शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गतिरोधकांनी मोडले नागरिकांचे कंबरडे

By admin | Updated: May 31, 2017 01:41 IST

बारामती न्गगरपालिकेच्या माध्यामतून शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर करण्यात आलेले गतिरोधक वाहनचालकांना अडचणीचेच ठरत आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : बारामती न्गगरपालिकेच्या माध्यामतून शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर करण्यात आलेले गतिरोधक वाहनचालकांना अडचणीचेच ठरत आहे. या गतिरोधकांची उंची आणि रूंदी जास्त आहे. मात्र, त्यावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या ओढल्याच नसल्याने अचानक दिसणाऱ्या गतिरोधकांनी ‘कंबरडे मोडल्याच्या’ तक्रारी वाढल्या आहेत. नव्या आणि जुन्या हद्दीत एकूण २४० गतिरोधक केले आहेत. काही ठिकाणी आवश्यकता नसतानाही गतिरोधके टाकल्याची तक्रार आहे. मात्र ज्या ठिकाणी मागणी आहे, तेथे गतिरोधक टाकण्यासाठी मात्र टाळाटाळच होत आहे. दोन वर्षांपूर्वीच नगरपालिकेने जवळपास २३ लाख ६५ रूपये खर्च करून फायबरचे गतिरोधक बारामतीच्या जुन्या हद्दीत बसवले. त्यानंतर लगेच रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे केलेला खर्च वाया गेला. ‘नगरपालिकेला निधी मिळतोय मोठा, मग काय, खर्चाला नाही तोटा’ अशा अविर्भात अगोदर फायबरचे गतिरोधक बसवले. फायबरच्या गतिरोधकांची अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच वाट लागली. केलेला खर्च वाया गेला, याला जबाबदार तरी कोण, अशी विचारणा नागरिक विचारत आहेत. त्यानंतर डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे रोडरोलरखाली फायबर गतिरोधकदेखील दबून गेले. त्यानंतर पुन्हा नगरपालिकेला उपरती आली. डांबरीकरणातून पुन्हा गतिरोधक करण्यात आले आहेत. या संदर्भात नगरपालिकेचे नगरअभियंता जीवन केंजळे यांनी सांगितले की, शहरात २४० गतिरोधक केले आहेत. वास्तविक सल्लागार अभियंत्यांनी त्याची पाहणी करण्याची गरज होती. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे उंची आणि रूंदी वाढल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.या गतिरोधकांची उंची आणि रूंदी जास्त झाल्याने वयोवृद्धांना त्याचा त्रास होत आहेच. त्याबरोबर मनक्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच रस्त्यावर जागोजागी गतिरोधक केल्यामुळे या त्रासाला समोरे जावे लागत आहे. प्रमाणापेक्षा जास्त उंचीमुळे मनक्याचे आजार जडल्याचे वाहनचालकांनी सांगितले. शहरातील वर्दळीच्या बाजारपेठेतच असंख्य गतिरोधक असल्याने तक्रारी वाढल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांचे अनेक वेळा अपघातनसरापूर : सिंहगडाच्या पायथ्याजवळील हवेली तालुक्यातील अवसरवाडी ते सिंहगड घाट रस्त्याची खड्ड्यांमुळे आणि साईडपट्ट्या उखडल्यामुळे दुरवस्था झाली आहे. यामुळे या भागातून सिंहगडाकडे जाणारे पर्यटक तसेच स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी याकरिता अनेकवेळा मागणी करूनही त्याकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. अवसरवाडी ते सिंहगड किल्ल्याचा रस्ता हा घाट मार्ग आहे. हा रस्ता वनविभागातून गेलेला आहे. यापूर्वी या घाट रस्त्याचे लोखंडी सळया टाकून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. हा घाट नादुरुस्त रस्ता वनखात्याच्या हद्दीतून गेला आहे. दरम्यानच्या कालावधीत शासनाच्यावतीने या रस्त्यावर टाकलेला निधी वनखात्याने रस्ता अडविल्याने व आडमुठेपणाच्या धोरणामुळे निधी परत गेल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. या वादातच या रस्त्याचे काम अनेक दिवस झाले रखडले आहे.सिंहगडावर जाण्यासाठी या घाट रस्त्याचा पर्यटक व ग्रामस्थ नेहमीच वापरतात. या घाट रस्त्याने कोंढणपूर, रहाटवडे, कल्याण व परिसरातील ग्रामस्थ डोणजेमार्गे पुण्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत असल्यामुळे या रस्त्यावर नेहमी नागरिकांची वर्दळ चालू आहे. या रस्त्याची खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी चाळण झाली आहे. तर काही ठिकाणी पुर्वीच्या रस्त्याखाली वापरण्यात आलेल्या लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत.  याकरिता या पावसाळ्यापूर्वी सिंहगड घाट रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून पावसाचे पाणी  वाहण्यासाठी गटारांची दुरुस्ती ताबडतोब संबंधीत प्रशासकिय विभागाने करावी, अशी  मागणी पर्यटकांसह ग्रामस्थांकडून केली आहे.  यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही महिन्यांतच रस्त्यावरील सिमेंट उखडून त्यातील लोखंडी सळया उघड्या पडल्या आहेत. यामुळे लहान-मोठी वाहने या सळ्यांत अडकून, वाहने ना-दुरुस्त होत असतात. यात प्रामुख्याने पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांचे अनेक वेळा अपघात झाल्याने अनेक स्थानिक नागरिक जखमीही झाले आहेत.आंबवडे खोऱ्यातील रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्यालोकमत न्यूज नेटवर्कनेरे : तालुक्यातील रस्त्यांच्या साईडपट्ट्या खचून रस्त्यावर खड्डे पडणे, रस्त्याचा साईडचा भरावा वाहून जाणे, हे तर नित्याचेच झाले आहे़ मात्र आंबवडे खोऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची फार मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने या भागातील हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून दररोज प्रवास करावा लागत आहे. येथून वाहन चालविणे म्हणजे एक प्रकारे अपघाताला निमंत्रण दिल्यासारखेच आहे की काय, असे वाहनचालकांना वाटू लागले आहे़चाळीसगाव खोऱ्यातील आंबेघरपासून कर्नावड, टिटेघर, कोर्ले, कारी ता़ भोरपर्यंतच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याची साईडपट्ट्या खचून, खड्डे पडून अतिशय गंभीर अशी अवस्था झाली आहे़ या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा तसेच साईडपट्ट्या खोलवर खचल्याने गाड्या चालविताना कसरत करावी लागते़ या रस्त्यावर वारंवार साईडपट्टीवरून गाडी खाली कोणी उतरवायची यासाठी वाहनचालकांचे तंटे होत असतात. तसेच अपघातही होत आसतात़ या मार्गावरून रायरेश्वर किल्ला, आंबवडेचा झुलता पुल तसेच कान्होजी जेधे यांचा वाडा पाहण्यासाठी दररोज पर्यटकांची गर्दी असते़ रस्त्याची दुरवस्था झाल्याने या भागात पर्यटकांची संख्या कमी होणार आहे़ येणारा पावसाळा सुरू होण्याआगोदर रस्त्याची दुरूस्तीे करण्यात यावी, अशी मागणी होत आहे़