शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

‘भामा आसखेड’चे पाणी रोखले!

By admin | Updated: November 10, 2015 01:52 IST

कोणतीही पूर्वसूचना न देता भामा-आसखेड धरणामधून ६ हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांनी सोमवारी रोखले.

पाईट : कोणतीही पूर्वसूचना न देता भामा-आसखेड धरणामधून ६ हजार क्युसेक्स वेगाने सोडण्यात येणारे पाणी शेतकऱ्यांनी सोमवारी रोखले. जर हे पाणी सोडले असते तर नदीकाठच्या गावांना पुरामुळे मोठा धोका निर्माण झाला असता. शेतकऱ्यांच्या सावध भूमिकेमळे ऐन दिवाळीमध्ये होणारा मोठा अनर्थ यामुळे टळला. यामध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आज उजनी धरणामध्ये पाणी सोडण्याचे पुणे पाटबंधारे मंडळाने अत्यंत गोपनीय पद्धतीने नियोजन केले होते. याबाबत शेतकऱ्यांना समजल्यावर त्यांनी हे पाणी रोखले. पुणे पाटबंधारे विभाग धरणाच्या सांडव्यामधून येत्या ५ दिवसांमध्ये २.४ टी.एम.सी पाणी सांडव्यामधून, तर सर्व्हीस गेटमधून २. ४५ टी.एम.सी. पाणी सोडणार होते. याबाबत धरणाखालील एकाही गावामध्ये पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. सांडव्यामधून पाणी सोडण्यात येण्याचा हा पहिलाच प्रकार होता. सुमारे ६ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जाणार होते. जर तसे झाले असते, तर पाणी नदीपात्रातून बाहेर पडले असते. शिवाय धरणाखालील सर्व आठही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे गेटव्हॉल्व्ह खोलले नव्हते. या पााण्याने मोठा साठा नदीपात्रात जमा झाला असता. शिवाय आठही केटी वेयर वाहून जाण्याचा धोका होता. शिवाय शेतकऱ्यांच्या मोटारींनाही धोका झाला असता. शेतकरी व शासन यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असते. हा सर्व प्रकार शेतकऱ्यांनी पाणी सोडणे रोखल्यामुळे टळला. या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अंदोलनामध्ये माजी जि.प. सदस्य शरद बुट्टे पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, भाजप अध्यक्ष दिलीप वाळके, चांगदेव शिवेकर, सुभाष मांडेकर, महादेव लिंभोरे, दत्ता होले, किरण चोरघे, जयसिंग दरेकर, नवनाथ दरेकर, किसन नवले, सत्यवान नवले, पप्पु राळे, काळूराम कोळेकर, अंकुश कोळेकर, समीर राळे, साहेबराव कोळेकर, अनंदा अवारी व शेतकरी उपस्थीत होते. (वार्ताहर)1जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाळीनंतरच पाणी सोडण्याच्या प्रशासनास सूचना केल्या असताना अधीक्षक अभियंता कपोले, कार्यकारी अभियंता जाधव यांच्या झालेल्या बैठकीनुसार पाणी घाईघाईने सोडण्याचा निर्णय रात्री घेतला गेला. यामुळे प्रशासनास नदीकाठच्या गावांना सूचना देता आल्या नाहीत.2शरद बुट्टे-पाटील यांनी ही गंभीर बाब तहसीलदार व प्रांताधिकारी यांना सांगितल्यावर, महसूल यंत्रणेने आपणास ही बाब माहीत नसल्याचे सांगितले. नदीकाठच्या लोकांना याची कल्पना नाही. यामुळे पाणी सोडण्याची घाई करू नये, असे जलसंपदा अधिकारी यांना कळविल्याबाबत आमदार सुरेश गोरे यांनीदेखील पाणी सोडू नका, अशा सूचना केल्या.खेड तालुक्याच्या कळमोडी धरणातून शनिवारी सायंकाळी १९४ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. हे पाणी चासकमान धरणात येत असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे. कळमोडीतून चासकमानमध्ये व तेथून उजनी धरणासाठी पाणी सोडण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. कळमोडी धरणाची पाणीक्षमता दीड टीएमसी असून, खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहेत. या धरणातील एक टीएमसी पाणी जरी कमी झाले तरी ऐन उन्हाळ्याअगोदरच या भागातील जनतेला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. उजनीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये भामा आसखेड व चासकमान धरणांची नावे होती. परंतु कळमोडीचे पाणी चासकमानमध्ये का सोडले, हा प्रश्न अनुउत्तरीत आहे. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चासकमान धरणात रविवार ८ नोव्हेंबर रोजी ७८.५० टक्के तर सोमवार ९ नोव्हेंबर रोजी ७८.५७ टक्के झाले आहे. कळमोडी धरणातून जे पाणी सोडले त्याच्या नियोजनाबाबत बैठक घेणार असल्याचे शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी सांगितले.