शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...

भारनियमनाने कोलमडला शेतकरी

By admin | Updated: May 6, 2017 02:05 IST

शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना भारनियमनाचा ‘शॉक’ बसला आहे. याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक तुषार झेंडे यांनी महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरू केले आहे.यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. पाणीटंचाईचे संकट आहेच. त्याचबरोबर शेतीमालाचे दरही कोसळल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्याआत्महत्येचे लोण बारामती तालुक्यातदेखील आले आहे. आतापर्यंत तीन शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून राजकीय रणकंदन सुरू असतानाचा विजेच्या तुटवड्यामुळे तातडीने भारनियमन सुरू केले आहे. सध्या सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत ग्रामीण भागात भारनियमन सुरू करण्यात आल्याचे बारामती परिमंडलाच्या सूत्रांनी सांगितले. या भारनियमनामुळे आंदोलने करून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या आवर्तनाचे पाणीदेखील शेतकऱ्यांना घेता येत नाही, अशी स्थिती आहे. भारनियमनाच्याविरोधात शेतकरी संतापले आहेत. या भारनियमनाच्याविरोधात ग्राहक पंचायतीचे संघटन तुषार झेंडे यांनी भारनियमनाची पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. विद्युत नियामक आयोग व विद्युत कायदा २००३ च्यानुसार ही कृती आक्षेपार्ह आहे. त्यामुळे भारनियमन न थांबवल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. १महावितरणच्या बारामती मंडलात बारामती ग्रामीण, वालचंदनगर, इंदापूर या उपविभागातील गावांमध्ये १० ते १२ तासांचे अतिरिक्त वीज भारनियमन सुरू केले आहे. सिंगल फेज, थ्री फेज अशा सर्व प्रकारचा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. २पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मात्र या अघोषित भारनियमनामुळे अतिशय नाराजीची भावना असून हे भारनियमन तातडीने बंद करावे असे ठराव गावागावांत होत आहेत.