शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा धरणावर; शिवसेना रस्त्यावर

By admin | Updated: November 23, 2015 00:53 IST

भामा-आसखेड व चासकमान धरणाचे पाणी उजनीला सोडू नये, म्हणून भाजपा धरणावर तर शिवसेना रस्त्यावर उतरली.

चाकण : भामा-आसखेड व चासकमान धरणाचे पाणी उजनीला सोडू नये, म्हणून भाजपा धरणावर तर शिवसेना रस्त्यावर उतरली. कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही, असा निश्चय दोन्ही पक्षांनी केला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाला घरचा आहेर मिळाला आहे.भामा-आसखेड व चासकमान धरणातील पाण्यावर प्रथम लाभक्षेत्रातील शेतकरी व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यासाठी आम्ही सत्तेत असलो तरी प्रथम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. एकदा पाणी सोडले की दुष्काळावर मात करता येणार नाही व पाणी परत मागे फिरविता येणार नाही. शासनाने कलम २३ नुसार हस्तक्षेप करून पाणी थांबवावे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.पुणे-नाशिक महामार्ग अडविलाचाकण : खेड तालुक्यातील शेती, जनावरे, पिण्याच्या पाण्यासाठी अडचण ठरणाऱ्या भामा-आसखेड तसेच चासकमान धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या निर्णयाविरोधात आमदार सुरेश गारे यांच्या नेतृत्वाखाली आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आला. या वेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूककोंडी झाली होती. ‘पाणी आमच्या हक्काचं! नाही कुणाच्या बापाचं!’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग अडविला. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. या वेळी तहसीलदार प्रशांत आवटे, मंडलाधिकारी राजाराम मोराळे व तलाठी अशोक सुतार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.गोरे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, जिल्हा संघटक श्रद्धा कदम, जिल्हा उपप्रमुख नंदाताई कड, युवा सेनेचे गणेश कवडे, पं. स. सदस्य अमृता गुरव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खेड तालुका व तमाम शेतकरी बांधव उपस्थित होते.उजनीला पाणी सोडल्यास धरणात जलसमाधी घेऊ, जेल भरो आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे यांनी दिला. जिल्हाप्रमुख राम गावडे म्हणाले, उजनी धरणात ७२ टीएमसी पाणी असून, सोलापूरला केवळ दीड टीएमसी पाण्याची गरज असताना पाणी सोडण्याची गरज नाही. यामुळे भविष्यात तालुक्यात गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत.जिल्हा संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे आम्ही शासनात असलो तरी सर्वसामान्यांची गरज ओळखून रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही असे सांगितले. तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनीही धरणात जलसमाधी घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाघ, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव, राजगुरुनगरच्या उपनगराध्यक्ष सारिका घुमटकर, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शिळावणे, पांडुरंग गोरे, डॉ. किशोर घुमटकर, अ‍ॅड. प्रीतम शिंदे, स्वप्नील बिरदवडे, किरण गवारी, सुभाष मांडेकर, मंगल कड, महादेव लिंभोरे, दत्ता कंद, गोरक्षनाथ गवारे, महेंद्र घोलप, एल. बी. तनपुरे, रूपाली परदेशी, शेखर पिंगळे, स्वप्नील बिरदवडे, स्वामी कानपिळे, दीपाली भोई, माउली कड, धीरज केळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.खेड ते उजनी हे २३८ किलोमीटरचे अंतर असून, भामा-आसखेड व चासकमान धरणातील पाणी उजनीला सोडले तर ४० टक्के पाणीसुद्धा पोहोचत नाही. जलसंपत्ती प्राधिकरणाने आमची बाजू ऐकून घ्यावी, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही येथील शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत.- सुरेश गोरे, आमदार शिवसेना