शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सततच्या वाहतूककोंडीने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST

भिगवण: येथील बाजारपेठेतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत ...

भिगवण: येथील बाजारपेठेतील वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. अनधिकृत बांधकामे, रस्त्यावर होणारे अतिक्रमण यामुळे बाजारपेठेत वाहतूककोंडी होत असून याकडे पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे. काहीच कारवाई होत नसल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, वाहतूककोंडीवर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भिगवणजवळील २० च्यावर वाड्यावस्त्या आणि तीन तालुक्यातील नागरिक खरेदीच्या निमित्ताने भिगवण बाजारपेठेत येत असतात. तर भिगवणचा मासळी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. मासे खरेदीसाठी अनेक तालुक्यातील वाहने भिगवण बाजारात येत असतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून भिगवण शहराला वाहतूककोंडीच्या समस्येने बेजार केले आहे. एक किमी अंतराचा प्रवास करावयाचा म्हटले तरी कमीत कमी अर्धा तास वेळ लागत असल्याचे दिसून येते. बाजारपेठेतील व्यापारी आपला माल रस्त्यावर ठेवत आहे. यासाठी व्यापाऱ्यांमध्ये चढाओढच सुरू असल्याचे दिसते. तर काही ठिकाणी बांधकामे रस्त्यावर आली आहे. त्यामुळे रस्त्यांना बोळाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याकडे ग्रामपंचायत आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.

आंबेडकर चौक ते प्रदीप मेडिकल, वांझखडे हॉटेल ते पुणे-सोलापूर सर्विस रोड, संगम वाइन्स ,जोती मिसळ आणि नवी बाजारपेठ अशी नेहमी वाहतूककोंडी असणाऱ्या जागा असून याची माहिती पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासनाला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे या वाहतूककोंंडीवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

अतिक्रमणांमुळे आधीच रस्ते व्यापलेले त्यातच अवैध पार्किंगमुळे त्यात आणखी भर पडत आहे. रस्त्यावरून चालणेदेखील नागरिकांना अशक्य होत आहे. काही दिवसांपूर्वी भिगवण शहरात सम-विषमतारखेप्रमाणे पार्किंग करण्याची योजना जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याचे घोडं कुठं आडलं आहे हे मात्र, समजत नाही. तर दुसरीकडे पुणे-सोलापूर महामार्गावरच व्यावसायिकांची स्पर्धा सुरू असते. हे सर्वांनाच माहित आहे. पण तरीही ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही हे दुर्दैव आहे.