शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

बीआरटीचे काम प्रगतिपथावर

By admin | Updated: June 4, 2016 00:15 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यानच्या बीआरटीएस रस्त्याचे काम तीन भागात होत आहे

किवळे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने किवळेतील मुकाई चौक ते निगडीतील भक्ती-शक्ती चौक या दरम्यानच्या बीआरटीएस रस्त्याचे काम तीन भागात होत आहे. किवळे व निगडी या दोन्ही बाजूंची कामे सध्या वेगात सुरू असून, काही भागातील डांबरीकरणाची कामे पूर्ण होऊन वाहतूकही सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. आजतागायत दोन्ही बाजूंकडील रस्त्यांचे एकूण ५५ टक्के काम पूर्ण झाले असून या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण ३३ कोटी २० खर्च झाला आहे. या रस्त्यावर रावेत येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या नकाशाचे (डिझाईन) काम सध्या प्रगतिपथावर असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौकादरम्यानच्या या ४५ मीटर रुंदीच्या या रस्त्याचे १४ जुलै २०१४ ला मुकाई चौकात व निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. जुलै २०१५ मध्ये रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १४, १८ व १९ या तीन प्रभागांतून हा रस्ता विकसित करण्यात येत आहे. या रस्त्याचे काम तीन भागात सुरू झालेले आहे. पहिल्या टप्प्यातील किवळे-मुकाई चौक ते लोहमार्ग दरम्यानच्या रस्त्याची एकूण लांबी २८५० मीटर राहणार असून, रुंदी ४५ मीटर असणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील लोहमार्ग ते निगडी भक्ती-शक्ती चौकादरम्यानच्या कामाची लांबी दीड किलोमीटर असून, या दोन्ही भागातील कामासाठी ७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही भागांतील रस्त्याची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. किवळे ते निगडी दरम्यान रावेत येथे लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, पुलाच्या कामासाठी निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने यासाठी ८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. उड्डाणपुलाच्या डिझाईनचे काम सध्या सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. किवळे ते आदर्शनगर चौकापर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते एमआयडीसीच्या हद्दीपर्यंत काम पूर्ण होत आले आहे. एमआयडीसी पाणीपुरवठा केंद्राच्या आवारातील, तसेच रावेत व पुणे-मुंबई लोहमार्गाच्या समांतर भागात रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. या रस्त्यामुळे द्रुतगती मार्गाने पुणे-मुंबईकडे ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता उपलब्ध होणार आहे. यामुळे सततच्या वाहतूककोंडीतून सुटका होणार असल्याने वेळ व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)