शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

भाजपा धरणावर; शिवसेना रस्त्यावर

By admin | Updated: November 23, 2015 00:53 IST

भामा-आसखेड व चासकमान धरणाचे पाणी उजनीला सोडू नये, म्हणून भाजपा धरणावर तर शिवसेना रस्त्यावर उतरली.

चाकण : भामा-आसखेड व चासकमान धरणाचे पाणी उजनीला सोडू नये, म्हणून भाजपा धरणावर तर शिवसेना रस्त्यावर उतरली. कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही, असा निश्चय दोन्ही पक्षांनी केला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयाला घरचा आहेर मिळाला आहे.भामा-आसखेड व चासकमान धरणातील पाण्यावर प्रथम लाभक्षेत्रातील शेतकरी व खेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यासाठी आम्ही सत्तेत असलो तरी प्रथम शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. एकदा पाणी सोडले की दुष्काळावर मात करता येणार नाही व पाणी परत मागे फिरविता येणार नाही. शासनाने कलम २३ नुसार हस्तक्षेप करून पाणी थांबवावे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.पुणे-नाशिक महामार्ग अडविलाचाकण : खेड तालुक्यातील शेती, जनावरे, पिण्याच्या पाण्यासाठी अडचण ठरणाऱ्या भामा-आसखेड तसेच चासकमान धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या निर्णयाविरोधात आमदार सुरेश गारे यांच्या नेतृत्वाखाली आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरण्यात आला. या वेळी महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूककोंडी झाली होती. ‘पाणी आमच्या हक्काचं! नाही कुणाच्या बापाचं!’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग अडविला. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. या वेळी तहसीलदार प्रशांत आवटे, मंडलाधिकारी राजाराम मोराळे व तलाठी अशोक सुतार यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.गोरे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, जिल्हा परिषद सदस्य किरणशेठ मांजरे, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे, जिल्हा संघटक श्रद्धा कदम, जिल्हा उपप्रमुख नंदाताई कड, युवा सेनेचे गणेश कवडे, पं. स. सदस्य अमृता गुरव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना खेड तालुका व तमाम शेतकरी बांधव उपस्थित होते.उजनीला पाणी सोडल्यास धरणात जलसमाधी घेऊ, जेल भरो आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे यांनी दिला. जिल्हाप्रमुख राम गावडे म्हणाले, उजनी धरणात ७२ टीएमसी पाणी असून, सोलापूरला केवळ दीड टीएमसी पाण्याची गरज असताना पाणी सोडण्याची गरज नाही. यामुळे भविष्यात तालुक्यात गंभीर प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत.जिल्हा संपर्कप्रमुख विजयाताई शिंदे आम्ही शासनात असलो तरी सर्वसामान्यांची गरज ओळखून रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत उजनीला पाणी जाऊ देणार नाही असे सांगितले. तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनीही धरणात जलसमाधी घेऊन ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाघ, उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव, राजगुरुनगरच्या उपनगराध्यक्ष सारिका घुमटकर, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष शिळावणे, पांडुरंग गोरे, डॉ. किशोर घुमटकर, अ‍ॅड. प्रीतम शिंदे, स्वप्नील बिरदवडे, किरण गवारी, सुभाष मांडेकर, मंगल कड, महादेव लिंभोरे, दत्ता कंद, गोरक्षनाथ गवारे, महेंद्र घोलप, एल. बी. तनपुरे, रूपाली परदेशी, शेखर पिंगळे, स्वप्नील बिरदवडे, स्वामी कानपिळे, दीपाली भोई, माउली कड, धीरज केळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.खेड ते उजनी हे २३८ किलोमीटरचे अंतर असून, भामा-आसखेड व चासकमान धरणातील पाणी उजनीला सोडले तर ४० टक्के पाणीसुद्धा पोहोचत नाही. जलसंपत्ती प्राधिकरणाने आमची बाजू ऐकून घ्यावी, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही येथील शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत.- सुरेश गोरे, आमदार शिवसेना