शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘बर्ड फ्लू’मुळे राज्यात ७ लाखांहून अधिक कोंबड्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून मिळून आतापर्यंत पोल्ट्रीतील ७ लाख १२ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमधून मिळून आतापर्यंत पोल्ट्रीतील ७ लाख १२ हजार १७२ कोंबड्या नष्ट करण्यात आल्या. त्याचबरोबर २६ लाख ३ हजार ७२८ अंडीही जमिनीत खोलवर खड्डा करून त्यात पुरण्यात आली. आता साथीला अटकाव झाला असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे.

रोगाचा प्रादुर्भाव आढळताच तिथे त्वरित केल्या जात असलेल्या कारवाईमुळेच बर्ड फ्लूची साथ विशिष्ट परिसर ओलांडून सगळीकडे पसरली नसल्याचा पशुसंवर्धन विभागाचा दावा आहे. अकस्मात मरण पावलेल्या कोंबड्यांसह सर्व पक्ष्यांचे नमुने जमा करून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. त्यांच्याकडून होकारार्थी निष्कर्ष मिळाल्यानंतरच लगेचच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नमुना आढळलेल्या ठिकाणच्या १ किलोमीटर परिघातील पोल्ट्रीमधील सर्व कोंबड्या व तेथील पशुखाद्य, अंडी वगैरे नष्ट करतात.

त्यानुसार कोंबड्या व अंडी यासह ७२ हजार ९७४ किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली. पोल्ट्रीचालकाला त्याच्या नुकसानीसाठी सरकारी दराने नुकसानभरपाई त्वरित देण्यात आली. राज्य सरकारने त्यासाठी १ कोटी ३० लाख रुपये पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. ६० लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम नुकसानभरपाई आतापर्यंत दिली गेली आहे.