शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

‘एफटीआय’च्या विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारची दडपशाही

By admin | Updated: August 20, 2015 02:22 IST

केंद्र सरकारने समाजमनावर थेट प्रभाव पाडणाऱ्या देशातील प्रमुख संस्था बंद करण्याचा घाट घातला आहे. ‘एफटीआयआय’ संस्थेतील आंदोलन करणाऱ्या

पुणे : केंद्र सरकारने समाजमनावर थेट प्रभाव पाडणाऱ्या देशातील प्रमुख संस्था बंद करण्याचा घाट घातला आहे. ‘एफटीआयआय’ संस्थेतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करून दडपशाही सुरू केली आहे. ही सुरुवात असून, सरकारकडून यापुढे शिक्षण संस्था व माध्यम संस्था टार्गेट करण्याचा कार्यक्रम राहणार आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी बुधवारी केली. शहर काँग्रेस कमिटीतर्फे ‘राजीव गांधी जीवनदर्शन’ या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते घोले रस्ता आर्ट गॅलरी येथे झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, उपमहापौर आबा बागुल, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, आमदार शरण रणपिसे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, नगरसेवक संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, मुख्तार शेख, नीता रजपूत आदी उपस्थित होते. एनएसयूआयचे अतुल म्हस्के व छायाचित्रकार सुशील राठोड यांनी जीवनदर्शनाची संकल्पना साकारली. २५ वर्षांतील १५० दुर्मिळ फोटोंचा प्रदर्शनात समावेश आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एफटीआयच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मात्र, केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा त्यांना अटक करण्याची कारवाई दुर्दैवी आहे. एफटीआय नव्हे, तर देशातील बँका व संशोधन संस्थावर चुकीच्या व्यक्तींची नियुक्ती करून खोटारडा कारभार सुरू आहे. सेबीमध्ये लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या बंधूची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सरकारला कंटाळून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, राजीव गांधी यांनी देशातील विज्ञान व तंत्रज्ञान विकासासाठी अनेक शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे संगणकयुगाला सुरुवात झाली. महिला आरक्षणाचा पहिल्यांदा निर्णय घेतला. गेल्या ६० वर्षांत काँग्रेस सरकारने हे करून दाखविले आहे, असे मोहन प्रकाश यांनी सांगितले. राजीव गांधी यांच्या कारभारावर टीका करणारे भाजपच्या तत्कालीन नेत्यांनी पुन्हा त्यांचे कौतुक केले होते. त्याप्रमाणे काँग्रेसवर टीका करणारांवर ही वेळ येणार आहे, असे उल्हास पवार यांनी सांगितले. अ‍ॅड. अभय छाजेड यांनी प्रास्ताविक केले. आबा बागुल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)