शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सुटा-बुटातील भाजपाचे ‘सेल्फी’ सरकार

By admin | Updated: May 27, 2015 01:05 IST

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही.

पुणे : भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेले ‘अच्छे दिन’चे आश्वासन फोल ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा जनतेशी संपर्क राहिलेला नाही. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अयशस्वी ठरले आहे. जनतेची त्यांच्यावर नाराजी असली तरी हे सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. त्यामुळे हे सुटाबुटातील सरकार ‘सेल्फी सरकार’ असल्याची टीका अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा ओझा यांनी केली.मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काँग्रेसतर्फे मंगळवारी पुण्यात काँग्रेस भवन येथे ‘अच्छे दिनची पुण्यतिथी’ साजरी करण्यात आली. तसेच या वेळी महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ओझा यांनी पत्रकारांशी संवाद साधत मोदी सरकारवर निशाणा साधला. या वेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी आदी उपस्थित होते. भाजपने वर्षभरापूर्वी दिलेल्या घोषणा हवेतच विरल्याची टीका करीत ओझा म्हणाल्या, ‘‘भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेप्रमाणे लोकांचा विकास झाला नाही. केवळ अदानीसारख्या काही लोकांचाच विकास झाला. देशाचा विकास दर वाढला नाही. सुशासन, रोजगारीचे प्रश्न कायम आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले तरी सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. त्यांनी दिलेले प्रत्येक आश्वासन फोल ठरले आहे.’’ (प्रतिनिधी)मेक इन इंडिया फक्त स्वप्नच उरले आहे. इंधनाचे दर कमी न झाल्याने महागाई वाढलेलीच आहे. माहिती अधिकार कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न होत आहे. मोदी सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात रोष निर्माण झाला आहे. तरीही हे सरकार स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहे. जनतेशी संपर्क नसलेले हे ‘सेल्फी’ सरकार आहे. मोदी यांच्या रुपाने पक्षाला एक चांगला ‘इव्हेंट मॅनेजर’ मिळाला आहे. त्यांनी वर्षभर हेच काम केले. काँग्रेसच्या सरकारने मागील १० वर्षांत सर्वाधिक विकास केला. मात्र, सुटाबुटातील या सरकारला हा विकास टिकविणेही शक्य होत नाही. आर्थिक दूरदृष्टी नसलेले हे दिशाहीन सरकार आहे. त्यामुळे मोदी यांनी पंतप्रधान या नात्याने भाषणे कमी देवून काम अधिक करावे, असे ओझा म्हणाल्या.