शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

शिवरीत भरला २५ वर्षांनी वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:14 IST

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथे या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ...

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून येथे या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व विद्यार्थ्यांबरोबरच पंचवीस वर्षांपूर्वी जे शिक्षक या शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम करत होते ते सर्व शिक्षकही उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेचे सल्लागार समिती सदस्य शंकरराव कामथे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य सुदाम इंगळे, बळवंतराव गरुड, संकेत कामथे, एस. एन. खोबरे, पी.एन.बगाडे, पी. एस. साळवी, एन. एच. निकम, बापू वाटेगावकर, जयंतकुमार दाभाडे, जगदाळे यांच्यासह प्राचार्य शहाजी कोळेकर अनेक शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात रघुनाथ वाहुळ यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने सपत्निक सत्कार करण्यात आला, तर नवनाथ कामथे यांची शाळा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना तत्कालीन शिक्षकांनी यमाई मातेच्या मंदिरात भरणाऱ्या या शाळेत आपली नोकरीची सुरुवात झाली. नवीन विषय शिकवण्यास मिळाले, मुलांच्या मनावर चांगल्या गोष्टी बिंबवता आल्या, शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते अनुभवयास मिळाले, उत्कृष्ट विद्यार्थी घडविता आले, देणारा महान असतो पण घेणाराही गुणवंत असावा लागतो हे आजच्या सोहळ्यातून अनुभवयास मिळाले व मी समाजाचे देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविता आले याचे फार मोठे समाधान वाटत असल्याच्या अनेक प्रतिक्रिया आल्या.

सन्मानाला उत्तर देताना नवनाथ कामथे यांनी संस्थेला मदत करताना विद्यार्थीप्रिय उपक्रम राबवत पटसंख्या वाढवणे, स्पर्धापरीक्षेसाठी विद्यार्थी घडविण्यात भर देणार असल्याचे सांगितले. तर रघुनाथ वाहुळ यांनी २३ वर्षे या शाळेत सेवा करण्याची संधी मिळाली याची उतराई करत असताना दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.

भावी पिढीने पुढे येथे यावे, सुख-दुःख वाटण्याचे काम करावे, मुळ मातीशी प्रामाणिक राहा, संघटित राहा, गरीब मुलांना दत्तक घ्या व शाळेचे नाव चिरकाल टिकवण्याचा प्रयत्न करा, असे सुदामराव इंगळे यांनी सांगितले.

वयाच्या चाळिशीत, पंचवीस वर्षांनंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वजण जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता व पुन्हा तेच दिवस, तिच शाळा, तेच विद्यार्थी, तेच शिक्षक अविस्मरणीय क्षण आज अनुभवयास मिळाले व शाळा सोडताना सर्वांचा कंठ दाटून आल्याची भावना नीता कामथे-गायकवाड यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन अविनाश जाधव यांनी केले.

180821\1625-img-20210817-wa0042.jpg

२५ वर्षापूर्वीचे विध्यार्थी शिक्षक व इतर मान्यवर