शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

पूर्व भागाची तहान भागवण्यासाठी भामा-आसखेड ‘ड्रीम प्रोजेक्ट’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संरक्षण, वन, जलसंपदासह विविध २२ खात्यांच्या परवनाग्या, आंदोलनांचा मागे लागलेला ससेमिरा व सात वर्षांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संरक्षण, वन, जलसंपदासह विविध २२ खात्यांच्या परवनाग्या, आंदोलनांचा मागे लागलेला ससेमिरा व सात वर्षांचा कालावधी असे नानाविध अडथळे पार करीत आजमितीला पुणे महापालिकेचा ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्णपणे प्रत्यक्षात साकार झाला आहे़ तब्बल सात वर्षांच्या खडतर प्रयत्नानंतर या प्रकल्पातील पाणीपुरवठ्याची चाचणी सध्या सुरू असून, धरणातून पंपिग केलेले पाणी शहराच्या पूर्व भागातील नळांना येत्या नववर्षात म्हणजे जानेवारी,२०२१ च्या पहिल्याच आठवड्यात घराघरात पोहणार आहे़

पुणे शहराचा पूर्व भाग म्हणजे लोहगाव, कळस, धानोरी, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, येरवडासह साधारणत: ५८ चौरस किलोमिटरच्या परिसरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे़ खडकवासला धरणातून यापूर्वी होणारा पाणीपुरवठा चार ठिकाणी पंपिग होऊन या भागात पोहचत असल्याने, विज पुरवठा खंडित झाल्यावर बंद होणारा पाणीपुरवठा, पाईपलाईनच्या समस्या, वाढती लोकसंख्या व पाण्याची कमतरता यामुळे शहराचा पूर्व भाग सतत पाणी समस्येने ग्रासला होता़

वर्षोनुवर्षे महापालिकेचे मुबलक पाणी नसल्याने टँकरची वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांना आता नवीन वर्षात चोवीस तास पाणीपुरवठा तेही एकाच ठिकाणी पंपिग व उर्वरित सर्व वहन हे ‘ग्रॅव्हिटी’ने (विना पंपिंग करता नैसर्गिक उतारामुळे) प्राप्त होणार आहे़ ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्ण झाल्याने शहराच्या पूर्व भागाला आपले हक्काचे ‘२०० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे़

प्रकल्प साकारताना स्थानिक शेतकऱ्यांचा विरोधासह नानाविध कारणांमुळे हा प्रकल्प रेंगाळला़ पण या अडचणी येत असतानाही, उर्वरित भागातील काम कसे पूर्ण होईल याकरिता महापालिकेच्या अभियंत्यांनी चंग बांधला़ त्याचे फलित म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागताच अवघ्या काही दिवसात आसखेड गावातील तसेच केळगावातील जलवाहिनीचे काम हातोहात पूर्ण झाले़

चौकट

महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता सुदेश कडू यांसह पालिकेचे १० अभियंते व ४०० जणांचा संघ या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सात वर्षे अहोरात्र कार्यरत राहिली़ या काळात महापालिकेसह राज्यातही सत्तांतर झाले. त्यानंतरही सर्वांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रशासनास पाठबळ दिले़ त्यामुळे अनेक वर्षांपासून पुरेशा पाण्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागणाऱ्या शहरातील पूर्व भागातील नागरिकांची तहान हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्याने भागणार आहे.

--------------------

फोटो मेल केला आहे

भामा आली दारी

-----------------------