शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दूध खरेदीदराची वाढ ठरणार ‘भूलभुलय्या’

By admin | Updated: January 13, 2017 02:33 IST

दूध खरेदीच्या दरात ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर २ रूपये दरवाढ

रवीकिरण सासवडे / बारामतीदूध खरेदीच्या दरात ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर २ रूपये दरवाढ केली आहे. मात्र, जनावरांच्या खाद्यावर होणारा खर्च, त्यामध्ये झालेल्या वाढीचा परिणाम दूध उत्पादनावरदेखील होतो. शेतीपूरक व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्यासाठी दूध खरेदीदरात केलेली वाढ दूध उत्पादकांसाठी भूलभुलय्याच ठरणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे दोन्ही तालुक्यातील वातावरण गरम झाले आहे. ‘मिनी विधानसभा’ पदरात पाडून घेण्यासाठी पक्षांतर्गत खेळ््यांसह मतदारांना देखील चुचकारण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दोन्ही तालुक्यामंध्ये दूध उत्पादकांची संख्या मोठी आहे. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय आता अनेक शेतकरी कुटुंबाचा मुख्य व्यवसाय बनला आहे. हा ‘दूध उत्पादक मतदार’ डोळ्यांसमोर ठेवूनच दूध संकलन संस्थांनी दूध खरेदी दरामध्ये दोन रूपयांनी वाढ केली आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाढदेखील फसवी आहे. पशुखाद्याची ५० किलोची गोणी १ हजार ६० रुपये, तर ६० किलोची गोणी १ हजार १७० रुपयांना मिळते. सर्वसाधारणपणे एक जर्सी किंवा होस्टन गाय जर दिवसाला १८ लिटर दूध देत असेल तर त्या गाईला एका दिवसात होणारा खर्च असा, सुका चारा ५ ते ७ किलोप्रमाणे- २० ते २५ रुपये, ओला चारा २५ ते ३० किलोप्रमाणे- ७५ ते ८० रुपये, तर गाईच्या तब्यतीनुसार दिवसाला ८० ते १२० रूपयांचे पशुखाद्य, तसेच यासर्व कामासाठी लागणारी दिवसाची मजुरी (पुरूष मजुर ३०० रूपये तर महिला मजूर १५० रूपये), या सर्वांचा खर्च धरला तर १८ लिटर दुधाचे ४३२ रूपये होतात. या अत्यल्प उत्पादनामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हाती काहीच राहात नसल्याचे चित्र आहे.मागील वर्षी दुधाचे दर प्रतिलिटर १७ रूपयांपर्यंत घसरले होते. दूध भुकटीच्या निर्यातबंदीचे कारण पुढे करीत त्यावेळी दूधसंकलन संस्थांनी दुधाच्या मलईवर ताव मारला होता. त्यावेळी दूधसंकलन संस्थांनी दूध भुकटीचे उत्पादन बंद करीत इतर उत्पादनांमधून भरपूर नफा कमवला होता. तत्कालिन दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी कमी दर देणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ही कारवाई कधीच कोणत्याही दूध संकलन संस्थेवर झाली नाही. दूध संकलन संस्थांच्या मनामानी कारभारामुळे दुध उत्पादक मात्र वेठीस धरला गेला आहे.एरवी ऊसदरासाठी सातत्याने आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या शेतकरी संघटना दूध दराबाबत मात्र मूग गिळून आहेत.केवळ ऊस गळीत हंगामापुरतेच डोके वर काढणाऱ्या शेतकरी संघटनांना उसाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांबाबत स्वारस्य नसल्याचा आरोपही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.वास्तविक, दुधाच्या धंद्याने ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना तारले आहे. शेतकरी संघटनांनी या प्रश्नाकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.सध्या कच्च्या मालाचे दर कमी झाल्यामुळे बारामती दूध संघाने पशुखाद्याचे दर ११५ रूपयांनी कमी केले आहेत. सभादसांना संघामार्फत मोफत पशूवैद्यकीय सेवा दिली जाते. १ तारखेपासून दूध खरेदी दरामध्ये देखील २ रूपयांनी वाढ केली आहे. तसेच बारामती संघाच्या वतीने सभासदांना वेळोवेळी दूध उत्पादन वाढीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. - सतीश तावरे, अध्यक्ष, बारामती दूध संघ