शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

पक्ष्यांमधला बर्ड फ्ल्यू माणसाला होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई, परभणी, लातूर, बीड आणि ठाणे या जिल्ह्यात व उदगीर या तालुक्यातील पक्ष्यांमध्ये बर्ड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मुंबई, परभणी, लातूर, बीड आणि ठाणे या जिल्ह्यात व उदगीर या तालुक्यातील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू आजार आढळून आला आहे. मात्र हा आजार पक्ष्यांमधून माणासात संक्रमीत होत असल्याचे देशात एकही उदाहरण नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन राज्याचे पशूसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी सांगितले. राज्यात कोंबड्यांसोबतच बगळे, कावळे, पोपट आणि चिमण्या या पक्ष्यांना बर्ड फ्लूने गाठले असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई, बीड, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी कावळे तर ठाणे, नागपूर येथे बगळे, पोपट, चिमण्या मरण पावल्याचे आढळले असल्याचे सिंग म्हणाले. या सर्व ठिकाणचे नमूने तपासण्यात आले. मुंबई, परभणी, लातूर बीड व ठाणे याठिकाणी संसर्ग आढळला आहे. मंगळवारी (दि. १२) पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. विनायक लिमये यावेळी उपस्थित होते.

सिंग म्हणाले, “कोंबड्यांना आजार झाल्याचे आढळले त्या ठिकाणचा १० किलोमीटरचा परिघ कोंबड्यांच्या हस्तांतरणासाठी बंद करण्यात आला आहे. त्याच ठिकाणच्या १ किलोमीटर परिघातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार यात कार्यवाही होत असून संबधित ठिकाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे अधिकार दिले आहे. बर्ड फ्लूने मृत झालेले पक्षी तसेच त्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी त्या परिसरातील नष्ट केलेले पक्षी जमिनीत खोल खड्डा घेऊन त्यात पुरण्यात येतात. त्यावर चुना टाकण्यात येतो. ही शास्त्रीय पद्धत असून त्यात कोणताही धोका नाही.”

कोंबड्या पाळल्या जातात त्याठिकाणी त्यांच्याकडून अन्य पक्ष्यांना संसर्गाचा धोका असतो. त्यामुळेच बर्ड फ्लू असलेल्या ठिकाणच्या सर्व कोंबड्या नष्ट करण्यात येतात. कावळे, बगळे, पोपट किंवा चिमण्या अशा पक्ष्यांचा बाबतीतही मृत झालेले पक्षी जमिनीत खोलवर पुरण्यात येतात. त्यांच्यापासूनही अन्य पक्ष्यांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे ही काळजी घेण्यात येते, असे सिंग म्हणाले.

चौकट

नमूने भोपाळला

“मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. देशातील ती एकमेव प्रयोगशाळा आहे. तिथे तपासणी होऊन निष्कर्ष कळण्यास वेळ लागत असल्याने केंद्र सरकारने आणखी काही प्रादेशिक प्रयोगशाळा सुरू केल्या आहेत. पुण्यात अशी एक प्रयोगशाळा आहे. ही तपासणी धोकादायक असल्याने विशेष प्रयोगशाळेत ती करावी लागते. अंतीम तपासणी भोपाळलाच करावी लागते. तिथे राज्यातील काही ठिकाणचे नमुने प्रलंबित आहेत.”

- सचिंद्र प्रताप सिंग, राज्य पशुसंवर्धन आयुक्त.