शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराच्या ओझ्याचे आव्हानच

By admin | Updated: November 12, 2015 02:37 IST

शाळांना शनिवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत असून, आता शाळा २३ तारखेलाच उघडणार आहेत. या सुट्ट्यांनंतर मिळणाऱ्या अवघ्या आठवड्यात मुख्याध्यापक दप्तराचे

पुणे : शाळांना शनिवारपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत असून, आता शाळा २३ तारखेलाच उघडणार आहेत. या सुट्ट्यांनंतर मिळणाऱ्या अवघ्या आठवड्यात मुख्याध्यापक दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार आणि त्या कशा राबवणार? प्रत्येक गोष्टीसाठी मुख्याध्यापकच कसा जबाबदार राहणार? असा सवाल विचारून मुख्याध्यापकांनी शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध केला. राज्य शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत कार्यवाहीसाठी शाळांना ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत शाळांनी दप्तराचे ओझे कमी करण्यावर उपाययोजना न केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व नियामक मंडळाने ठरविलेल्या संचालकांवर कारवाई केली जाणार असल्याचे परिपत्रक काढले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा भार कमी करण्यासाठी न्यायालयाने उपाययोजना सुचविल्या असून, दप्तराचे प्रमाणही ठरवून दिले आहे. मुलांच्या वजनाच्या १० टक्यांपेक्षा कमी दप्तराचे ओझे असावे, असा निकष ठरवून दिला आहे. विविध उपाय सांगून शासनाने २१ जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला होता. मात्र, वेळोवेळी सूचना देऊनही विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी होत नसल्याने शासनाने पुन्हा ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यवाहीचा आदेश दिला आहे. मात्र, मुळातच प्राथमिक व माध्यमिक शाळांना ८ ते २२ नोव्हेंबर दिवाळी सुट्टी असणार आहे. त्याच दरम्यान राज्य शासनाने नवे परिपत्रक काढून, दप्तराचे ओझे कमी करण्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहे. शासनानी सुचविलेल्या उपाययोजनांची शाळांनी ३० पर्यंत अंमलबजावणी करणे अनिवार्य केले आहे. मात्र, सुट्ट्यांचा कालावधी आणि सातत्याने मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्याच्या शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांमध्ये नाराजीचा सूर आहे.मुख्याध्यापक संघाचे राज्याचे अध्यक्ष अरुण थोरात म्हणाले, ‘‘शनिवारपासून दिवाळी सुट्टी आहे. १५ दिवस सुट्ट्यांतच जाणार. अशा परिस्थितीत ३० नोव्हेंबरपर्यंत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी कार्यवाही करणे शक्य नाही. ही कार्यत्वाही पूर्ण न करणाऱ्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरणे चूकच आहे.’’