शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

‘आठ’च्या आत घर गाठण्यासाठी नाटकांच्या वेळेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाटकाच्या रात्रीच्या प्रयोगांवर निर्बंध आले. त्यात आता रात्री आठनंतरच्या जमावबंदीच्या आदेशाची भर पडली. नाट्यरसिकांना ...

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाटकाच्या रात्रीच्या प्रयोगांवर निर्बंध आले. त्यात आता रात्री आठनंतरच्या जमावबंदीच्या आदेशाची भर पडली. नाट्यरसिकांना रात्री आठच्या आत घरी परतणे शक्य व्हावे यासाठी नाट्यप्रयोगाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार नाटकाचा प्रयोग सायंकाळी ५ ते सव्वासात या वेळेतच घ्यावा लागणार आहे.

रात्री आठ वाजल्यापासून जमावबंदीच्या आदेशाची रविवार (दि. २८)पासून अंमलबजावणी सुरू झाली. त्याकरिता महापालिकेच्या नाट्यगृहांसह खासगी नाट्यगृहांमध्ये दुपारी १२ ते ३ आणि सायंकाळी ५ ते साडेसात या वेळेत नियोजन करण्यात आले आहे.

नाट्यगृहातील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाल्याने पहिल्यांदाच नाट्यगृहात केवळ नाट्यप्रयोग होत आहेत. जमावबंदीमुळे नाटकांचे प्रयोग हे साडेसात वाजेपर्यंत संपविणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाट्यसंस्थांनी ही अट मान्य केली असून, त्यानुसार नाटकाच्या प्रयोगाची वेळ बदलली आहे. आता सायंकाळचा प्रयोग साडेपाचऐवजी पाच वाजता सुरू केला जातो.

बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारी (दि. २८) सायंकाळी ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा प्रयोग झाला. पाच वाजता सुरू झालेला प्रयोग मध्यंतर छोट्या कालावधीचा घेतल्यामुळे साडेसात वाजता संपला. त्यामुळे प्रेक्षकांना आठपूर्वी घरी पोहोचणे शक्य झाले, असे महापालिका रंगमंदिर मुख्य व्यवस्थापक सुनील मते यांनी सांगितले. त्याच धर्तीवर शुक्रवारी (२ एप्रिल) रोजी ‘नाथ हा माझा’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे २ एप्रिल रोजी ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ आणि ३ एप्रिल रोजी हिंदी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.