शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

जैवविविधता गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:07 IST

चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पहाणी चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी बारामती: जिल्हाधिकारी कार्यालय व ...

चित्ररथाची उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी केली पहाणी

चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

बारामती: जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेवर आधारित जनगागृतीसाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

बारामती येथील निसर्ग जागर संस्थेच्या डॉ. महेश गायकवाड यांनी जैवविविधता पूरक गाव ही संकल्पना मांडली आहे. याबाबत माहिती देताना डॉ. गायकवाड म्हणाले, जैवविविधतापूरक गाव संकल्पना अर्थात नैसर्गिक अधिवास संरक्षण जैवविविधतापूरक - गाव संकल्पना, हा शासनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. नैसर्गिकरीत्या गावाचा विकास करीत शाश्वत विकासाची चळवळ रुजविली पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील जुनी झाडे जपली पाहिजेत, नवीन वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातीलाच प्राधान्य दिले पाहिजे. जुने पाणवठे यात ओढे, तलाव, तळी, नद्या यांचे संरक्षण झाले पाहिजे. जुनी मंदिरे, देवराया, वन्यजीव व जैवविविधता याचे संरक्षण केले पाहिजे. नैसर्गिक अधिवास वाचवून शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती करायची असेल तर गांडुळे, विविध पक्षी, मुंग्या व वारुळे, फुलपाखरे, मधमाश्या यांना वाचविणे आवश्यक आहे. शिवाय बांधावरच्या काटेरी बोरी व साधीबाभळ, आंबा, जांभूळ, भोकर अश्या झाडांचे संरक्षण केले पाहिजे. गावाभोवतीची जगल, माळरान वाचलीच पाहिजेत. वनवे थांबवले पाहिजेत. वनवा लावणाऱ्यांविरुद्ध वन विभागाकडे तक्रारी दिल्या पाहिजेत, तरच वणवे नियंत्रणात येतील. जंगले व माळरान वाचली तरच वन्यजीव वाचतील. जैवविविधता टिकेल, तरच मानव वाचू शकतो.

गवत वाढले तर भूजल वाढेल...

गावालगत असणारी वड, पिंपळ, चिंच,जांभूळ अशी स्थानिक झाडे वाचली तरच पक्ष्यांच्या वसाहतीसह घारी, बगळे, पानकावळे, पोपट, घुबड चित्रबलाक असे पक्षी वाचतील. गावात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालून त्यावर पर्यायी कापडी पिशव्या तयार करणे, गांडूळखत निर्मिती असे अनेक उपाय केले पाहिजेत. कचरामुक्त गाव करणे, ही बाब गावासाठी अत्यंत अभिमानाची मानली पाहिजे. जलसंधारण हा विषय समजून घेऊन कार्य केले पाहिजे, गवताच्या काडीला महत्त्व देऊन काम केले तरच शाश्वत जलसंधारण होईल, कारण गवत वाचले तर ओलावा टिकतो आणि तरच झाडे वाढतील, तरच भूजल पातळीत वाढ होईल. हे ध्यानात घेणे आवश्यक आहे, म्हणून गवत वाढले तरच यशस्वी व शाश्वत जलसंधारण होईल.

जैवविविधतापूरक - गाव संकल्पनेवर आधारित चित्ररथाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

२९०३२०२१-बारामती-०५