शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

बिरंगुडी सहकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:10 IST

बारामती: कोरोना संकटामुळे शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र, या परिस्थितीवर मात करत बिरंगुडी (ता. इंदापूर) ...

बारामती: कोरोना संकटामुळे शेतमालाच्या बाजारभावात घसरण झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहे. मात्र, या परिस्थितीवर मात करत बिरंगुडी (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी शेती पिकांचे योग्य नियोजन केल्याने बिरंगुडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची मार्चअखेर पीक कर्जवसुली शंभर टक्के झाली आहे. संस्थेच्या सभासदांना कोट्यवधी रुपयांहून अधिक कर्ज वाटप करण्यात आले होते. या सर्व कर्जाचा शेतकऱ्यांनी भरणा केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश सांगळे यांनी दिली.

संस्थेची सलग चार वर्षे शंभर टक्के पीक कर्जवसुली करण्यात येत आहे. कळस (ता.इंदापूर) येथील या संस्थेच्या माध्यमातून सभासदांना दर वर्षी ऊसशेतीसह डाळींब, द्राक्षे या फळबागांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जपुरवठा जिल्हा बँकेच्या माध्यमातून केला जातो, गतवर्षी वाटप करण्यात आलेल्या कर्जाची वसुली शंभर टक्के झाली आहे. सभासदांना एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यापासून कर्जवाटप करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुमारे ४ कोटी रुपयांचा पत आराखडा मंजूर आहे. मागणीप्रमाणे सर्व सभासदांना कर्ज वितरित करण्यात येणार आहे, संस्थेचे स्वमालकीचे भागभांडवल २७ लाख रुपये आहे वार्षिक उलाढाल २ कोटी रुपये झाली आहे नियमित वेळेत कर्ज भरणा झाल्याने सभासदांना शून्य टक्के व्याजदराचा फायदा झाला आहे. संस्थेचे सचिव आबासाहेब नाझरकर, जिल्हा बँकेचे निरीक्षक बाबासाहेब धायतोंडे, संस्थेचे संचालक दादा सांगळे,पोपटराव सांगळे,पप्पु सांगळे,रघुनाथ सांगळे, तात्याराम सांगळे लक्ष्मण खारतोडे,अजित पाटोळे,उत्तम शिंदे, संभाजी सपकळ,हनुमंत जामदार, सुनीता सांगळे,मनीषा पवार यांनी सहकार्य केले.