शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
3
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
4
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
5
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
6
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
7
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
8
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
9
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
10
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
11
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
12
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
13
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
14
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
15
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
16
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
17
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
18
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
19
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
20
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

पुरंदरमधील बंडोबा अखेर झाले थंड

By admin | Updated: February 14, 2017 01:46 IST

पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या २७ जणांनी, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी उमेदवारी दाखल केलेल्या २७ जणांनी, तर पंचायत समितीच्या आठ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या ६३ जणांनी आज अर्ज माघारी घेतले आहेत. तरीही, कोळविहीरे- नीरा गटातून राष्ट्रवादीच्या सुजाता दगडे आणि कोळविहीरे गणातून राष्ट्रवादीचेच सुरेश जगताप यांनी बंडखोरी केलीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.पुरंदरच्या इतिहासात प्रथमच काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजपा-मनसे अशी चौरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेसाठी ४५ आणि पंचायत समितीसाठी १०१ एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज यातील प्रत्येकी २७ आणि ६३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने जिल्हा परिषदेसाठी १८ आणि पंचायत समितीसाठी ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. काहींनी भाजपाची ही उमेदवारी घेतली आहे. तर, काहींनी अजूनही उमेदवारी ठेवून पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली आहे. असे असले, तरीही काल अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यात बेलसर -माळशिरस आणि कोळविहीरे-नीरा गटात सभा घेऊन बंडखोरांना सज्जड दम दिला होता, तसेच समजावण्याचाही प्रयत्न केला होता. वाघापूर येथील सभेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते यांचे नाव न घेता शरद पवारांमुळे अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे अस्तित्व आहे तसेच तुमचे आहे. साहेबांनी एवढे देऊनसुद्धा पक्षांविरुद्ध बंड करता आहात. हीच का तुमची निष्ठा? अशा भाषेत सुनावले होते. आज अर्जमाघारीच्या दिवशी विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला असला, तरीही पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार की नाही, हे समजू शकले नाही. तर, याच गटाच्या माळशिरस गणासाठी राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष महादेव शेंडकर यांनी बंडखोरी करून पत्नी मीना यांचा भाजपाकडून अर्ज भरला होता. अजित पवारांच्या सूचनेवरून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे भाजपाची गोची झाली आहे. या गणातील पक्षाच्या एका अधिकृत उमेदवारानेच माघार घेतली आहे. नीरा-कोळविहीरे गट वगळता सर्वच ठिकाणचे बंडखोर थंड झाल्याचेच आज निदर्शनास आले. कोळविहीरे-नीरा गटात सर्वाधिक जास्त उमेदवारी अर्ज होते. आज अनेकांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले; मात्र ६ महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देऊन पुरंदर पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता दगडे आणि त्यांचे पती डॉ. वसंत दगडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी देण्याचा आपल्याला शब्द दिला होता; परंतु डावलले गेल्याने सुजाता दगडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्याबरोबर कोळविहीरे गणातही गुळुंचे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश जगताप यांनीही शब्द देऊनही डावलल्याचा आरोप करून आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. कोळविीहीरे येथील सभेत अजित पवार यांनी त्यांचे नाव घेऊन बंडखोरी करू नये, असे सांगितले होते. तरीही त्यांनी उमेदवारी ठेवली आहे. वीर गणात ही राष्ट्रवादीच्या स्वाती राजेंद्र यादव यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळविली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षनेत्यांचा मान ठेवून ज्यांनी आज आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले त्यांचे आभार मानले आहेत. तर सुजाता दगडे, त्यांचे पती डॉ. वसंत दगडे, सुरेश जगताप आणि स्वाती यादव यांची आज पक्षातून हकालपट्टी केली आहे. तशी माहिती तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण यांनी दिली. (वार्ताहर)