शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

कानगावला महावितरणविरोधात बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:14 IST

कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही. ...

कोरोना महामारी, चक्रीवादळ, आस्मानी, सुलतानी संकट व लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला योग्य तो बाजार भाव मिळाला नाही.

परिणामी शेतकरी व शेती व्यवसाय पूर्ण आर्थिक तोट्यात गेला. तरी देशाला अन्नधान्य, दूध, फळे-फुले पुरवण्याचे महान काम समस्त शेतकऱ्यांनी केले आहे. संपूर्ण जग व कंपन्या उद्योग धंदे कोरोना महामारीमध्ये बंद पडले. पण शेतकऱ्यांनी आपला शेती व्यवसाय बंद पडू दिला नाही. परंतु महावितरण कंपनीमुळे आज कानगावसहित राज्यभर अनेक शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय ठप्प झाला आहे. या सर्व समस्यांशी शेतकरी लढत असताना महावितरणने शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडून बेकायदेशीर वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून गेली आहेत. तर काही पिकांच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.

कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण कंपनी व संबंधित व्यवस्थेचा आज कानगाव येथील ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला. तसेच शासन प्रशासन व महावितरण कंपनीचे या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी ऊर्जामंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महावितरणने त्वरित वीज पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा २६ ऑगस्टपासून बेमुदत बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचाही इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी पुणे जिल्हा भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस माऊली शेळके, भीमा पाटसचे माजी संचालक महादेव चौधरी, कानगांवचे सरपंच राहुल चाबुकस्वार, भानुदास शिंदे ,संतोष शेलार, सयाजी मोरे, उत्तम खांदवे, रामदास कोऱ्हाळे, संतोष गवळी, रामदास पवार, भानुदास माळवदकर यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

२६ फोटो दौंड आंदोलन

कानगाव येथे शेतकऱ्यांकडून ऊर्जामंत्र्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्यात आला.