शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

सततच्या वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST

भिगवण: येथील बाजारपेठेतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत ...

भिगवण: येथील बाजारपेठेतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत असून याकडे पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. काहीच कारवाई होत नसल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, वाहतूककोंडीवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भिगवणजवळील २० च्यावर वाड्यावस्त्या आणि तीन तालुक्यातील नागरिक खरेदीच्या निमित्ताने भिगवण बाजारपेठेत येत असतात. तर भिगवणचा मासळी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. मासे खरेदीसाठी अनेक तालुक्यातील वाहने भिगवण बाजारात येत असतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून भिगवण शहराला वाहतूककोंडीच्या समस्येने बेजार केले आहे. एक किमी अंतराचा प्रवास करावयाचा म्हटले तरी कमीत कमी अर्धा तास वेळ लागत असल्याचे दिसून येते. बाजारपेठेतील व्यापारी आपला माल रस्त्यावर ठेवत आहे. यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढच सुरू असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी बांधकामे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे रस्त्यांना बोळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याकडे ग्रामपंचायत आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.

आंबेडकर चौक ते प्रदीप मेडिकल, वांझखडे हॉटेल ते पुणे-सोलापूर सर्विस रोड, संगम वाइन्स ,जोती मिसळ आणि नवी बाजारपेठ अशी नेहमी वाहतूककोंडी असणाऱ्या जागा असून याची माहिती पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे या वाहतूककोंंडीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अतिक्रमणांमुळे आधीच रस्ते व्यापलेले त्यातच अवैध पार्किंगमुळे त्यात आणखी भर पडत आहे. रस्त्यावरून चालणेदेखील नागरिकांना अशक्य होत आहे. काही दिवसांपूर्वी भिगवण शहरात सम-विषमतारखेप्रमाणे पार्किंग करण्याची योजना जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचे घोडं कुठं आडलं आहे हे मात्र, समजत नाही. तर दुसरीकडे पुणे-सोलापूर महामार्गावरच व्यावसायिकांची स्पर्धा सुरू असते. हे सर्वांनाच माहित आहे. पण तरीही ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे.