शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

समाविष्ट गावांतील हरकती नाेंदवण्यासाठी नागरिकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:15 IST

यवत : पुणे महानगर विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) दौंड तालुक्यातील यवत, केडगावचा समावेश करण्यात आला आहे. पीएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या विकास ...

यवत : पुणे महानगर विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) दौंड तालुक्यातील यवत, केडगावचा समावेश करण्यात आला आहे. पीएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यावर हरकती नोंदवण्यासाठी या गावांतील नागरिकांची धावपळ सुरू आहे. कारण गाव एका टोकाला आणि तहसील कार्यालय दुसऱ्या टोकाला असल्याने नागरिकांची पुरती दमछाक होत आहे. त्यामुळे यवत येथे पीएमआरडीएचे क्षेत्रीय कार्यालय तत्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पीएमआरडीए अंतर्गत दौंड तालुक्यातील वरवंडपर्यंतची गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. पीएमआरडीएच्या वतीने समाविष्ट गावांमधील प्रारूप विकास आराखडा २ ऑगस्ट २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. विकास आराखड्यात दौंड तालुक्यातील यवत व केडगाव ही गावे अर्बन ग्रोथ सेंटर म्हणून म्हणून विकसित करण्याचे नियोजन केले आहे. यात यवत व केडगाव येथे कॉम्प्युटर टाऊन विकसित होणार असून, यासाठी निवासी व्यावसायिक व इतर सर्व प्रकल्पासाठी आरक्षणे विकास आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. संबंधित आरक्षणे व प्रस्तावित रस्त्यांबाबत जमीनमालकांना हरकती नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. नंतर शेतकऱ्यांनी याबाबत योग्य माहिती ऑनलाइन देखील उपलब्ध होत नसल्याची ओरड केल्यानंतर सदर मुदत आणखी १५ दिवस वाढवून देण्यात आली आहे. मात्र मुदत वाढवून मिळाली तरी हरकती घेण्यासाठी पुणे अथवा तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात जाण्याचे सांगितले जात आहे.

दौंड तालुक्यात पीएमआरडीएमध्ये समाविष्ट झालेली गावे एका टोकाला तर दौंड तहसील कार्यालय दुसऱ्या टोकाला अशी परिस्थिती आहे. वास्तविक पाहता यामुळे समाविष्ट गावांतील नागरिकांना यामुळे ४० किलोमीटर उलटा प्रवास करावा लागणार आहे. सन २०२१ ते २०४१ असा विकास आरखडा तयार करणाऱ्या पीएमआरडीएला संबंधित कार्यालय कुठे असल्यास लोकांना सोयीचे होईल याचेही नियोजन करता आलेले नाही. नागरिकांना सोईचे होईल अशा यवतमध्ये संबंधित क्षेत्रीय कार्यालय होणे आवश्यक आहे.

सद्य परिस्थितीत दौंड तहसील कार्यालयात पीएमआरडीएने दोन विभागीय अधिकारी नियुक्त करून तेथे हरकती नोंदविण्यास सांगण्यात आले आहे. तेच अधिकारी यवत येथील मंडल अधिकारी कार्यालयात बसल्यास डाळींबपासून वरवंडपर्यंत समाविष्ट असलेल्या अनेक गावांना मध्यवर्ती ठरणार आहे. असे झाल्यास नागरिकांची नाहक होणारी धावपळ थांबू शकते.

पीएमआरडीएने दौंड तहसील कार्यालयात त्यांचे दोन विभागीय अधिकारी नेमले आहेत. त्यांचेकडे संबंधित शेतकरी अथवा जमीनमालक हरकती नोंदवू शकतात. लोकांची अडचण होत असल्यास आणि पीएमआरडीएने सांगितल्यास संबंधित अधिकारी संबंधित सजा (मंडल) कार्यालयात नेमणूक करता येऊ शकते.

संजय पाटील, तहसीलदार, दौंड