शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बटन दाबलं... अन् या ठाकरवाडीचा अंधकार कायमचा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST

बटन दाबलं... अन् या ठाकरवाडीचा अंधकार कायमचा दूर झालाय. घरात पहिल्यांदा वीज आल्यानंतर या गावातील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा ...

बटन दाबलं... अन् या ठाकरवाडीचा अंधकार कायमचा दूर झालाय. घरात पहिल्यांदा वीज आल्यानंतर या गावातील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा हा आनंद..... हा आनंद सोहळा आहे.

खेड तालुक्यातील मेदनकरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या ठाकरवाडी येथे आदिवासी वस्ती प्रस्थापित झाल्यानंतर तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच विजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र आहे.

गावापासून अगदी दीड किलोमीटर अंतरावर ७० ते ८० लोकसंख्येची वस्ती असलेल्या या परिसरात वीज दहा वर्षांपूर्वी वितरित झाली होती. मात्र काही दुर्लक्षामुळे व तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दहा वर्षांपासून येथील नागरिक अंधारातच राहत होते.

येथील नागरिकांनी विजेसंदर्भात वेळोवेळी शासनदरबारी हेलपाटे मारून, निवेदने देऊन व समस्या मांडूनही या समस्येकडे दुर्लक्षच होत गेले.

काही तांत्रिक अडचणींमुळे मात्र येथे महावितरणची वीज पोहोचू शकली नव्हती.

आदिवासी वस्तीवरील नागरिकांनी व येथील ग्रामस्थ आदींनी या समस्येच्या संदर्भात वेळोवेळी पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन यांच्याकडे मागणी केली होती. या समस्येची दखल घेत 'वसा जनसेवेचा निश्चय विकासाचा' या युक्तीप्रमाणे त्यांनी महावितरण विभागाशी पत्रव्यवहार करून व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी वीज पोहोचवली गेल्याने येथील आदिवासी नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. महावितरणचे अधिकारी राहुल ढेरे आणि मेदनकरवाडी गावचे माजी उपसरपंच महेंद्र मेदनकर, ग्रामपंचायत मेदनकरवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्युतीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याला चाकण महावितरण मंडळाचे राहुल ढेरे, उद्योजक गणेश बोत्रे, सरपंच अमोल साळवी, माजी उपसरपंच महेंद्र मेदनकर, उपसरपंच गणेश भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य संजय वाघमारे, संदीप मेदनकर, भगवान मेदनकर, शेखर मेदनकर, संभाजी मेदनकर, विजय मेदनकर, अमित मेदनकर, अजित मेदनकर, गणेश मेदनकर, मयूर मेदनकर, ओंकार मेदनकर, राहुल खडके, पप्पू आरुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

बाबाजी ठाकर -

आमच्या परिसरात गेल्या दहा वर्षांपूर्वीच वीज पोहोचली होती, मात्र आमच्या वस्तीवर महावितरण विभागाला काही तांत्रिक अडचणींमुळे वीज पोहोचत नव्हती. आम्ही वेळोवेळी शासनदरबारी मागणी करूनही आजपर्यंत वीज पोहोचत नव्हती. या संदर्भात पै. गणेश बोत्रे युथ फाऊंडेशन यांच्याकडे मागणी केली होती. याची दखल घेत आमच्या वस्तीवर दहा वर्षांनंतर वीज पोहोचल्याने आनंद व्यक्त होत आहे.

ठाकरवाडी येथे पहिल्यांदाच विजेचा दिवा लागल्याने नागरिकांचा आनंद गगनात मावेना.