शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

बैलगाडा मालकांवर दाखल असलेले खटले मागे घेणार: गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:13 IST

मंचर उपजिल्हा रुग्णालयात नूतन सुविधांचे लोकार्पण वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत ...

मंचर उपजिल्हा रुग्णालयात नूतन सुविधांचे लोकार्पण वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. संजोग कदम, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक हर्षल मोरडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, विष्णूकाका हिंगे, विवेक वळसे पाटील, सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, अरुण गिरे, सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेल आदी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले की, बैलगाडा प्रश्नावर कुणीही राजकारण करू नये. या शर्यती सुरू राहाव्यात यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे. राज्य सरकारची हीच भूमिका आहे. मात्र, बैलगाडा मालकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. बैलगाडा शर्यतीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील तीन वर्षांपासून त्यावर सुनावणी झाली नव्हती. कोरोना असल्यामुळे न्यायालयात हा विषय आला नाही. मात्र, आता सरकारी वकील सचिन पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. सरकारने न्यायालयात भूमिका मांडण्यासाठी मोठे वकील दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती रद्द करून शर्यत सुरू करणे हा एकमेव मार्ग असून बैलगाडा मालकांनी विनाकारण गैरसमज करून घेऊ नये. न्यायालयाचा निर्णय झाल्याशिवाय शर्यतीचा प्रश्न सुटणार नाही. केंद्र सरकारने बैलाचा समावेश संरक्षित प्राण्यांच्या यादीमध्ये केला आहे. तेथून बैल हा शब्द वगळल्यास फायदा होईल. बैलगाडा मालकांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेऊ, सर्वांची त्यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न राहील. मात्र, बैलगाडा मालकांनी नवीन खटले दाखल होणार नाही याची काळजी घ्यावी. असे सांगून वळसे पाटील म्हणाले की, कोरोना गेला असा काहींचा समज झाला आहे. मात्र, जगात अनेक देशात तिसरी लाट आली असून, महाराष्ट्रालाही तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे मुख्यमंत्री नेहमी सांगतात. सर्व काही सुरू राहावे असा आग्रह आपण करतो. मात्र, लग्न समारंभ, दशक्रिया विधी, साखरपुडा या कार्यक्रमांमध्ये गर्दी वाढत असून त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली आहे.

शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, बैलगाडा शर्यतीसंदर्भात राजकारण सोडून सर्वजण एकत्र येऊ विशेष करून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैलगाडा मालकांची समजूत काढली पाहिजे. सांगली भागात शर्यत झाली. ओझर येथे बैठक झाली. या बैठकीत पंधरा दिवसात शर्यती होतील, असे सांगितले आहे. तामिळनाडू राज्यात आंदोलन झाल्यानंतर जलीकट्टूला परवानगी मिळाली. महाराष्ट्रात शर्यतींना परवानगी मिळाली नाही तर पंधरा दिवसांत शर्यत भरवावी लागेल, असे विधान मी केले. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले की, कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात ७५ खासगी डॉक्टरांनी अहोरात्र सेवा केली आहे. मानवतेच्या दृष्टीने येथे रुग्णांवर उपचार केले जातात. यावेळी कार्डियाक रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला. कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. माजी आमदार पोपटराव गावडे, डी. के. वळसे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबादास देवमाने यांनी प्रास्ताविक केले. पूजा थिगळे हिने सूत्रसंचालन, तर पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले यांनी आभार मानले.