शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

कानगावला महावितरणविरोधात बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:14 IST

कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही. ...

कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही.

परिणामी शेतकरी व शेती व्यवसाय पूर्ण आर्थिक तोट्यात गेला. तरी देशाला अन्नधान्य, दूध, फळे-फुले पुरवण्याचे महान काम समस्त शेतकऱ्यांनी केले आहे. संपूर्ण जग व कंपन्या उद्योग धंदे कोरोना महामारीमध्ये बंद पडले. पण शेतकऱ्यांनी आपला शेती व्यवसाय बंद पडू दिला नाही. परंतु महावितरण कंपनीमुळे आज कानगावसहित राज्यभर अनेक शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. या सर्व समस्यांशी शेतकरी लढत असताना महावितरणने शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून गेली आहेत. तर काही पिकांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.

कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनी व संबंधित व्यवस्थेचा आज कानगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला. तसेच शासन प्रशासन व महावितरण कंपनीचे या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी ऊर्जामंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महावितरणने त्वरित वीज पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा २६ ऑगस्टपासून बेमुदत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचाही इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, भीमा पाटसचे माजी संचालक महादेव चौधरी, कानगांवचे सरपंच राहुल चाबुकस्वार, भानुदास शिंदे ,संतोष शेलार, सयाजी मोरे, उत्तम खांदवे, रामदास कोऱ्हाळे, संतोष गवळी, रामदास पवार, भानुदास माळवदकर यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

२६ फोटो दौंड आंदोलन

कानगाव येथे शेतकऱ्यांकडून ऊर्जामंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.