शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:07 IST

चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पहाणी चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी बारामती: जिल्हाधिकारी कार्यालय व ...

चित्ररथाची उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी केली पहाणी

चित्ररथाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

बारामती: जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत तसेच जैवविविधता पूरक गाव संकल्पनेवर आधारित जनगागृतीसाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

बारामती येथील निसर्ग जागर संस्थेच्या डॉ. महेश गायकवाड यांनी जैवविविधता पूरक गाव ही संकल्पना मांडली आहे. याबाबत माहिती देताना डॉ. गायकवाड म्हणाले, जैवविविधतापूरक गाव संकल्पना अर्थात नैसर्गिक अधिवास संरक्षण जैवविविधतापूरक - गाव संकल्पना, हा शासनाचा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. नैसर्गिकरीत्या गावाचा विकास करीत शाश्वत विकासाची चळवळ रुजविली पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील जुनी झाडे जपली पाहिजेत, नवीन वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातीलाच प्राधान्य दिले पाहिजे. जुने पाणवठे यात ओढे, तलाव, तळी, नद्या यांचे संरक्षण झाले पाहिजे. जुनी मंदिरे, देवराया, वन्यजीव व जैवविविधता याचे संरक्षण केले पाहिजे. नैसर्गिक अधिवास वाचवून शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती करायची असेल तर गांडुळे, विविध पक्षी, मुंग्या व वारुळे, फुलपाखरे, मधमाश्या यांना वाचविणे आवश्यक आहे. शिवाय बांधावरच्या काटेरी बोरी व साधीबाभळ, आंबा, जांभूळ, भोकर अश्या झाडांचे संरक्षण केले पाहिजे. गावाभोवतीची जगल, माळरान वाचलीच पाहिजेत. वनवे थांबवले पाहिजेत. वनवा लावणाऱ्यांविरुद्ध वन विभागाकडे तक्रारी दिल्या पाहिजेत, तरच वणवे नियंत्रणात येतील. जंगले व माळरान वाचली तरच वन्यजीव वाचतील. जैवविविधता टिकेल, तरच मानव वाचू शकतो.

गवत वाढले तर भूजल वाढेल...

गावालगत असणारी वड, पिंपळ, चिंच,जांभूळ अशी स्थानिक झाडे वाचली तरच पक्ष्यांच्या वसाहतीसह घारी, बगळे, पानकावळे, पोपट, घुबड चित्रबलाक असे पक्षी वाचतील. गावात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालून त्यावर पर्यायी कापडी पिशव्या तयार करणे, गांडूळखत निर्मिती असे अनेक उपाय केले पाहिजेत. कचरामुक्त गाव करणे, ही बाब गावासाठी अत्यंत अभिमानाची मानली पाहिजे. जलसंधारण हा विषय समजून घेऊन कार्य केले पाहिजे, गवताच्या काडीला महत्त्व देऊन काम केले तरच शाश्वत जलसंधारण होईल, कारण गवत वाचले तर ओलावा टिकतो आणि तरच झाडे वाढतील, तरच भूजल पातळीत वाढ होईल. हे ध्यानात घेणे आवश्यक आहे, म्हणून गवत वाढले तरच यशस्वी व शाश्वत जलसंधारण होईल.

जैवविविधतापूरक - गाव संकल्पनेवर आधारित चित्ररथाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

२९०३२०२१-बारामती-०५