शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म : प्रा. मिलिंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

पुणे : "स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म होत असतो. शब्दांच्या पाठीशी अनुभवाचे संचित उभे केल्यानंतर शब्दांना खरा अर्थ ...

पुणे : "स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म होत असतो. शब्दांच्या पाठीशी अनुभवाचे संचित उभे केल्यानंतर शब्दांना खरा अर्थ प्राप्त होतो," असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

पूजा सामंत आणि सिया सामंत या मायलेकींनी लिहिलेल्या 'ओंजळीतलं चांदणं' या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्समधील कलासागर या मासिकाचे संपादक सुधीर हसमनीस आणि सिम्बायोसिस स्कूलच्या प्राचार्या वीणा हवनूरकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य डॉ. माधव पोतदार होते.

या वेळी प्रा. जोशी म्हणाले, मायलेकींनी शब्दांतून मांडलेला हा आत्मस्वर वाचनीय आहे. लेखन ही सोपी गोष्ट नाही. केवळ शब्द आहेत म्हणून लेखन करता येत नाही. त्याला प्रतिभेचा आणि अनुभवाचा स्पर्श लागतो.

डॉ. पोतदार म्हणाले, या पुस्तकातून आंतरिक आत्मीयतेचा स्वर व्यक्त होताना दिसतो. रोजच्या सहज जगण्यातील अनुभवातून साकारलेले आहे. मराठी भाषेचा अभिमान आणि भावबंध त्यातून प्रकट होताना दिसतो.

सुधीर हसमनीस आणि वीणा हवनूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. लेखिका म्हणून पूजा आणि सिया सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी केले. डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. पराग सामंत यांनी आभार मानले.

--------------------------

फोटो ओळी

: ओंजळीतलं चांदणं या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) सिया सामंत, वीणा हवनूरकर, सुधीर हसमनीस, डॉ. माधव पोतदार, प्रा. मिलिंद जोशी, पूजा सामंत, पराग पोतदार.