शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पर्यटक सुखरुप असल्याचा कंपन्यांचा दावा

By admin | Updated: April 26, 2015 01:18 IST

नेपाळसह उत्तर भारतात विविध ठिकाणी गेलेल्या सहलींमधील सर्व पर्यटक सुखरुप असल्याचा दावा संबंधित पर्यटन कंपन्यांनी केला आहे.

पुणे : नेपाळसह उत्तर भारतात विविध ठिकाणी गेलेल्या सहलींमधील सर्व पर्यटक सुखरुप असल्याचा दावा संबंधित पर्यटन कंपन्यांनी केला आहे. तसेच काही कंपन्यांनी नेपाळला जाणाऱ्या सहली तेथील गंभीर परिस्थितीमुळे रद्द केल्या आहेत. उत्तर भारतातील सहली मात्र सुरळीतपणे चालू राहतील, अशी माहितीही कंपन्यांतर्फे देण्यात आली.नेपाळमध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर भारतातही काही राज्यांत भूकंपाचा धक्का बसला. या भागात फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या नेहमीच जास्त असते. सध्याही काही पर्यटन कंपन्यांच्या सहली या भागात आहेत. वीणा वर्ल्ड या कंपनीचे महाराष्ट्रातील २८ पर्यटक नेपाळमध्ये आहेत. तर उत्तर भारतातील सिक्कीम, दार्जिलिंग, भूतान या भागात ४०० पर्यटक आहेत. नेपाळमधील सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती वीणा वर्ल्डच्या प्रमुख वीणा पाटील यांनी दिली. त्या म्हणाल्या, की भूकंपामुळे काठमांडूमध्ये जास्त नुकसान झाले आहे. भूकंप झाला तेव्हा सर्व २८ पर्यटक काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात होते. मात्र, या पर्यटकांना काहीही झाले नाही. त्यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू आहे. अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींशी आम्हाला सतत सामोरे जावे लागते. हे सर्व पर्यटक आज (रविवारी) मुंबईत परतणार होते. काठमांडू विमानतळ बंद करण्यात आल्याने सध्या ते तिथेच राहतील. विमानतळ सुरू झाल्यानंतर त्यांना मुंबईत आणले जाईल. तसेच काही पर्यटक शनिवारी रात्री जाणार होते. उत्तर भारतातील सर्व सहली नियमितपणे सुरू राहतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)४केसरी टूर्सचे सुमारे २०० पर्यटक उत्तर भारत व नेपाळच्या सहलीसाठी निघाले होते. मात्र, भूकंपामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे नेपाळची सहल रद्द करण्यात आली आहे. या पर्यटकांना घेऊन नेपाळला जाणारे विमान लखनौमध्येच थांबविण्यात आले आहे. तेथून त्यांना थेट मुंबईत आणले जाईल. संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचा यात समावेश आहे, असे केसरी टूर्सच्या पुणे कार्यालयातून सांगण्यात आले. ४गिरीकंद ट्रॅव्हल्सचे सुमारे ४०० पर्यटक दार्जिलिंग, सिक्कीम, आसाम या भागात आहेत. त्यामध्ये सुमारे १५० पर्यटक पुण्यातील आहेत. शनिवारी काठमांडूला १२ ते १५ जणांचा ग्रुप दिल्लीहून जाणार होता. मात्र, आता त्यांना परत बोलावण्यात आले आहे. उत्तर भारतातील सर्व पर्यटक सुखरुप आहेत, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक सचिन गोसावी यांनी दिली.