शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

सततच्या वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST

भिगवण: येथील बाजारपेठेतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत ...

भिगवण: येथील बाजारपेठेतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत असून याकडे पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. काहीच कारवाई होत नसल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, वाहतूककोंडीवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भिगवणजवळील २० च्यावर वाड्यावस्त्या आणि तीन तालुक्यातील नागरिक खरेदीच्या निमित्ताने भिगवण बाजारपेठेत येत असतात. तर भिगवणचा मासळी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. मासे खरेदीसाठी अनेक तालुक्यातील वाहने भिगवण बाजारात येत असतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून भिगवण शहराला वाहतूककोंडीच्या समस्येने बेजार केले आहे. एक किमी अंतराचा प्रवास करावयाचा म्हटले तरी कमीत कमी अर्धा तास वेळ लागत असल्याचे दिसून येते. बाजारपेठेतील व्यापारी आपला माल रस्त्यावर ठेवत आहे. यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढच सुरू असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी बांधकामे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे रस्त्यांना बोळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याकडे ग्रामपंचायत आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.

आंबेडकर चौक ते प्रदीप मेडिकल, वांझखडे हॉटेल ते पुणे-सोलापूर सर्विस रोड, संगम वाइन्स ,जोती मिसळ आणि नवी बाजारपेठ अशी नेहमी वाहतूककोंडी असणाऱ्या जागा असून याची माहिती पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे या वाहतूककोंंडीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अतिक्रमणांमुळे आधीच रस्ते व्यापलेले त्यातच अवैध पार्किंगमुळे त्यात आणखी भर पडत आहे. रस्त्यावरून चालणेदेखील नागरिकांना अशक्य होत आहे. काही दिवसांपूर्वी भिगवण शहरात सम-विषमतारखेप्रमाणे पार्किंग करण्याची योजना जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचे घोडं कुठं आडलं आहे हे मात्र, समजत नाही. तर दुसरीकडे पुणे-सोलापूर महामार्गावरच व्यावसायिकांची स्पर्धा सुरू असते. हे सर्वांनाच माहित आहे. पण तरीही ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे.