शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 19, 2014 00:04 IST

बारामती शहरालगत असलेल्या जळोची हद्दीतील अंबिकानगर या भागातील नागरिकांना कचरा डेपोतील कचरा अवेळी पेटविल्याने त्रास सहन करावा लागत आहे

बारामती : बारामती शहरालगत असलेल्या जळोची हद्दीतील अंबिकानगर या भागातील नागरिकांना कचरा डेपोतील कचरा अवेळी पेटविल्याने त्रास सहन करावा लागत आहे. कचरा डेपो काही घरांच्या लगत आहे. हा कचरा अवेळी पेटविला जातो, त्यामुळे धुरांचे अक्षरश: लोट तयार होतात. या धुरांच्या लोटांमुळे रस्त्यावर जाणार्‍या-येणार्‍यांना रस्ताही दिसेनासा होतो, यामुळे नागरिकांना घरांचे दरवाजे बंद करून घ्यावे लागतात. सुक्या, ओल्या कचर्‍यामुळेही नागरिकांना घरांचे दरवाजे बंद करून घ्यावे लागतात. लहान मुलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. काहींना आजारी पडण्याचा धोका संभवतो. वृद्ध व्यक्तींना श्वसनाचे आजार होण्याचा धोका आहे. येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. अंबिकानगरचा रस्ता हा एक प्रकारचा जॉगिंग ट्रॅक बनला आहे; परंतु नागरिकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सकाळी व्यायामाला बाहेर पडणेही येथील नागरिकांनी सोडून दिले आहे. जे काही व्यावसायिक या परिसरात राहतात, त्यांच्या व्यवसायावर याचा परिणााम होत आहे. कचरा अवेळी पेटविला गेला तर नागरिकांना आपली दुकाने बंद करून घ्यावी लागत आहेत, याचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसत आहे. अंबिकानगर हे सर्व दृष्ट्या सोईस्कर आहे. व्यावसायिक व उद्योजकांची संख्या या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अठरा ते वीस वर्षांपासून ही समस्या सुरू आहे; परंतु नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. अंतर्गत रस्ते, बाह्य रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. सातत्याने नागरिकांनी पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या परिसरातील रहिवासी रश्मी शॉपीचे विशाल टाटिया यांनी सांगितले, की या परिसरातील नागरिकांनी आंदोलनेही केली होती. मात्र, काहीही परिणाम झाला नाही. या परिसरात हेल्थ क्लब व जिम आहेत. ते या समस्येला त्रासले आहेत. हेल्थ क्लब व जिमसारख्या आरोग्यासाठी सुविधाजनक गोष्टी या परिसरात आहेत. मात्र, कचर्‍याच्या समस्येमुळे नागरिक याचा उपभोग घेऊ शकत नाहीत. ‘विनसम जिम’ व त्याचप्रमाणे ‘कोर जिम’ या परिसरात आहे. आरोग्यासाठी हानिकारक कचरा या परिसरातून हलविण्यात यावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मंगळसूत्र चोरीचे प्रमाणही या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महिलांसाठी सुरक्षित असा हा परिसर नाही, याची दखल घेण्यात यावी. कचरा डेपो पेटविण्याच्या विरोधात नागरिकांनी मोर्चाही काढला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत कचरा पेटविला जातो, असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)