शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

केंद्राचे लसीकरण धोरण राज्याच्या नुकसानीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संकटकाळातही राजकारण शोधणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरणाबाबतचे धोरण महाराष्ट्राच्या नुकसानीचे होत असल्याची टीका काँग्रेसचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संकटकाळातही राजकारण शोधणाऱ्या केंद्र सरकारचे लसीकरणाबाबतचे धोरण महाराष्ट्राच्या नुकसानीचे होत असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली.

राज्यात दुस-या लाटेने थैमान मांडलेले असताना लसींचा फक्त ३ दिवस पुरेल इतका साठा हा त्याच धोरणाचा परिणाम असल्याचे गाडगीळ म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीरपणे लसींच्या साठ्याविषयी विधान केले आहे. वास्तविक महाराष्ट्राला अधिक लस पुरवण्याची गरज आहे. बाधित जिल्ह्यांत सर्वांना लसीकरण करण्याची केंद्राने परवानगी देणे आवश्यक आहे. मात्र, यासंदर्भातील सर्व अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवले आहेत, अशी टीका गाडगीळ यांनी केली.

भारत बायोटेक व सिरम या कंपन्यांची वर्षाला फक्त अडीच कोटी लस निर्माण करण्याची क्षमता आहे. या गतीने १२५ कोटी भारतीयांना लस मिळण्यास अनेक वर्षे लागतील. त्याचा विचार करून धोरण बदलण्याची गरज असताना परदेशात प्रभावी ठरलेल्या लस कंपन्यांना भारतात परवानगी नाकारून केंद्र सरकार नको तिथे आत्मनिर्भरता का दाखवत आहे, असा प्रश्न गाडगीळ यांनी केला.

केंद्र सरकार असे वागत आहे तर राज्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते सामाजिक भान हरवून आंदोलने करत आहेत. सहकार्याची भाषा करायची व पुण्यासारख्या शहरात रस्त्यावर आंदोलने करायची असा दुतोंडीपणा भाजप नेते करत असल्याची टीका गाडगीळ यांनी केली.