शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म : प्रा. मिलिंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST

पुणे : "स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म होत असतो. शब्दांच्या पाठीशी अनुभवाचे संचित उभे केल्यानंतर शब्दांना खरा अर्थ ...

पुणे : "स्फूर्ती आणि अभिव्यक्तीतूनच साहित्याचा जन्म होत असतो. शब्दांच्या पाठीशी अनुभवाचे संचित उभे केल्यानंतर शब्दांना खरा अर्थ प्राप्त होतो," असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

पूजा सामंत आणि सिया सामंत या मायलेकींनी लिहिलेल्या 'ओंजळीतलं चांदणं' या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्समधील कलासागर या मासिकाचे संपादक सुधीर हसमनीस आणि सिम्बायोसिस स्कूलच्या प्राचार्या वीणा हवनूरकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य डॉ. माधव पोतदार होते.

या वेळी प्रा. जोशी म्हणाले, मायलेकींनी शब्दांतून मांडलेला हा आत्मस्वर वाचनीय आहे. लेखन ही सोपी गोष्ट नाही. केवळ शब्द आहेत म्हणून लेखन करता येत नाही. त्याला प्रतिभेचा आणि अनुभवाचा स्पर्श लागतो.

डॉ. पोतदार म्हणाले, या पुस्तकातून आंतरिक आत्मीयतेचा स्वर व्यक्त होताना दिसतो. रोजच्या सहज जगण्यातील अनुभवातून साकारलेले आहे. मराठी भाषेचा अभिमान आणि भावबंध त्यातून प्रकट होताना दिसतो.

सुधीर हसमनीस आणि वीणा हवनूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. लेखिका म्हणून पूजा आणि सिया सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी केले. डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. पराग सामंत यांनी आभार मानले.

--------------------------

फोटो ओळी

: ओंजळीतलं चांदणं या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) सिया सामंत, वीणा हवनूरकर, सुधीर हसमनीस, डॉ. माधव पोतदार, प्रा. मिलिंद जोशी, पूजा सामंत, पराग पोतदार.