शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

भारनियमनाने कोलमडला शेतकरी

By admin | Updated: May 6, 2017 02:05 IST

शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन

लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शेतीमालाचे घसरलेले दर, उन्हाचा चटका, दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असतानाच वीज महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भरच पडली आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना भारनियमनाचा ‘शॉक’ बसला आहे. याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संघटक तुषार झेंडे यांनी महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरू केले आहे.यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक आहे. पाणीटंचाईचे संकट आहेच. त्याचबरोबर शेतीमालाचे दरही कोसळल्याने शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्याआत्महत्येचे लोण बारामती तालुक्यातदेखील आले आहे. आतापर्यंत तीन शेतकऱ्यांनी नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून राजकीय रणकंदन सुरू असतानाचा विजेच्या तुटवड्यामुळे तातडीने भारनियमन सुरू केले आहे. सध्या सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत ग्रामीण भागात भारनियमन सुरू करण्यात आल्याचे बारामती परिमंडलाच्या सूत्रांनी सांगितले. या भारनियमनामुळे आंदोलने करून सोडण्यात आलेल्या कालव्याच्या आवर्तनाचे पाणीदेखील शेतकऱ्यांना घेता येत नाही, अशी स्थिती आहे. भारनियमनाच्याविरोधात शेतकरी संतापले आहेत. या भारनियमनाच्याविरोधात ग्राहक पंचायतीचे संघटन तुषार झेंडे यांनी भारनियमनाची पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. विद्युत नियामक आयोग व विद्युत कायदा २००३ च्यानुसार ही कृती आक्षेपार्ह आहे. त्यामुळे भारनियमन न थांबवल्यास ग्राहक न्यायालयात तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. १महावितरणच्या बारामती मंडलात बारामती ग्रामीण, वालचंदनगर, इंदापूर या उपविभागातील गावांमध्ये १० ते १२ तासांचे अतिरिक्त वीज भारनियमन सुरू केले आहे. सिंगल फेज, थ्री फेज अशा सर्व प्रकारचा विद्युत पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. २पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मात्र या अघोषित भारनियमनामुळे अतिशय नाराजीची भावना असून हे भारनियमन तातडीने बंद करावे असे ठराव गावागावांत होत आहेत.