शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

चासकमानचे पाणी अजून पोहोचेना

By admin | Updated: May 1, 2017 02:23 IST

चासकमान धरणातून टेल टू हेड पाणी सोडण्यात आले आहे. मात्र अजून पाणी शेवटपर्यंत न पोहोचल्याने शिरूर

दावडी : चासकमान धरणातून टेल टू हेड पाणी सोडण्यात आले आहे. मात्र अजून पाणी शेवटपर्यंत न पोहोचल्याने शिरूर तालुक्यासाठी हे आवर्तन अजून किती दिवस चालणार, असा प्रश्न शेतकरी करू लागला आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना अजून आठ दिवस पाण्याची वाट पाहावी लागणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.धरणातून सोमवारपासून (दि. ३) डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. यामध्ये ४५ दिवस चालणाऱ्या ह्या आवर्तनामध्ये ५ दिवस पाणीवहनासाठी २० दिवस शिरूरसाठी व २० दिवस खेड तालुक्यासाठी असे नियोजन या आवर्तनाचे करण्यात आले होते. मात्र आता २५ दिवस उलटूनही अजून खेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पाणी खुले केले नाही. पाणीचोरी होऊ नये, म्हणून खेड तालुक्यात दावडी, निमगाव, रेटवडी, मांडवळा, टाकळकरवाडी येथे असलेल्या मोऱ्या-चाऱ्या मुरुम टाकून बंद करण्यात आल्या आहेत. तसेच डाव्या कालव्यावर असणाऱ्या कृषिपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कालव्यावरून पाणीचोरी करू नये, म्हणून रात्रंदिवस कालव्यावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. धरणामध्ये २०.५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात मे महिन्याचा विचार केला असता काटकसरीने वापर करणे गरजेचे असताना आता हे ४५ दिवसांचे आवर्तन १० दिवस वाढून ५५ दिवसांचे होणार का? की खेड तालुक्यासाठी फक्त १० दिवसच पाणी मिळणार, अशा चिंतेत शेतकरी आहेत.