यांनीही या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. पालकमंत्री बापट यांनी सरकार स्तरावर काही अडचणी असतील, तर त्या दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.पर्यावरण संवर्धनाचाच प्रकल्प असल्याने केंद्र सरकारचीही अडचण येणार नाही, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)नदीपात्रातील रस्ता होणार बंद?अभ्यासाचे काम आता पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष आराखडा तयार करण्यात येत आहे. तो करतानाच त्यात पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना यांनाही सामावून घेतले जाणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी सध्या प्रचलित असलेल्या कायद्याच्या चौकटीत राहून, तसेच नदीला कसलाही संसर्ग होणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणूनच लोकसहभाग घेण्यात येत आहे. संपूर्ण नदीपात्राचा एकच आराखडा तयार झाल्यावर तो राबविण्याची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रचलित कायद्यात बदल करता येणेही शक्य होईल, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. या कामात नदीकाठालगतचे सर्व अडथळे दूर करण्यात येतील. त्यात ओंकारेश्वर ते झेड ब्रीजपर्यंतचा नदीपात्रातील रस्ता बंद केला जाण्याची दाट शक्यता आहे.