शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व भागाची तहान भागवण्यासाठी भामा-आसखेड ‘ड्रीम प्रोजेक्ट’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संरक्षण, वन, जलसंपदासह विविध २२ खात्यांच्या परवनाग्या, आंदोलनांचा मागे लागलेला ससेमिरा व सात वर्षांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संरक्षण, वन, जलसंपदासह विविध २२ खात्यांच्या परवनाग्या, आंदोलनांचा मागे लागलेला ससेमिरा व सात वर्षांचा कालावधी असे नानाविध अडथळे पार करीत आजमितीला पुणे महापालिकेचा ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्णपणे प्रत्यक्षात साकार झाला आहे़ तब्बल सात वर्षांच्या खडतर प्रयत्नानंतर या प्रकल्पातील पाणीपुरवठ्याची चाचणी सध्या सुरू असून, धरणातून पंपिग केलेले पाणी शहराच्या पूर्व भागातील नळांना येत्या नववर्षात म्हणजे जानेवारी,२०२१ च्या पहिल्याच आठवड्यात घराघरात पोहणार आहे़

पुणे शहराचा पूर्व भाग म्हणजे लोहगाव, कळस, धानोरी, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, येरवडासह साधारणत: ५८ चौरस किलोमिटरच्या परिसरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे़ खडकवासला धरणातून यापूर्वी होणारा पाणीपुरवठा चार ठिकाणी पंपिग होऊन या भागात पोहचत असल्याने, विज पुरवठा खंडित झाल्यावर बंद होणारा पाणीपुरवठा, पाईपलाईनच्या समस्या, वाढती लोकसंख्या व पाण्याची कमतरता यामुळे शहराचा पूर्व भाग सतत पाणी समस्येने ग्रासला होता़

वर्षोनुवर्षे महापालिकेचे मुबलक पाणी नसल्याने टँकरची वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांना आता नवीन वर्षात चोवीस तास पाणीपुरवठा तेही एकाच ठिकाणी पंपिग व उर्वरित सर्व वहन हे ‘ग्रॅव्हिटी’ने (विना पंपिंग करता नैसर्गिक उतारामुळे) प्राप्त होणार आहे़ ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्ण झाल्याने शहराच्या पूर्व भागाला आपले हक्काचे ‘२०० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे़

प्रकल्प साकारताना स्थानिक शेतकऱ्यांचा विरोधासह नानाविध कारणांमुळे हा प्रकल्प रेंगाळला़ पण या अडचणी येत असतानाही, उर्वरित भागातील काम कसे पूर्ण होईल याकरिता महापालिकेच्या अभियंत्यांनी चंग बांधला़ त्याचे फलित म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागताच अवघ्या काही दिवसात आसखेड गावातील तसेच केळगावातील जलवाहिनीचे काम हातोहात पूर्ण झाले़

चौकट

महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता सुदेश कडू यांसह पालिकेचे १० अभियंते व ४०० जणांचा संघ या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सात वर्षे अहोरात्र कार्यरत राहिली़ या काळात महापालिकेसह राज्यातही सत्तांतर झाले. त्यानंतरही सर्वांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रशासनास पाठबळ दिले़ त्यामुळे अनेक वर्षांपासून पुरेशा पाण्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागणाऱ्या शहरातील पूर्व भागातील नागरिकांची तहान हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्याने भागणार आहे.

--------------------

फोटो मेल केला आहे

भामा आली दारी

-----------------------