शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

चाळकवाडीत रुंदीकरण पाडले बंद

By admin | Updated: November 22, 2015 03:31 IST

पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी विरोध अजून सुरूच आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांची प्रथम मोजणी करून नुकसानभरपाई

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणासाठी विरोध अजून सुरूच आहे. ज्या बाधित शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित केल्या आहेत. त्यांची प्रथम मोजणी करून नुकसानभरपाई द्या, अशी मागणी करीत शनिवारी चाळकवाडी येथील ग्रामस्थांनी पुन्हा काम बंद पाडले.राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी साठ मीटर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना तशा नोटिसाही देण्यात आल्या आहेत. परंतु, चाळकवाडी येथे प्रस्तावित टोलनाका असल्याकारणाने शेतकऱ्यांची फसवणूक करून अतिरिक्त जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. ज्या अतिरिक्त जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या जमिनींच्या शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या नाहीत. असे असतानाच काम सुरू करण्यात आले आहे. साठ मीटरमध्येच टोलनाका करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. असे असतानाही साठ मीटरपेक्षा जास्त जमीन संपादित करण्यात का आली? असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या अतिरिक्त जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्या जमिनीची मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या वेळी आठ दिवसांत तुमच्या जमिनीची मोजणी करून देऊ, महामार्गावर काम बंद करू नका, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना काम करू दिले. मात्र, आठ दिवसांनंतर तुमच्या जमिनी तुम्हीच मोजा, असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.शनिवारी (दि. २१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बाधित शेतकरी आणि महिलांनी पुन्हा काम बंद केले. आमच्या अतिरिक्त संपादित केलेल्या जमिनी मोजून द्या. ज्या क्षेत्राच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत तेवढेच क्षेत्र संपादित करा. तसेच नुकसानभरपाई देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. आता काहीही झाले तरी आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला कुठे न्यायचे तिकडे न्या. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. (वार्ताहर)टोलनाका होता तेथेच?पूर्वी ज्या ठिकाणी टोलनाका होता त्या ठिकाणी लोकवस्ती आणि शाळा असल्याचे कारण देत हा टोलनाका पाचशे मीटर अंतरावर पुढे घेण्यात आला. परंतू हा टोलनाका चाळकवाडी गावच्या हद्दीतच नको, अशीच मागणी प्रथमपासून आहे. असे असतानाही हा टोलनाका अवघ्या पाचशेच मीटर अंतरावर घेण्याचे कारण काय? ज्या ठिकाणी टोलनाका होणार आहे त्या ठिकाणीही लोकवस्ती आहेच ना? मग हा टोलनाका पाचशे मीटर अंतरावर पुढे घेण्याचे नाटक कशासाठी? त्यापेक्षा हा टोलनाका पहिला ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी घेण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.