शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पुरंदरमधील बंडोबा अखेर झाले थंड

By admin | Updated: February 14, 2017 01:46 IST

पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या २७ जणांनी, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या २७ जणांनी, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या ६३ जणांनी आज अर्ज माघारी घेतले आहेत. तरीही, कोळविहीरे- नीरा गटातून राष्ट्रवादीच्या सुजाता दगडे आणि कोळविहीरे गणातून राष्ट्रवादीचेच सुरेश जगताप यांनी बंडखोरी केलीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.पुरंदरच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजपा-मनसे अशी चौरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेसाठी ४५ आणि पंचायत समितीसाठी १०१ एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज यातील प्रत्येकी २७ आणि ६३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने जिल्हा परिषदेसाठी १८ आणि पंचायत समितीसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. काहींनी भाजपाची ही उमेदवारी घेतली आहे. तर, काहींनी अजूनही उमेदवारी ठेवून पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली आहे. असे असले, तरीही काल अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यात बेलसर -माळशिरस आणि कोळविहीरे-नीरा गटात सभा घेऊन बंडखोरांना सज्जड दम दिला होता, तसेच समजावण्याचाही प्रयत्न केला होता. वाघापूर येथील सभेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते यांचे नाव न घेता शरद पवारांमुळे अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे अस्तित्व आहे तसेच तुमचे आहे. साहेबांनी एवढे देऊनसुद्धा पक्षांविरुद्ध बंड करता आहात. हीच का तुमची निष्ठा? अशा भाषेत सुनावले होते. आज अर्जमाघारीच्या दिवशी विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला असला, तरीही पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार की नाही, हे समजू शकले नाही. तर, याच गटाच्या माळशिरस गणासाठी राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष महादेव शेंडकर यांनी बंडखोरी करून पत्नी मीना यांचा भाजपाकडून अर्ज भरला होता. अजित पवारांच्या सूचनेवरून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे भाजपाची गोची झाली आहे. या गणातील पक्षाच्या एका अधिकृत उमेदवारानेच माघार घेतली आहे. नीरा-कोळविहीरे गट वगळता सर्वच ठिकाणचे बंडखोर थंड झाल्याचेच आज निदर्शनास आले. कोळविहीरे-नीरा गटात सर्वाधिक जास्त उमेदवारी अर्ज होते. आज अनेकांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले; मात्र ६ महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देऊन पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता दगडे आणि त्यांचे पती डॉ. वसंत दगडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी देण्याचा आपल्याला शब्द दिला होता; परंतु डावलले गेल्याने सुजाता दगडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याबरोबर कोळविहीरे गणातही गुळुंचे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश जगताप यांनीही शब्द देऊनही डावलल्याचा आरोप करून आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. कोळविीहीरे येथील सभेत अजित पवार यांनी त्यांचे नाव घेऊन बंडखोरी करू नये, असे सांगितले होते. तरीही त्यांनी उमेदवारी ठेवली आहे. वीर गणात ही राष्ट्रवादीच्या स्वाती राजेंद्र यादव यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळविली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षनेत्यांचा मान ठेवून ज्यांनी आज आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यांचे आभार मानले आहेत. तर सुजाता दगडे, त्यांचे पती डॉ. वसंत दगडे, सुरेश जगताप आणि स्वाती यादव यांची आज पक्षातून हकालपट्टी केली आहे. तशी माहिती तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण यांनी दिली. (वार्ताहर)