शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

बिल्डरांना ‘रेरा’चा चाप

By admin | Updated: May 3, 2017 02:30 IST

केंद्र शासनाने ‘रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ म्हणजेच ‘रेरा’ कायदा देशभरात १ मेपासून लागू केला. त्यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीला

पिंपरी : केंद्र शासनाने ‘रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ म्हणजेच ‘रेरा’ कायदा देशभरात १ मेपासून लागू केला. त्यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीला चाप बसणार आहे. ग्राहकांना अटी, शर्थींच्या बंधनात अडकविणारे बिल्डरच आता ‘रेरा’च्या फेऱ्यात अडकणार आहेत. शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संख्या निम्याने घटणार आहे. बांधकाम व्यवसायाला शिस्त लावणे आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे या उद्देशाने २००९ मध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी एक कायदा मंजूर केला होता. केंद्राने या कायद्यामध्ये बदल करून देशातील सर्व राज्यांसाठी नवा ‘रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅक्ट’ तयार केला. त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. या नव्या कायद्यात ५०० चौरसमीटर भूखंड तसेच आठ सदनिकांवरील प्रकल्पांची नोंदणी करणे सक्तीचे आहे. प्रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय संबंधित बांधकाम व्यावसायिकांना सदनिकांची विक्री करता येणार नाही. त्याची जाहिरातही करता येणार नाही. या कायद्यानुसार, प्रत्येक राज्याला रिअल इस्टेट नियमन प्राधिकरणाची स्थापना करणे बंधनकारक असेल. बिल्डरविरोधात कारवाई करण्याचाही अधिकार असेल. बांधकाम व्यावसायिकाने नोंदणी न केल्यास प्रकल्पाच्या १० टक्के रक्कम दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. दुसऱ्यांदा गुन्हा घडल्यास तुरुंगवासाची शिक्षा होईल.‘रेरा’च्या न्यायाधिकरणाच्या आदेशांची अंमलबजावणी न केल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर झाल्यास घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी भरलेल्या अतिरिक्त ईएमआयवरील व्याज बांधकाम व्यावसायिकाने द्यावे, अशी कायद्यात तरतूद आहे. नव्या नियमांतर्गत कार्पेट क्षेत्रफळ वेगळ्या पद्धतीने मोजण्यात येईल. प्रकल्पात काही चूक आढळल्यास घराचा ताबा घेतल्यानंतर वर्षभराच्या कालावधीत करून विक्रीनंतरच्या सेवेची मागणी करता येऊ शकते.(प्रतिनिधी)नगरसेवकही बांधकाम व्यावसायिकनगरसेवकांचे निवडणुकीतील उमेदवारी अर्ज पाहिल्यास, त्यांनी व्यवसाय या रकान्यापुढे बांधकाम व्यावसायिक असे लिहिलेले दिसून येते. शिक्षण पाचवी, सातवी, आठवी एवढेच पण व्यवसायाने बिल्डर अशी बिरुदावली ते मिरवत होते. गृहप्रकल्प बांधून झाल्यानंतर अनेक वर्षे लाटली तरी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला जात नाही. सोसायट्या स्थापन करण्यास विलंब केला जात होता. हे प्रकार रेरा कायद्यामुळे बंद होतील. बिल्डरला सदनिका विक्रीतून मिळणारी ७० टक्के रक्कम वेगळ्या बँक खात्यात ठेवावी लागेल. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना एका प्रकल्पातील पैसा दुसऱ्या प्रकल्पात गुंतवता येणार नाही. बिल्डरांना प्रकल्पाबाबतची सर्व माहिती उपलब्ध करून द्यावी लागेल. योजना, सरकारी परवानगी, जमिनीची माहिती, प्रकल्प पूर्ण करण्यास लागणारा कालावधी ही सर्व माहिती देणे बंधनकारक ठरणार आहे. स्थानिकांनी जमिनी बिल्डरला देऊन जॉर्इंट व्हेंचरमध्ये गृहप्रकल्प उभारले. जागेचा ताबा द्यायचा, बदल्यात काही सदनिका अथवा साठ, चाळीस या प्रमाणात नफ्याची विभागणी करण्याच्या अटीवर प्रकल्प साकारले आहेत.