शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सुटा-बुटातील भाजपाचे ‘सेल्फी’ सरकार

By admin | Updated: May 27, 2015 01:05 IST

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही.

पुणे : भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अयशस्वी ठरले आहे. जनतेची त्यांच्यावर नाराजी असली तरी हे सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. त्यामुळे हे सुटाबुटातील सरकार ‘सेल्फी सरकार’ असल्याची टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा यांनी केली.मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी पुण्यात काँग्रेस भवन येथे ‘अच्छे दिनची पुण्यतिथी’ साजरी करण्यात आली. तसेच या वेळी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ओझा यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला. या वेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी आदी उपस्थित होते. भाजपने वर्षभरापूर्वी दिलेल्या घोषणा हवेतच विरल्याची टीका करीत ओझा म्हणाल्या, ‘‘भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेप्रमाणे लोकांचा विकास झाला नाही. केवळ अदानीसारख्या काही लोकांचाच विकास झाला. देशाचा विकास दर वाढला नाही. सुशासन, रोजगारीचे प्रश्न कायम आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले तरी सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. त्यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन फोल ठरले आहे.’’ (प्रतिनिधी)मेक इन इंडिया फक्त स्वप्नच उरले आहे. इंधनाचे दर कमी न झाल्याने महागाई वाढलेलीच आहे. माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. तरीही हे सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. जनतेशी संपर्क नसलेले हे ‘सेल्फी’ सरकार आहे. मोदी यांच्या रुपाने पक्षाला एक चांगला ‘इव्हेंट मॅनेजर’ मिळाला आहे. त्यांनी वर्षभर हेच काम केले. काँग्रेसच्या सरकारने मागील १० वर्षांत सर्वाधिक विकास केला. मात्र, सुटाबुटातील या सरकारला हा विकास टिकविणेही शक्य होत नाही. आर्थिक दूरदृष्टी नसलेले हे दिशाहीन सरकार आहे. त्यामुळे मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने भाषणे कमी देवून काम अधिक करावे, असे ओझा म्हणाल्या.