शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे लसीकरण धोरण राज्याच्या नुकसानीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संकटकाळातही राजकारण शोधणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरणाबाबतचे धोरण महाराष्ट्राच्या नुकसानीचे होत असल्याची टीका काँग्रेसचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संकटकाळातही राजकारण शोधणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरणाबाबतचे धोरण महाराष्ट्राच्या नुकसानीचे होत असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली.

राज्यात दुस-या लाटेने थैमान मांडलेले असताना लसींचा फक्त ३ दिवस पुरेल इतका साठा हा त्याच धोरणाचा परिणाम असल्याचे गाडगीळ म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीरपणे लसींच्या साठ्याविषयी विधान केले आहे. वास्तविक महाराष्ट्राला अधिक लस पुरवण्याची गरज आहे. बाधित जिल्ह्यांत सर्वांना लसीकरण करण्याची केंद्राने परवानगी देणे आवश्यक आहे. मात्र, यासंदर्भातील सर्व अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवले आहेत, अशी टीका गाडगीळ यांनी केली.

भारत बायोटेक व सिरम या कंपन्यांची वर्षाला फक्त अडीच कोटी लस निर्माण करण्याची क्षमता आहे. या गतीने १२५ कोटी भारतीयांना लस मिळण्यास अनेक वर्षे लागतील. त्याचा विचार करून धोरण बदलण्याची गरज असताना परदेशात प्रभावी ठरलेल्या लस कंपन्यांना भारतात परवानगी नाकारून केंद्र सरकार नको तिथे आत्मनिर्भरता का दाखवत आहे, असा प्रश्न गाडगीळ यांनी केला.

केंद्र सरकार असे वागत आहे तर राज्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते सामाजिक भान हरवून आंदोलने करत आहेत. सहकार्याची भाषा करायची व पुण्यासारख्या शहरात रस्त्यावर आंदोलने करायची असा दुतोंडीपणा भाजप नेते करत असल्याची टीका गाडगीळ यांनी केली.