शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

भोर शहरात पाणी, कचरा समस्या गंभीर

By admin | Updated: May 6, 2017 02:00 IST

नगरपलिकेला रिअटर इंडिया कंपनीने तीन घंटागाड्या देऊनही त्या सुरू न केल्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : नगरपलिकेला रिअटर इंडिया कंपनीने तीन घंटागाड्या देऊनही त्या सुरू न केल्यामुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे. यामुळे रोगराईत वाढ होत असून, नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक ठरत आहे.अपुरे कर्मचारी व अपुऱ्या घंटागाड्या यांमुळे भोर शहरातील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला होता. त्यामुळे नगरपलिकेला घंटागाड्यांची अत्यंत गरज होती. अशा वेळी रिअटर इंडिया लिमिटेड कंपनी (विंग, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी एक गाडी ५ लाख ७५ रुपये प्रमाणे सुमारे १७ लाख २५ हजार रुपये किमतीच्या भोर नगरपलिकेला ३ घंटागाड्या १४ एप्रिलला दिल्या आहेत. मात्र, त्याला २२ दिवस होऊनही अद्याप सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीगच्या ढीग साचत आहेत. कचऱ्यात मोकाट जनावरे फिरत असून, संपूर्ण कचरा रस्त्यावर येत आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. भोर शहरातील कचरा गोळा करण्यासाठी तीन घंटागाड्या आहेत. मात्र, त्या अपुऱ्या पडत असल्याने संपूर्ण शहरातील कचरा एका वेळी उचलला जात नाही. अजून गाड्यांची गरज होती. तीही आता पूर्ण झाली आहे. मात्र, सदरच्या गाड्यांवर चालकांची नेमणूक करणे, ठेका देणे ही कामे भोर नगरपलिकेकडून अद्याप झाली नाहीत. क चरा गोळा करणाऱ्या गाड्या चार-चार दिवस एका गल्लीत जात नसल्याने नागरिक घरातील कचरा रस्त्यावरील कचराकुंडीत टाकतात, तर काहींनी नवीन कचराकुंड्या तयार केल्या आहेत. नवीन तीन घंटागाड्या आल्या असून, त्यांवर चालक आणि कचरा उचलण्याचा ठेका देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम सुरू झाल्यावर शहरातील कचऱ्याची समस्या कायमची सुटणार आहे.- तृप्ती किरवे, नगराध्यक्ष, भोरकचरा शेतात... ४शहराबाहेर संरक्षक भिंत बांधून राहण्यास व गाडून खत करण्यासाठीची सोय केली होती. मात्र, हे सर्व मागील अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. कचराकुंडीतील कचरा रोजच्या रोज जाळला जात नसल्याने येथील कचरा वाऱ्याने उडून शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने त्याचा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. लोकमत न्यूज नेटवर्कभोर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपलिकेच्या पाईपलाईनची दुरुस्ती अद्याप झालीच नाही. त्यामुळे शहराला कमी दाबाने आणि दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत तसल्याने नागरिकांचे हाल सुरूच आहेत.गेल्या आठवड्यात भोर शहराला पाणीपुरवठा करणारी लाईन दोन ठिकाणी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र, एकाच ठिकाणची दुरुस्ती झाली असून शिवाजी विद्यालयाजवळची दुरुस्ती अद्याप झालेली नाही.भाटघर धरणावरून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी नवीन व जुनी अशा नळपाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. मात्र, जुनी नळपाणी पुरवठा योजना साधारणपणे २५ वर्षांपूर्वीची जुनी आहे. सिमेंटचे पाईप वापरण्यात आले असून पाईप खराब झाले आहेत. त्यामुळे वारंवार ती फुटते. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोटरशिवाय पाणीच चढत नाही. अनेकदा वीज नसल्यास पाणी भरताच येत नाही. शहरात ठराविक ठिकाणीच हातपंप वगळता नगरपलिकेच्या पाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. जुनी पाईपलाईन बदलून नियमित व अधिक दाबाने व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले जाते. मात्र, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही.मुख्य वाहिनीवरचे नळ कनेक्शन बंद करावेतभोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनवर अनेकांची नळ कनेक्शन आहेत. त्यांना तीन तास पाणीपुरवठा सुरू राहातो. यामुळे पाणी वाया जात आहे. तर, मुख्य लाईनवरुन अंर्तगत पाईपलाईन काढून त्यावरून घेतलेल्या कनेक्शनला एक तास आणि कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. दोेन्ही नागरिक पाणीपट्टी भरत असल्याने हा दुजाभाव का? त्यामुळे मुख्य लाईनवरची सर्व बेकायदा नळ कनेक्शन काढून टाकण्याची मागणी नागरिक करीत आहेत.