शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

पुस्तकांमुळे होते मन आणि बुद्धीचे भरण-पोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:13 IST

पुणे : जीवनातल्या कसोटीच्या प्रसंगात पुस्तके माणसाला मार्ग दाखवतात आणि त्याचे जीवन समृद्ध आणि संपन्न करतात. पुस्तकांमुळे माणसाच्या मन ...

पुणे : जीवनातल्या कसोटीच्या प्रसंगात पुस्तके माणसाला मार्ग दाखवतात आणि त्याचे जीवन समृद्ध आणि संपन्न करतात. पुस्तकांमुळे माणसाच्या मन आणि बुद्धीचे भरण-पोषण होते. चांगली पुस्तके गुरू, मार्गदर्शक आणि मित्र म्हणून भूमिका बजावतात. पुस्तकांशी अतूट मैत्री झाली तर माणसाचे जीवन चांगल्या वळणावर जाते. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे नव्या पिढीचे वाचन हा चिंतेचा विषय असून त्यांना वाचनात रमवणे हे शिक्षक, पालकांसमोरचे मोठे आव्हान आहे, असे मत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केले.

गोल्डन पेज पब्लिकेशनच्या वतीने डॉ. वैभव ढमाळ यांच्या ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक डॉ. वैभव ढमाळ, प्रकाशक प्रदीप खेतमर उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, ''विचारसृष्टीचे अवलोकन केल्याशिवाय जीवनदृष्टी मिळत नाही. चांगल्या ग्रंथांच्या वाचनातून ती मिळते. मनाची मशागत आणि अंतरीच्या ज्ञानदीपाचे प्रज्वलित होणे ज्या विचारांमुळे घडते त्या विचारांचे उगमस्थान ग्रंथात असते. चांगले पुस्तक एकांतात वाचताना त्या पुस्तकातल्या अनुभवांशी एकरूप होताना शब्दांच्या सोबतीने माणूस शब्दांच्या पलीकडे जातो. अनेकदा नि:शब्द होतो. शब्दांपेक्षाही नि:शब्द जाणिवांचे महत्त्व अधिक आहे.''

डॉ. ढमाळ यांनी पुस्तकामागील भूमिका सांगितली. प्रदीप खेतमर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.